शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

विज्ञानातून चिरकाल टिकणारे योगदान देणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:12 IST

युवा संशोधक डॉ़ दिनेश सावंत

ज्ञान व महितीची सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे असते, लहानपणापासून संशोधन वृत्ती जोपासल्यास योग्य पद्धतीने मार्गक्रमण केल्यास एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ बनण्यास तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, - डॉ़ दिनेश सावंत-------------------------------------------------------आनंद सुरवाडे ।जळगाव : ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये एक संशोधक दडलेला असतो, गरज असते त्यांना योग्य दिशा देण्याची मार्गदर्शनाची़ एकीकडे संशोधकांची उणीव भासते, मात्र दुसरीकडे अभियांत्रिकीकडे कल अधिक दिसतो़ विज्ञानात मोठ्या संधी उपलब्ध असून यातून देशासाठी चिरकाळ टिकणारे योगदान तुम्ही देऊ शकता, असे मत युवा शास्त्रज्ञ डॉ़ दिनेश सावंत (धुळे) यांनी व्यक्त केले़ जळगावात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़प्रश्न : आपल्या संशोधक होण्याच्या प्रवासाबद्दल काय सांगाल ?डॉ़ सावंत : धुळे येथील जय हिंद महाविद्यालयातून बीएस्सी केली त्यानंतर अहमदनगर येथून एमएस्सी केली़ घरची परिस्थिती अगदी बेताची होती़ मात्र शिक्षणावर भर होता़ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएच.डी. केली़ यात बेस्ट थेसीस अवार्ड मिळाला़ युवा संशोधन पुरस्कार मिळाला, जपानला प्रा़ रायोजी नयोरी यांच्या मार्गदर्शनाखाली संधोधनाची संधी मिळाली़ जर्मनीत एक वर्ष संशोधन केले़ त्यानंतर आयआयटी धनबाद येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते़नुकतीच पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली़ संशोधन क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध असल्याचे बघून याबाबत सावंत इनोव्हेटीव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक महाविद्याल मार्गदर्शनपर व्याख्याने दिली जातात़ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी काय करावेग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्य सुप्त गुण असतात विज्ञानात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांच्यापर्यंत पोहचणे गरजेचे आहे़ आज संशोधकांची उणीव भासते, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या क्षेत्रात ते स्वत:सह परिसराचे भविष्य उज्ज्वल करू शकतात़संशोधनाचे देशसेवेत कसे महत्त्व आहेविज्ञान हा एक अमुलाग्र घटक आहे़ आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत़ प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा वाटा असतो विज्ञानातून नवनवीन संशोधन करून देशहित साधता येते, देशाचे नावलौकिक होतो.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव