शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 12:51 IST

पावसाने आताच गाठली गतवर्षीची सरासरी

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा मुक्काम दुसºया दिवशीही कायम आहे. सोमवारी रात्रभर पाऊस सुरूच होता. जळगाव शहरातसह मंगळवारी दुपारपर्यंत सूर्यदर्शन झालेले नव्हते.चाळीसगाव तालुक्यात सोमवारी दुपारी पाऊस सुरू झाला होता. जामनेरातही पाऊस सुरू असून रस्ते, शेतातून पाणी वाहून निघाले. चोपडा तालुक्यातही रविवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली.मागील वर्षी आॅक्टोबर अखेर जिल्ह्यात सरासरी ७२.२ टक्के पाऊस झाला होता. ही सरासरी यंदा आॅगस्टचा एक आठवडाच बाकी असताना गाठली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७२ टक्के पाऊस झाला आहे. मात्र चाळीसगाव तालुक्यात अद्यापही जोरदार पावसाची गरज आहे. सोमवारी पावसाने चाळीसगाव तालुक्यासह जिल्हाभरात हजेरी लावली. दरम्यान चाळीसगाव तालुक्यात अद्यापही ६ गावांना ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.शासकीय पावसाळा हा जून ते सप्टेंबर या कालावधीत असतो. त्यानुसार गतवर्षी ३० सप्टेंबर अखेर सुमारे ६८ टक्के पाऊस झाला होता. मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर खंड पडला होता. त्यानंतर आॅक्टोबरअखेरपर्यंत पडलेल्या पावसामुळे सरासरी ७२.२ टक्के झाली होती. मात्र यंदा आॅगस्टचा एक आठवडा बाकी असतानाच गत वर्षीची सप्टेंबरची सरासरी ओलांडली असून आॅक्टोबर अखेरच्या सरासरीचीही बरोबरी केली आहे.मुक्ताईनगरची आघाडीमुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक ८६ टक्के पाऊस झाला आहे. तर १५ पैकी ९ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीची सत्तरी पार केली आहे. त्यात मुक्ताईनगरसह यावल ८५.१ टक्के, जामनेर ७८.७ टक्के, एरंडोल ७३.९ टक्के, भुसावळ ७७.९ टक्के, रावेर ७८.६ टक्के, बोदवड ७९ टक्के, पारोळा ७०.५, चोपडा तालुक्यात ७१.५ टक्के पाऊस झाला आहे.चाळीसगाव तालुक्यात ५३.१ टक्के पाऊसचाळीसगाव तालुक्यात मात्र जिल्ह्यात सर्वात कमी ५३.१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील टँकर बंद झाले असले तरीही चाळीसगाव तालुक्यात मात्र अद्यापही ६ गावांना ४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान जळगाव तालुक्यात ६७.६ टक्के, धरणगाव ६९.५ टक्के, पाचोरा ६८ टक्के, भडगाव ६३ टक्के, अमळनेर तालुक्यात ६५.९ टक्के पाऊस झाला आहे.शहरात १० दिवसांनंतर पाऊसजळगाव शहरात २३ जुलै पासून पावसाचे आगमन झाले. तेव्हापासून पावसाने दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता सातत्याने हजेरी लावली आहे. संततधार पावसानंतर दहा दिवसांचा खंड पावसाने दिला. त्यानंतर सोमवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी पहाटेच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आधीच खराब झालेल्या रस्त्यांवर चिखल व पाण्याचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव