शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

जळगाव जिल्ह्यात एटीएम कार्डच्या सक्तीमुळे बळीराजा वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:34 IST

पिक कर्जाची रक्कम काढण्यासाठी होते फरफट

जळगाव : जिल्ह्यात गावोगावी जिल्हा बँकेच्या शाखा नसताना व एटीएमची सुविधा नसताना पिक कर्ज मिळाले तरी रक्कम काढता येत नसल्याचा कटू अनुभव असल्याने यंदातरी एटीएमची सक्ती करून बळीराजास वेठीस धरु नका, अशी आर्त हाक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे. यासाठी वि.का. सोसायटीचे चेअरमनदेखील पुढे सरसावले असून पिक कर्ज थेट सभासदांच्या बचत खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.दरवर्षी नवीन आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू होते. दोन वर्षांपासून ही रक्कम मिळविण्याकरिता जिल्हा बँकेमार्फत केसीसी योजनेंतर्गत एटीएमची सक्ती करण्यात आली आहे. यात शेतकरी सभासदांना बँकेमार्फत एटीएम कार्ड देण्यात आले. सुरुवातीला तर बँकेमार्फत देण्यात आलेले हे कार्ड अनेक ठिकाणी चाललेच नाही. बँकेमार्फत तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सभासदांना पिक कर्ज मंजूर झाले तरी त्याला ते काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.एटीएमची सुविधा नाहीजिल्ह्यातील स्थिती पाहिली तर गावोगावी एटीएमच तर काय जिल्हा बँकेच्या शाखादेखील नाही. त्यामुळे शेतकरी किती वेठीस धरला जात आहे, हे या वरुन लक्षात येते, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या शाखा आहे, तेथे जाण्यासाठीच शेतकरी कसाबसा पोहचतो. त्यात आता तर एटीएमसाठी कसरत करण्याचीच वेळ शेतकºयांवर आली आहे.रक्कम जमा होताच झुंबडजिल्हाभरात जिल्हा बँकेचे कोठेच एटीएम नाही. ज्या गावांमध्ये इतर बँकांचे एटीएम आहे, तेथे सर्वच शेतकºयांना रक्कम मिळेल याची शाश्वती नसते. पिक कर्जाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा होताच एटीएमवर शेतकºयांची झुंबड होते. त्यामुळे काही शेतकºयांना रक्कम मिळते तर काही शेतकरी रिकाम्या हातानेच घरी परतात.एटीएमसाठी नाहक भुर्दंड, ५० कि.मी.पर्यंत फिराफीरजिल्ह्यात जिल्हा बँकेच्या शाखा नसल्याने शेतकºयांना इतर बँकेच्या एटीएममधून रक्कम काढावी लागते. त्यात पहिले तीन व्यवहार मोफत होतात, मात्र त्यानंतर एका व्यवहारासाठी २५ रुपये भुर्दंड शेतकºयांना सहन करावा लागतो. विशेष म्हणजे एका व्यवहारात पुरेसी रक्कम काढताच येत नाही, त्यामुळे एका पेक्षा जास्त वेळा रक्कम काढण्याची वेळ शेतकºयांवर येते व मोठा भूर्दंड शेतकºयांना सहन करावा लागतो. या सोबतच गावात रक्कम मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकºयांस ५० कि.मी.पर्यंत जावून रक्कम काढावी लागते.दुष्काळी स्थितीत भरणा केला, यंदा फिराफीर नकोगेल्या वर्षी कमी पावसामुळे शेतकरीवर्ग संकटात असून दुष्काळी परिस्थितीवर मात कर्जाची परफेड केली आहे, त्यामुळे यंदातरी एटीएमची सक्ती न करता फिराफीर करायला लावू नका, असे कळकळीची मागणी शेतकरी करीत आहे.वि.का.सो. चेअरमनकडून निवेदनया संदर्भात शुक्रवारी यावल तालुक्यातील वि.का.सोसायटींचे चेअरमन यांनी जिल्हा बँकेसह जिल्हा प्रशासन, जिल्हा उप निबंधकांना निवेदन देऊन सभासदांना २०१९-२० या वर्षाचे पिक कर्ज राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे सभासदांच्या बचत खात्यात जमा करावे, अशी मागणी केली.या वेळी यावल तालुक्यातील सांगवी बु. विकासो चेअरमन प्रशांत चौधरी, कैलास महाजन (चिखली बु.), रवींद्र पाटील, (आडगाव), भरत पाटील (नायगाव) प्रमोद बोरोले (बामणोद), शशिकांत पाटील (उंटावद), संजय महाजन (बोरावल), मुर्फत अली सैय्यद (मारूळ), भगवान सूर्यवंशी (चिंचोली) कोळी, (कोळन्हावी), सुरेश पाटील ( चिखली खुर्द), अर्जुन वामन चौधरी, (मनवेल), पद्माकर भिरूड (डोंगर कठोरा), किनगावचे माजी चेअरमन विनोदकुमार पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव