शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

जळगाव जिल्ह्यात ९५ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:45 IST

पावसाने जास्त दडी मारल्यास अडचण

जळगाव : पावसाने यंदा उशिराने हजेरी लावल्याने पेरण्याही उशिराने सुरू झाल्या असून आतापर्यंत ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान गतवर्षापासून मका व सोयाबिनच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र मक्यावर यंदा मोठ्याप्रमाणावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याचे संकेत असून त्यादृष्टीने कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर कीटकनाशकही उपलब्ध करून दिले आहे.जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र कृषी आयुक्तालयाने वाढवून ८ लाख ८ हजार हेक्टर दाखविले असले तरीही सर्वसाधारणपणे ७ लाख २७ हजार हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रावरच प्रत्यक्षात लागवड होते. मागील वर्षी या पूर्ण क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यंदा ६ लाख ५० हजार हेक्टरवर पेरण्या झाल्याचा अधिकृत आकडा कृषी विभागाकडे प्राप्त झाला असला तरीही हा आकडा जुना असून त्यात आता वाढ होऊन सुमारे ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.कापसाची ४ लाख ५८ हजार हेक्टरवर पेरणीजिल्ह्यातील सर्वाधिक ५ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे असून आतापर्यंत ४ लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. मात्र हे क्षेत्र ५ लाख हेक्टरच्यावर जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.मक्यावर लष्करी अळीमक्याचे सरासरी क्षेत्र ८८ हजार ७८४ हेक्टर असले तरी आतापर्यंत ७३ हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. हे क्षेत्र ८५ हजार हेक्टरपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. मात्र मक्यावर जेथे लागवड जास्त आहे, तेथे आतापासूनच अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्णातील १५ तालुक्यातील १७ डिलर्सकडे औषधी ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली आहेत. याखेरीज कापूस, सोयाबीन व ज्वारीवर विविध किडींसाठीचे कीटकनाशकेही ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी नजीकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.शेतकऱ्यांनी त्यांनी लागवड केलेल्या पिकासाठी स्वयंघोषणापत्र सादर करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परवाना प्राप्त करून घ्यायचा आहे.हा परवाना महाराष्टÑ कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्यामार्फत त्यांच्या अधिकृत डीलरकडे देऊन ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके उचल करावीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.पावसाने दडी मारल्याने चिंतापावसाचे उशीरा आगमन झाले असले तरीही जिल्ह्यात पावसाने बºयापैकी हजेरी लावली आहे. जून व जुलैची मिळून पावसाची सरासरी २३०.१ मिमी असली तरीही आतापर्यंत त्यापैकी १७०.८ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच संपूर्ण पावसाळ्यात होणाºया पावसाच्या २५.८ टक्के पाऊस झाला आहे. मात्र गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाचा हा खंड जर वाढला तर मात्र पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होण्याची भिती आहे.तसेच ज्या पिकांची उगवण झाली आहे. त्यांच्यावर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे.पीकविम्यासाठी २४ पर्यंत मुदतपीक विम्यासाठीची मुदत वाढविण्यात आली असून २४ जुलै करण्यात आली आहे. त्यामुळे श्ोतकºयांची पीक विमा काढण्यासाठी गर्दी होत आहे. दरम्यान पीक विमा कंपनीतर्फे १९ रोजी सकाळी ११ वाजता अल्पबचत भवन येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव