शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये ९९.३९ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:53 IST

गतवर्षी आजच्या दिवशी केवळ ५५.४६ टक्केच पाणीसाठा होता.

जळगाव : जिल्ह्यातील सर्व मोठे व मध्यम प्रकल्पांमध्ये यंदा ९९.३९ टक्के पाणीसाठा झाला आहे. केवळ भोकरबारी मध्यम प्रकल्पात ५१.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा होता. तर सर्व प्रकल्पांमध्ये मिळून गतवर्षी आजच्या दिवशी केवळ ५५.४६ टक्केच पाणीसाठा होता.गतवर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.यंदाही जिल्ह्यात यंदा तब्बल २३ दिवस उशीराने पावसाचे आगमन झाले. मात्र त्यानंतर पावसाने अपवाद वगळता सातत्याने व जोरदार हजेरी लावली. त्यामुळे यंदा सरासरीच्या तब्बल १४० टक्के पाऊस झाला आहे.या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व मोठे व मध्यम प्रकल्प मिळून ९९.३९ टक्के पाणीसाठा झाला आहे.तिन्ही मोठे प्रकल्प तुडुंबजिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर हे तिन्ही प्रकल्प तुडुंब भरले आहेत.हतनूरमध्ये पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे या धरणात सध्या ९९.१८ टक्के पाणीसाठा आहे. तर गिरणा व वाघूर धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. वाघूर धरणाचेही सर्व २० गेट यंदा प्रथमच उघडावे लागले.मध्यम प्रकल्पांमध्ये ९७.३६ टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून ९७.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यातील केवळ भोकरबारी धरणात ५१.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणात मागील वर्षी शून्य टक्के पाणीसाठा होता. तर अन्य १२ पैकी सुकी, अभोरा, मंगरूळ, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, बोरी या १० मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर गूळ प्रकल्पा ९०.४१ टक्के व मन्याड प्रकल्पात ९९.९९ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव