शहरं
Join us  
Trending Stories
1
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
2
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
3
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
4
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
5
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
6
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
7
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
8
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
9
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
10
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
11
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
12
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
13
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
14
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
15
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
16
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
17
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
18
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
19
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
20
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात ९५ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:45 IST

पावसाने जास्त दडी मारल्यास अडचण

जळगाव : पावसाने यंदा उशिराने हजेरी लावल्याने पेरण्याही उशिराने सुरू झाल्या असून आतापर्यंत ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान गतवर्षापासून मका व सोयाबिनच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र मक्यावर यंदा मोठ्याप्रमाणावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याचे संकेत असून त्यादृष्टीने कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर कीटकनाशकही उपलब्ध करून दिले आहे.जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र कृषी आयुक्तालयाने वाढवून ८ लाख ८ हजार हेक्टर दाखविले असले तरीही सर्वसाधारणपणे ७ लाख २७ हजार हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रावरच प्रत्यक्षात लागवड होते. मागील वर्षी या पूर्ण क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यंदा ६ लाख ५० हजार हेक्टरवर पेरण्या झाल्याचा अधिकृत आकडा कृषी विभागाकडे प्राप्त झाला असला तरीही हा आकडा जुना असून त्यात आता वाढ होऊन सुमारे ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.कापसाची ४ लाख ५८ हजार हेक्टरवर पेरणीजिल्ह्यातील सर्वाधिक ५ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे असून आतापर्यंत ४ लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. मात्र हे क्षेत्र ५ लाख हेक्टरच्यावर जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.मक्यावर लष्करी अळीमक्याचे सरासरी क्षेत्र ८८ हजार ७८४ हेक्टर असले तरी आतापर्यंत ७३ हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. हे क्षेत्र ८५ हजार हेक्टरपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. मात्र मक्यावर जेथे लागवड जास्त आहे, तेथे आतापासूनच अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्णातील १५ तालुक्यातील १७ डिलर्सकडे औषधी ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली आहेत. याखेरीज कापूस, सोयाबीन व ज्वारीवर विविध किडींसाठीचे कीटकनाशकेही ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी नजीकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.शेतकऱ्यांनी त्यांनी लागवड केलेल्या पिकासाठी स्वयंघोषणापत्र सादर करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परवाना प्राप्त करून घ्यायचा आहे.हा परवाना महाराष्टÑ कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्यामार्फत त्यांच्या अधिकृत डीलरकडे देऊन ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके उचल करावीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.पावसाने दडी मारल्याने चिंतापावसाचे उशीरा आगमन झाले असले तरीही जिल्ह्यात पावसाने बºयापैकी हजेरी लावली आहे. जून व जुलैची मिळून पावसाची सरासरी २३०.१ मिमी असली तरीही आतापर्यंत त्यापैकी १७०.८ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच संपूर्ण पावसाळ्यात होणाºया पावसाच्या २५.८ टक्के पाऊस झाला आहे. मात्र गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाचा हा खंड जर वाढला तर मात्र पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होण्याची भिती आहे.तसेच ज्या पिकांची उगवण झाली आहे. त्यांच्यावर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे.पीकविम्यासाठी २४ पर्यंत मुदतपीक विम्यासाठीची मुदत वाढविण्यात आली असून २४ जुलै करण्यात आली आहे. त्यामुळे श्ोतकºयांची पीक विमा काढण्यासाठी गर्दी होत आहे. दरम्यान पीक विमा कंपनीतर्फे १९ रोजी सकाळी ११ वाजता अल्पबचत भवन येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव