शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात एटीएम कार्डच्या सक्तीमुळे बळीराजा वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:34 IST

पिक कर्जाची रक्कम काढण्यासाठी होते फरफट

जळगाव : जिल्ह्यात गावोगावी जिल्हा बँकेच्या शाखा नसताना व एटीएमची सुविधा नसताना पिक कर्ज मिळाले तरी रक्कम काढता येत नसल्याचा कटू अनुभव असल्याने यंदातरी एटीएमची सक्ती करून बळीराजास वेठीस धरु नका, अशी आर्त हाक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे. यासाठी वि.का. सोसायटीचे चेअरमनदेखील पुढे सरसावले असून पिक कर्ज थेट सभासदांच्या बचत खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.दरवर्षी नवीन आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू होते. दोन वर्षांपासून ही रक्कम मिळविण्याकरिता जिल्हा बँकेमार्फत केसीसी योजनेंतर्गत एटीएमची सक्ती करण्यात आली आहे. यात शेतकरी सभासदांना बँकेमार्फत एटीएम कार्ड देण्यात आले. सुरुवातीला तर बँकेमार्फत देण्यात आलेले हे कार्ड अनेक ठिकाणी चाललेच नाही. बँकेमार्फत तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सभासदांना पिक कर्ज मंजूर झाले तरी त्याला ते काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.एटीएमची सुविधा नाहीजिल्ह्यातील स्थिती पाहिली तर गावोगावी एटीएमच तर काय जिल्हा बँकेच्या शाखादेखील नाही. त्यामुळे शेतकरी किती वेठीस धरला जात आहे, हे या वरुन लक्षात येते, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या शाखा आहे, तेथे जाण्यासाठीच शेतकरी कसाबसा पोहचतो. त्यात आता तर एटीएमसाठी कसरत करण्याचीच वेळ शेतकºयांवर आली आहे.रक्कम जमा होताच झुंबडजिल्हाभरात जिल्हा बँकेचे कोठेच एटीएम नाही. ज्या गावांमध्ये इतर बँकांचे एटीएम आहे, तेथे सर्वच शेतकºयांना रक्कम मिळेल याची शाश्वती नसते. पिक कर्जाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा होताच एटीएमवर शेतकºयांची झुंबड होते. त्यामुळे काही शेतकºयांना रक्कम मिळते तर काही शेतकरी रिकाम्या हातानेच घरी परतात.एटीएमसाठी नाहक भुर्दंड, ५० कि.मी.पर्यंत फिराफीरजिल्ह्यात जिल्हा बँकेच्या शाखा नसल्याने शेतकºयांना इतर बँकेच्या एटीएममधून रक्कम काढावी लागते. त्यात पहिले तीन व्यवहार मोफत होतात, मात्र त्यानंतर एका व्यवहारासाठी २५ रुपये भुर्दंड शेतकºयांना सहन करावा लागतो. विशेष म्हणजे एका व्यवहारात पुरेसी रक्कम काढताच येत नाही, त्यामुळे एका पेक्षा जास्त वेळा रक्कम काढण्याची वेळ शेतकºयांवर येते व मोठा भूर्दंड शेतकºयांना सहन करावा लागतो. या सोबतच गावात रक्कम मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकºयांस ५० कि.मी.पर्यंत जावून रक्कम काढावी लागते.दुष्काळी स्थितीत भरणा केला, यंदा फिराफीर नकोगेल्या वर्षी कमी पावसामुळे शेतकरीवर्ग संकटात असून दुष्काळी परिस्थितीवर मात कर्जाची परफेड केली आहे, त्यामुळे यंदातरी एटीएमची सक्ती न करता फिराफीर करायला लावू नका, असे कळकळीची मागणी शेतकरी करीत आहे.वि.का.सो. चेअरमनकडून निवेदनया संदर्भात शुक्रवारी यावल तालुक्यातील वि.का.सोसायटींचे चेअरमन यांनी जिल्हा बँकेसह जिल्हा प्रशासन, जिल्हा उप निबंधकांना निवेदन देऊन सभासदांना २०१९-२० या वर्षाचे पिक कर्ज राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे सभासदांच्या बचत खात्यात जमा करावे, अशी मागणी केली.या वेळी यावल तालुक्यातील सांगवी बु. विकासो चेअरमन प्रशांत चौधरी, कैलास महाजन (चिखली बु.), रवींद्र पाटील, (आडगाव), भरत पाटील (नायगाव) प्रमोद बोरोले (बामणोद), शशिकांत पाटील (उंटावद), संजय महाजन (बोरावल), मुर्फत अली सैय्यद (मारूळ), भगवान सूर्यवंशी (चिंचोली) कोळी, (कोळन्हावी), सुरेश पाटील ( चिखली खुर्द), अर्जुन वामन चौधरी, (मनवेल), पद्माकर भिरूड (डोंगर कठोरा), किनगावचे माजी चेअरमन विनोदकुमार पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव