शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

जळगाव मतदारसंघ तर भाजपाचा बालेकिल्ला - भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 15:37 IST

विकासात्मक भूमिकेमुळे जनतेचे पाठबळ कायम

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. स्व. उत्तमराव पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघाचा विकास भाजपाने केला असून जनतेचा भाजपावर पूर्ण विश्वास असल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या जिल्हाध्यक्षांची भूमिका आणि जळगाव मतदारसंघातील एक प्रबळ दावेवार असलेल्या उदय वाघ यांच्याशी ‘लोकमत’ने ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमात संवाद साधला. त्यावेळी वाघ यांनी मनमोकळी चर्चा केली.प्रश्न : पण तुम्ही स्वत: इच्छा व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्याचे काय?वाघ : विषय तसा नव्हता. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे अमळनेरला आले असताना त्यांनी पुढील उमेदवार हे ए.टी.पाटील असतील, असे जाहीर केले होते. त्यानंतर मला काही पत्रकारांनी जिल्हाध्यक्ष या नात्याने प्रश्न विचारला असता मी भाजपामध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया असते. एकापेक्षा अनेक इच्छुक असतात. मलाही वाटते की, मी लोकसभा निवडणूक लढवावी. तसे अनेकांना वाटू शकते. पक्षाची केंद्रीय संसदीय समिती या सगळ्यांच्या मुलाखती घेते, उमेदवाराचे मूल्यांकन करते आणि नंतर उमेदवार निश्चित होतो, असे स्पष्टीकरण दिले होते.प्रश्न : पक्षाने तुमच्याकडे दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली, हा तुमच्या संघटनात्मक गुणांचा गौरव म्हणावा लागेल?वाघ : मी मघाशी म्हटले की, मी निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती मी संपूर्ण क्षमतेने पार पाडत आलो आहे. पक्ष केंद्र व राज्यात सत्तेत असताना मला जिल्हाध्यक्षपदी मुदतवाढ मिळाली, याचा मला खूप आनंद झाला. माझ्या सर्व पदाधिकारी आणि सहकाºयांच्या प्रयत्न आणि कष्टामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपा थेट ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षी झालेल्या ४९८ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने ३७२ ठिकाणी लोकनियुक्त सरपंचपद मिळविले. सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांवर भाजपाने चांगले यश मिळविले आहे.प्रश्न : पाच वर्षातील भाजपा सरकारची जिल्ह्याच्या दृष्टीने उपलब्धी काय सांगाल ?वाघ : जलसंपदा विभागाची मोठी कामे या काळात झालेली आहे. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या उभारणीत अनेक तांत्रिक अडचणी होत्या. पर्यावरण विभाग, जलआयोगाच्या मंजुरी बाकी होत्या. आता सगळे अडथळे दूर झाले आहेत. नाबार्डच्या निधीतून या धरणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. गिरणा नदीवरील बलून बंधाºयांना मान्यता मिळाली आहे. नार-पार योजनेसाठी निधी देण्याचे केंद्र सरकारने मान्य केल्याने गुजरातमध्ये जाणारे पाणी गिरणा नदीत वळवता येणार आहे. ग्रामीण रस्ते ते महामार्ग, नव्या रेल्वे गाड्या, विमानसेवा अशा दळणवळणाच्या साधनांमध्ये सुधारणा झाली आहे. त्याचा परिणाम नवे उद्योग येण्यात आणि रोजगार वाढण्यात निश्चित होईल.प्रश्न : लोकसभा निवडणूक लढविण्यास तुम्ही इच्छुक आहात काय?वाघ : मी भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी प्रामाणिकपणे पार पाडत आलो आहे. भाजपामधील कार्यकर्ता हा कोºया पाकिटासारखा असतो. पक्ष पाकिटावर जबाबदारी लिहितो आणि कार्यकर्ता ती प्रामाणिकपणे निभावतो. ही भाजपामधील कार्यसंस्कृती आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव