शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जळगावात ठेवीदारांच्या ‘थाली बजाओ’ आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 12:52 IST

बीएचआरच्या ठेवींसाठी आढावा बैठक

ठळक मुद्देराज्यभरातील ठेवीदारांचा आंदोलनात सहभागबीएचआरच्या अवसायकांनी सादर केला आढावा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३० - राज्यभरात २६४ शाखांच्या १ लाख ठेवीदारांचे ७०० कोटी अडकून पडल्याने गेल्या ४ वषार्पासून त्रस्त असलेल्या राज्यभरातील ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी ‘थाली बजाओ’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता. आंदोलनाची दखल घेऊन अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी तत्काळ आढावा बैठक घेऊन बीएचआरच्या अवसायकांकडून वसुली व ठेवीचा गोषवारा घेत ठेवी तत्काळ मिळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे, समन्वयक श्रीकृष्ण शिरोळे, डी.टी.नेटके, कमल सुरेश भिरूड यांच्या नेतृत्वात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १ वाजता थाली बजाओ आंदोलन करण्याक आले. बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे, जिल्हा विशेष लेखापरिक्षक रावसाहेब जंगले, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर व रावेर, यावल, भुसावळ तसेच जळगाव तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांच्यासोबत ठेवी परत करण्याच्या उपाययोजना राबविण्याची विशेष आढावा बैठक बोलाविण्यात यावी अशी मागणी लावून धरली होती. अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याची दखल घेऊन दुपारी ३ वाजता बैठकीचे आयोजन केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.बीएचआरच्या अवसायकांनी सादर केला आढावाभाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या प्रलंबित ठेवींचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा म्हणून संघटनेच्या वतीने संस्थेचे लेखापरिक्षण १ महिन्यात पूर्ण करून सार्वजनिक करावे, संस्थेची ठेव वाटपाची पद्धत पारदर्शी असावी म्हणून वसुली व वाटप केलेल्या ठेवींचा अहवाल मिळावा, संघटनेच्या ४०-४५ ठेवीदारांच्या हार्डशीप प्रकरण म्हणून मान्यता मिळून सुद्धा देण्यात न आलेल्या १०० टक्के ठेवी परत मिळाव्यात, संस्थेच्या संशयीत आरोपी संचालकांच्या मालमत्ता जप्तीची व विक्रीची कार्यवाही व्हावी व एमपीआयडी कायद्याप्रमाणे ठेवीदारांना ठेवी वाटप व्हाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडे प्रलंबित असलेल्या अधिसूचना प्रसिद्धीच्या कार्यवाहीचा अवसायक व जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा करावा अशा मागण्या करत निवेदन देवून संस्थेच्या अवसायकांची तक्रार संघटनेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी गाडीलकर यांच्याकडे बैठकीत करण्यात आली. यावेळी अवसायक कंडारे यांनी महिनाभरात वसुली व ठेवी वाटपाचा अहवाल तसेच संघटनेच्या मागण्यांचा विस्तृत अहवाल देण्याचे जाहीर केले. लेखापरिक्षण अंतिम टप्प्यात असून १५ जुलै पर्यंत लेखापरिक्षण अहवाल देण्याचे मान्य केले. संस्थेच्या ३० हजारापर्यंतच्या ठेव वाटपाच्या धोरणाला संघटनेचा विरोध असल्याचे बैठकीत बोलून दाखविण्यात आल्यानंतर पारदर्शी धोरण असण्यासाठी जनसंग्राम ठेवीदार संघटनेशी यापुढे समन्वय व सतत संपर्क ठेवला जाईल असे नमूद केल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.५० हजारापुढील ठेवी वाटपाला लवकर सुरूवात करण्याच्या ठेवीदारांच्या मागणीला त्यांनी होकार दर्शविल्याचेही संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. अवसायक कंडारे यांनी संस्थेचा संपूर्ण आढावा बैठकीत सादर केला.५०० कोटींच्या विशेष अर्थसहाय्यासाठी ठेवीदार आग्रहीबैठकीत बीएचआर संस्थेनंतर जळगाव जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या व अडचणीत नसलेल्या सर्वच पतसंस्थांच्या ठेवीदारांना ठेवी परत करण्याचा ठोस कृती कार्यक्रम राबविण्यात यावा, जिल्हाधिकाऱ्यांनी दर पंधरवाड्यात याचा आढावा घ्यावा, अनियमितता करणाºया पतसंस्था चालकांवर ई.डी.अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात यावी व शासनाकडून ५०० कोटींचे विशेष अर्थसहाय्य मिळवून ठेवीदारांना न्याय द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या. याबाबत जिल्हा उपनिबंधक जाधवर यांनी अर्थसहाय्य नाकारलेल्या व ठेवी परत न करू शकलेल्या संस्थांवर तसेच अर्थसहाय्याची मुदतीत रक्कम परत न करणाºया संस्थांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करणार असल्याचे नमूद केले, असे विवेक ठाकरे यांनी कळविले. ठेवीदारांसाठी शासनाकडे विशेष अर्थसहाय्य मागणीच्या प्रस्तावावर जिल्हा प्रशासनाच्या शिफारशीनंतर पाठपुरावा करण्यात येईल तसेच ठेव पावत्यांच्या बदल्यात लिलावातून ठेवी परत करण्यावर भर राहील असे जाहिर केल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान रावेर, यावल, भुसावळ व जळगाव तालुक्यातील संस्थांचा नियमित आढावा घेण्याचे स्पष्ट केले.जनसंग्राम बहुजन लोकमंच संलग्न महाराष्ट्र राज्य ठेवीदार समितीच्या पदाधिकाºयांनी व ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले. बैठकीला बीचएचआर पतसंस्थेच्या वसुली पथकाचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी - कर्मचारी यांच्यासह ठेवीदार संघटनेचे प्रातिनिधीक शिष्टमंडळाची उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्ताविक डी.टी.नेटके यांनी तर श्रीकृष्ण शिरोळे यांनी आभार मानले.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव