शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात ‘शिवभोजन’साठी आठ केंद्र निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 11:57 IST

वर्दळीच्या ठिकाणी मिळणार भोजन

जळगाव - राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘शिवभोजन’ योजनेची २६ जानेवारीपासून अंमलबजावणी होणार असून त्यासाठी जळगाव शहरातील वर्दळीची आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी केंद्र सुरू करण्यासाठी नऊ जणांनी अर्ज केले असून त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी दहा रूपयात ‘शिवभोजन’ योजनेची घोषणा केली होती. सत्तास्थापनेनंतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शनिवार, ४ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे होते. या वेळी मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी उपस्थित होते. बैठकीत ‘शिवभोजन’ केंद्राच्या ठिकाणांबाबत चर्चा करण्यात आली. यात शासन निर्णयानुसार वर्दळीच्या ठिकाणी हे केंद्र असावे असे सुचीत करण्यात आले. त्यामुळे या केंद्रांसाठी शहरातील वर्दळीची आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे.या ठिकाणी असणार शिवभोजन केंद्रजिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅण्टीन, नवीन बस स्थानक परिसर, शासकीय रुग्णालय, रेल्वे स्थानक परिसर, गोलाणी मार्केट परिसर, तहसील कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय परिसर, शनिपेठ-बळीरामपेठ-रथचौक- भाजीबाजार परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती अशी आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणच्या केंद्रांसाठी नऊ जणांनी जिल्हास्तरीय समितीकडे अर्ज केले आहे. प्रत्येक केंद्रांसाठी किमान ७५ थाळी अशी एकूण ७०० थाळी जळगावसाठी मंजूर आहे. नऊ जणांच्या अर्जांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव