शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

वीस दिवसांनी जळगाव कृषी बाजार समिती पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:06 IST

पहिल्याच दिवशी २५० क्विंटल लिलाव

जळगाव : संरक्षण भिंतीच्या मागणीसाठी आडत असोसिएशनने बंद पुकारल्यामुळे गेल्या वीस दिवसांपासून ठप्प असलेले बाजार समितीचे कामकाज सोमवारी पूर्वपदावर आले. अनेक दिवसांनी व्यवहार सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी २५० ते २७० क्विंटल पर्यंतच्या मालाचा लिलाव करण्यात आला़ येत्या दोन ते तीन दिवसातच कुंपणाचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा सभापतींनी केला आहे़गेल्या महिन्यात पहाटे बाजार समितीची संरक्षण भिंत पाडण्यात आली होती. त्यावरुन व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन असा वाद निर्माण झाला होता. बाजार समिती ठप्प झाल्याने शेतकरीही अडचणीत आलेले होते़व्यापाऱ्यांच्या मालाच्या सुरक्षेसाठी अखेर पत्र्याच्या कुंपणाचे काम विकासकांनी हाती घेतले आहे़ त्या पार्श्वभूमीवर सध्या बाजार समितीच्या संरक्षण भिंतीच्या जागी लोखंडी अँगल टाकण्यात आले आहे़ यावर पत्रे टाकूण तात्पुरत्या स्वरूपात कुंपण करण्यात येणार आहे़ हे काम आगामी आठ दिवसात झाले नाही तर आम्ही पुन्हा बंद पुकारू असा इशारा आडत असोसिएशनने दिला आहे.येत्या दोन ते तीन दिवसातच काम पूर्ण होईल, अशी माहिती सभापती कैलास चौधरी यांनी दिली. दरम्यान, मुळात व्यवहार ठप्प न नव्हतेच. बंद काळातही व्यवहार सुरूच होते, असा दावाही सभापतींनी केला आहे़ दरम्यान, व्यापारी संकुलाबाबत सुरु असलेला वाद संपुष्टात येण्याची शक्यता या निमित्ताने व्यक्त होत आहे.बंद मागे घेण्यात आल्यानंतर पहिल्या दिवशी सुमारे २८८ दुकाने सुरळीत सुरू झालेली आहेत़ सोमवारी ज्वारी, दादर, चना, मका, गहू, बाजरी, उदीड या मालाची सुमारे २५० क्ंिवटल पर्यंत लिलाव झाला़ खरेदी व विक्रेते दोघांमध्ये पहिल्या दिवस असल्याने उत्साह होता़व्यापाऱ्यांचा विरोध मावळलाव्यापाºयांचा संकुलाला ज्या तीव्रतेने विरोध होता, तो विरोध कालांतराने कमी होत होत अखेर आमच्या मालाच्या संरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्यास आम्ही बंद मागे घेऊ अशी भूमिका व्यापाºयांनी घेतली़ बाजार समितीला दिलेल्या पत्रातही त्यांनी व्यापारी संकुलालाला विरोध नसल्याचे म्हटले आहे, कदाचित हीच भूमिका त्यांनी आधी मांडली असती तर खूप दिवसांआधीच संरक्षण भिंतीचा प्रश्न मिटला असता, असे संचालकांमधून बोलले जात आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव