शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात २० हजार नवीन मतदारांची जिल्ह्यात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:07 IST

१९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध होणार अंतिम यादी

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ निहाय अंतिम मतदार यादी १९ आॅगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे १९ आॅगस्टपर्यंत आचारसंहिता लागू होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक विभागाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदार नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात २० हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. २७ व २८ जुलै रोजी पुन्हा विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्यांची नावे नोंदविणे बाकी असेल अशा मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुका होणार का? अशी चर्चा सुरू होती. मात्र विधानसभा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे नंतर स्पष्ट झाले. मात्र आता निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार? याबाबत उत्सुकता आहे.त्यादृष्टीने आमदारांकडून कामे तातडीने मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र निवडणूक आयोगाकडून आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार विधानसभेसाठीची अंतीम मतदार यादी १९ आॅगस्टला प्रसिद्ध होणार आहे. ही मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागणार असल्याने १९ आॅगस्टपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असे स्पष्ट झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन दिवस विशेष मतदार नोंदणी मोहीमभारत निवडणूक आयोगाकडील ११ जुलैच्या पत्रान्वये १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा संक्षिप्त कार्यक्रम सध्या सुरू आहे.सदर कार्यक्रमानुसार १५ ते ३०जुलै २०१९ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. १५ ते ३० जुलै या कालावधीत मतदार नोंदणी मोहीम राबविली जात असून २७ व २८ जुलै रोजी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्यात नवीन मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, नाव एका भागातून दुसरीकडे स्थलांतरीत करणे आदी कामे तातडीने केली जाणार आहेत. नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान १५ ते २१ जुलै या कालावधीत एकूण ५ हजार २८ अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले. त्यात नवीन मतदार नोंदणीचे २९५५ अर्ज, नाव वगळण्यासाठीचे ११२० अर्ज तर नावात दुरुस्तीचे ८५६ व स्थलांतराचे ९७ अर्ज प्राप्त झाले आहेत.दुरुस्तीसाठी आले ३७ हजार अर्जलोकसभा निवडणुकीसाठी अंतीम मतदार यादी ३१ जानेवारी रोजी जाहीर झाली होती. त्यावेळी जिल्ह्यात ३४ लाख ५ हजार २६८ मतदार होते. तर हीच संख्या १५ जुलै २०१९ पर्यंत ३४ लाख २६ हजार ४०६ वर पोहोचली. ३१ जानेवारीपासून आजपर्यंत नवीन नोंदणीसाठी ३४ हजार ८०१ मतदारांचे अर्ज आले असून नाव वगळण्यासाठी १४ हजार १७६ अर्ज, नावात दुरूस्तीसाठी ३७ हजार १२५ अर्ज तर स्थलांतराचे १०२५ अजर् आले आहेत. त्यानुसार नवीन मतदारांमध्ये आतापर्यंत २० हजारांची भर पडली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव