शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात एटीएम कार्डच्या सक्तीमुळे बळीराजा वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:34 IST

पिक कर्जाची रक्कम काढण्यासाठी होते फरफट

जळगाव : जिल्ह्यात गावोगावी जिल्हा बँकेच्या शाखा नसताना व एटीएमची सुविधा नसताना पिक कर्ज मिळाले तरी रक्कम काढता येत नसल्याचा कटू अनुभव असल्याने यंदातरी एटीएमची सक्ती करून बळीराजास वेठीस धरु नका, अशी आर्त हाक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे. यासाठी वि.का. सोसायटीचे चेअरमनदेखील पुढे सरसावले असून पिक कर्ज थेट सभासदांच्या बचत खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.दरवर्षी नवीन आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू होते. दोन वर्षांपासून ही रक्कम मिळविण्याकरिता जिल्हा बँकेमार्फत केसीसी योजनेंतर्गत एटीएमची सक्ती करण्यात आली आहे. यात शेतकरी सभासदांना बँकेमार्फत एटीएम कार्ड देण्यात आले. सुरुवातीला तर बँकेमार्फत देण्यात आलेले हे कार्ड अनेक ठिकाणी चाललेच नाही. बँकेमार्फत तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सभासदांना पिक कर्ज मंजूर झाले तरी त्याला ते काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.एटीएमची सुविधा नाहीजिल्ह्यातील स्थिती पाहिली तर गावोगावी एटीएमच तर काय जिल्हा बँकेच्या शाखादेखील नाही. त्यामुळे शेतकरी किती वेठीस धरला जात आहे, हे या वरुन लक्षात येते, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या शाखा आहे, तेथे जाण्यासाठीच शेतकरी कसाबसा पोहचतो. त्यात आता तर एटीएमसाठी कसरत करण्याचीच वेळ शेतकºयांवर आली आहे.रक्कम जमा होताच झुंबडजिल्हाभरात जिल्हा बँकेचे कोठेच एटीएम नाही. ज्या गावांमध्ये इतर बँकांचे एटीएम आहे, तेथे सर्वच शेतकºयांना रक्कम मिळेल याची शाश्वती नसते. पिक कर्जाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा होताच एटीएमवर शेतकºयांची झुंबड होते. त्यामुळे काही शेतकºयांना रक्कम मिळते तर काही शेतकरी रिकाम्या हातानेच घरी परतात.एटीएमसाठी नाहक भुर्दंड, ५० कि.मी.पर्यंत फिराफीरजिल्ह्यात जिल्हा बँकेच्या शाखा नसल्याने शेतकºयांना इतर बँकेच्या एटीएममधून रक्कम काढावी लागते. त्यात पहिले तीन व्यवहार मोफत होतात, मात्र त्यानंतर एका व्यवहारासाठी २५ रुपये भुर्दंड शेतकºयांना सहन करावा लागतो. विशेष म्हणजे एका व्यवहारात पुरेसी रक्कम काढताच येत नाही, त्यामुळे एका पेक्षा जास्त वेळा रक्कम काढण्याची वेळ शेतकºयांवर येते व मोठा भूर्दंड शेतकºयांना सहन करावा लागतो. या सोबतच गावात रक्कम मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकºयांस ५० कि.मी.पर्यंत जावून रक्कम काढावी लागते.दुष्काळी स्थितीत भरणा केला, यंदा फिराफीर नकोगेल्या वर्षी कमी पावसामुळे शेतकरीवर्ग संकटात असून दुष्काळी परिस्थितीवर मात कर्जाची परफेड केली आहे, त्यामुळे यंदातरी एटीएमची सक्ती न करता फिराफीर करायला लावू नका, असे कळकळीची मागणी शेतकरी करीत आहे.वि.का.सो. चेअरमनकडून निवेदनया संदर्भात शुक्रवारी यावल तालुक्यातील वि.का.सोसायटींचे चेअरमन यांनी जिल्हा बँकेसह जिल्हा प्रशासन, जिल्हा उप निबंधकांना निवेदन देऊन सभासदांना २०१९-२० या वर्षाचे पिक कर्ज राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे सभासदांच्या बचत खात्यात जमा करावे, अशी मागणी केली.या वेळी यावल तालुक्यातील सांगवी बु. विकासो चेअरमन प्रशांत चौधरी, कैलास महाजन (चिखली बु.), रवींद्र पाटील, (आडगाव), भरत पाटील (नायगाव) प्रमोद बोरोले (बामणोद), शशिकांत पाटील (उंटावद), संजय महाजन (बोरावल), मुर्फत अली सैय्यद (मारूळ), भगवान सूर्यवंशी (चिंचोली) कोळी, (कोळन्हावी), सुरेश पाटील ( चिखली खुर्द), अर्जुन वामन चौधरी, (मनवेल), पद्माकर भिरूड (डोंगर कठोरा), किनगावचे माजी चेअरमन विनोदकुमार पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव