शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 12:51 IST

पावसाने आताच गाठली गतवर्षीची सरासरी

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा मुक्काम दुसºया दिवशीही कायम आहे. सोमवारी रात्रभर पाऊस सुरूच होता. जळगाव शहरातसह मंगळवारी दुपारपर्यंत सूर्यदर्शन झालेले नव्हते.चाळीसगाव तालुक्यात सोमवारी दुपारी पाऊस सुरू झाला होता. जामनेरातही पाऊस सुरू असून रस्ते, शेतातून पाणी वाहून निघाले. चोपडा तालुक्यातही रविवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली.मागील वर्षी आॅक्टोबर अखेर जिल्ह्यात सरासरी ७२.२ टक्के पाऊस झाला होता. ही सरासरी यंदा आॅगस्टचा एक आठवडाच बाकी असताना गाठली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७२ टक्के पाऊस झाला आहे. मात्र चाळीसगाव तालुक्यात अद्यापही जोरदार पावसाची गरज आहे. सोमवारी पावसाने चाळीसगाव तालुक्यासह जिल्हाभरात हजेरी लावली. दरम्यान चाळीसगाव तालुक्यात अद्यापही ६ गावांना ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.शासकीय पावसाळा हा जून ते सप्टेंबर या कालावधीत असतो. त्यानुसार गतवर्षी ३० सप्टेंबर अखेर सुमारे ६८ टक्के पाऊस झाला होता. मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर खंड पडला होता. त्यानंतर आॅक्टोबरअखेरपर्यंत पडलेल्या पावसामुळे सरासरी ७२.२ टक्के झाली होती. मात्र यंदा आॅगस्टचा एक आठवडा बाकी असतानाच गत वर्षीची सप्टेंबरची सरासरी ओलांडली असून आॅक्टोबर अखेरच्या सरासरीचीही बरोबरी केली आहे.मुक्ताईनगरची आघाडीमुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक ८६ टक्के पाऊस झाला आहे. तर १५ पैकी ९ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीची सत्तरी पार केली आहे. त्यात मुक्ताईनगरसह यावल ८५.१ टक्के, जामनेर ७८.७ टक्के, एरंडोल ७३.९ टक्के, भुसावळ ७७.९ टक्के, रावेर ७८.६ टक्के, बोदवड ७९ टक्के, पारोळा ७०.५, चोपडा तालुक्यात ७१.५ टक्के पाऊस झाला आहे.चाळीसगाव तालुक्यात ५३.१ टक्के पाऊसचाळीसगाव तालुक्यात मात्र जिल्ह्यात सर्वात कमी ५३.१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील टँकर बंद झाले असले तरीही चाळीसगाव तालुक्यात मात्र अद्यापही ६ गावांना ४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान जळगाव तालुक्यात ६७.६ टक्के, धरणगाव ६९.५ टक्के, पाचोरा ६८ टक्के, भडगाव ६३ टक्के, अमळनेर तालुक्यात ६५.९ टक्के पाऊस झाला आहे.शहरात १० दिवसांनंतर पाऊसजळगाव शहरात २३ जुलै पासून पावसाचे आगमन झाले. तेव्हापासून पावसाने दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता सातत्याने हजेरी लावली आहे. संततधार पावसानंतर दहा दिवसांचा खंड पावसाने दिला. त्यानंतर सोमवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी पहाटेच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आधीच खराब झालेल्या रस्त्यांवर चिखल व पाण्याचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव