शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

जळगाव-औरंगाबाद चौपदरीकरण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:46 IST

गडकरींनी वर्षभरापूर्वी केली होती घोषणा : दुहेरी मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू

जळगाव : जळगाव ते औरंगाबाद  या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार नसून आता कॉँक्रिटीकरणातून दुहेरी मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची घोषणा  करून मंजुरीही दिल्याची घोषणा केली होती. जळगाव ते औरंगाबाद या मार्गावर प्रचंड वाहतूक आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या मार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करून दिवसाला दहा हजार वाहने या मार्गावरून ये-जा करीत असल्याचा अहवाल दिला होता. त्यातच हा मार्ग म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध आहे. अजिंठा लेणी याच मार्गावर असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची ये-जाही या मार्गावर मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळेच रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास मंजुरी मिळावी यासाठी राजकीय नेते मंडळींकडूनही पाठपुरावा सुरू होता. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे जळगाव दौ:यावर आले होते. या दौ:यात त्यांनी हजारो कोटींच्या रस्ते विकास कामांना मंजुरी दिली होती. त्यात जळगाव ते औरंगाबाद या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचाही समावेश होता. घोषणा  मंजुरी दिल्याप्रमाणे रस्त्याच्या कामाची निविदाही ई निविदा पद्धतीने प्रसिद्ध झाली मात्र ती चौपदरीकरण नव्हे तर दुहेरी मार्गाचे कॉँक्रिटीकरण करण्यासाठी असून त्यासाठी तीन ठप्पे निश्चित झाले. तीन टप्प्यातील ही निविदा असून संपूर्ण रस्त्याचे कॉँक्रिटीकरणातून काम केले जाणार आहे. सर्वसाधारणत: चौपदरीकरण असल्यास 15 मीटरचा रस्ता त्यात दुभाजक व दोन्ही बाजुने              साडेसात-साडेसात मीटरचे दोन मार्ग अशी रचना असते. मात्र नियोजित रस्ता हा 10 मीटरचा असून त्यात दोन्ही बाजूने पाच-पाच मीटरचे दोन मार्ग असतील. रस्त्यात ठिकठिकाणी उड्डाणपूल, पूल, मो:या,  शहरानजीकच्या रस्त्याच सिंगल दुभाजकही असेल. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या मार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता दुहेरी होत असल्याने मार्गावरील गावांमधील लोकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यातील 20 ते 25 वर्षाचा विचार करून या रस्त्याची निर्मिती केली जात असल्यामुळे वाढत्या रहदारीचा विचार करून चौपदरीणकरण आवश्यक होते अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत. टोल नसलेला रस्ता़़़ हे संपूर्ण काम बांधा, वापरा व कर वसूल करा या तत्त्वावरचा नसून इ.पी.सी. (इंजिनिअर प्रोक्युअरमेंट कंस्ट्रक्शन) या तत्त्वावर बांधण्यात येत आहे. त्या संदर्भातील               निविदाही त्याच पद्धतीची असून निविदा प्रक्रियेचा कालावधी 3 डिसेंबर 2016 ते 30 जानेवारी 2017 असा आहे.अंतर कायम, अडथळे जास्तचौपदरीकरणामुळे जळगाव औरंगाबाद हे अंतर अवघ्या तीन तासात पूर्ण करणे शक्य होणार होते कारण दुभाजक व कॉँक्रिटचा रस्ता हे शक्य होणार होते तर जळगाव- अजिंठा रस्ता चौपदरीकरणामुळे अर्धा ते पाऊण तासात पार करणे शक्य होणार होते मात्र आता या केवळ शक्यताच रहाणार आहेत.