शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात २० हजार नवीन मतदारांची जिल्ह्यात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:07 IST

१९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध होणार अंतिम यादी

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ निहाय अंतिम मतदार यादी १९ आॅगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे १९ आॅगस्टपर्यंत आचारसंहिता लागू होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक विभागाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदार नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात २० हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. २७ व २८ जुलै रोजी पुन्हा विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्यांची नावे नोंदविणे बाकी असेल अशा मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुका होणार का? अशी चर्चा सुरू होती. मात्र विधानसभा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे नंतर स्पष्ट झाले. मात्र आता निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार? याबाबत उत्सुकता आहे.त्यादृष्टीने आमदारांकडून कामे तातडीने मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र निवडणूक आयोगाकडून आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार विधानसभेसाठीची अंतीम मतदार यादी १९ आॅगस्टला प्रसिद्ध होणार आहे. ही मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागणार असल्याने १९ आॅगस्टपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असे स्पष्ट झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन दिवस विशेष मतदार नोंदणी मोहीमभारत निवडणूक आयोगाकडील ११ जुलैच्या पत्रान्वये १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा संक्षिप्त कार्यक्रम सध्या सुरू आहे.सदर कार्यक्रमानुसार १५ ते ३०जुलै २०१९ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. १५ ते ३० जुलै या कालावधीत मतदार नोंदणी मोहीम राबविली जात असून २७ व २८ जुलै रोजी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्यात नवीन मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, नाव एका भागातून दुसरीकडे स्थलांतरीत करणे आदी कामे तातडीने केली जाणार आहेत. नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान १५ ते २१ जुलै या कालावधीत एकूण ५ हजार २८ अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले. त्यात नवीन मतदार नोंदणीचे २९५५ अर्ज, नाव वगळण्यासाठीचे ११२० अर्ज तर नावात दुरुस्तीचे ८५६ व स्थलांतराचे ९७ अर्ज प्राप्त झाले आहेत.दुरुस्तीसाठी आले ३७ हजार अर्जलोकसभा निवडणुकीसाठी अंतीम मतदार यादी ३१ जानेवारी रोजी जाहीर झाली होती. त्यावेळी जिल्ह्यात ३४ लाख ५ हजार २६८ मतदार होते. तर हीच संख्या १५ जुलै २०१९ पर्यंत ३४ लाख २६ हजार ४०६ वर पोहोचली. ३१ जानेवारीपासून आजपर्यंत नवीन नोंदणीसाठी ३४ हजार ८०१ मतदारांचे अर्ज आले असून नाव वगळण्यासाठी १४ हजार १७६ अर्ज, नावात दुरूस्तीसाठी ३७ हजार १२५ अर्ज तर स्थलांतराचे १०२५ अजर् आले आहेत. त्यानुसार नवीन मतदारांमध्ये आतापर्यंत २० हजारांची भर पडली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव