शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये ९९.३९ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:53 IST

गतवर्षी आजच्या दिवशी केवळ ५५.४६ टक्केच पाणीसाठा होता.

जळगाव : जिल्ह्यातील सर्व मोठे व मध्यम प्रकल्पांमध्ये यंदा ९९.३९ टक्के पाणीसाठा झाला आहे. केवळ भोकरबारी मध्यम प्रकल्पात ५१.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा होता. तर सर्व प्रकल्पांमध्ये मिळून गतवर्षी आजच्या दिवशी केवळ ५५.४६ टक्केच पाणीसाठा होता.गतवर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.यंदाही जिल्ह्यात यंदा तब्बल २३ दिवस उशीराने पावसाचे आगमन झाले. मात्र त्यानंतर पावसाने अपवाद वगळता सातत्याने व जोरदार हजेरी लावली. त्यामुळे यंदा सरासरीच्या तब्बल १४० टक्के पाऊस झाला आहे.या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व मोठे व मध्यम प्रकल्प मिळून ९९.३९ टक्के पाणीसाठा झाला आहे.तिन्ही मोठे प्रकल्प तुडुंबजिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर हे तिन्ही प्रकल्प तुडुंब भरले आहेत.हतनूरमध्ये पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे या धरणात सध्या ९९.१८ टक्के पाणीसाठा आहे. तर गिरणा व वाघूर धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. वाघूर धरणाचेही सर्व २० गेट यंदा प्रथमच उघडावे लागले.मध्यम प्रकल्पांमध्ये ९७.३६ टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून ९७.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यातील केवळ भोकरबारी धरणात ५१.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणात मागील वर्षी शून्य टक्के पाणीसाठा होता. तर अन्य १२ पैकी सुकी, अभोरा, मंगरूळ, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, बोरी या १० मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर गूळ प्रकल्पा ९०.४१ टक्के व मन्याड प्रकल्पात ९९.९९ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव