शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुक्ताईनगर तालुक्यातील ‘त्या’ वाघाची हत्या झाल्याचे स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 11:20 IST

पुरावा नष्ट करण्यासाठी नदीत फेकले

ठळक मुद्देदोन दिवसात अहवाल येणारकातडी, नखे, सुळे व इतर सर्व अवयव शाबूत

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा गावालगत पूर्णानदीपात्रात मृतावस्थेत आढळून आलेल्या पट्टेदार वाघाची हत्या झाली असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच वन्यजीव अभ्यासकांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. या वाघाचे शवविच्छेदन सोमवार, १३ रोजी दुपारी १ वाजता चारठाणा येथे करण्यात आले. त्याचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होणार असून त्यात हत्या कशी झाली? हे स्पष्ट होणार आहे.थेरोळा येथे पट्टेदार वाघ रविवार, १२ आॅगस्ट रोजी मृतावस्थेत आढळून आला होता. त्यामुळे वन्यजीव अभ्यासक, तसेच वनविभागाच्या अधिकाºयांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली होती. रविवारी दुपारून हे अधिकारी व वन्यजीव अभ्यासक पोहोचल्यानंतर मृत वाघ पाण्यातून बाहेर काढण्यात आला.वीजप्रवाहाच्या धक्क्याने अथवा विष पाजल्यानेमृत्यूशेताच्या कुंपणावरील तारांमध्ये सोडलेल्या वीजप्रवाहाच्या धक्क्याने अथवा विष पाजल्यानेही झालेली असू शकते. मात्र मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाल व फोरेन्सिक रिपोर्टवरूनच स्पष्ट होणार आहे. त्यानंतर तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे विवेक देसाई यांनी सांगितले. त्यासाठी वन विभागासोबतच वन्यजीव अभ्यासक, पर्यावरण प्रेमी तपास करणार आहेत.कातडी, नखे, सुळे व इतर सर्व अवयव शाबूतमृत वाघाचे शरीर संपूर्णपणे कुजलेले होते. त्यासाठीच त्यास पाण्यात टाकून ठेवण्यात आलेले होते. मात्र त्याची कातडी, नखे, सुळे व इतर सर्व अवयव शाबूत असल्याने शिकारीच्या उद्देशाने ही हत्या झालेली नसल्याचे मत वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. तसेच या वाघाचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची हत्याच झाली आहे. मात्र ती ठरवून झालेली नसावी.वाघाला दोरीने बांधून ओढत आणलेवाघाची हत्या झाली आहे, हे स्पष्ट असले तरीही शिकारीच्या दृष्टीने ती झालेली नसल्याचा दावा उपवनसंरक्षक डी.डब्ल्यू. पगार यांनीही ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. वाघाची हत्या झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यास कमरेस व पुढील पायाला नायलॉनची दोरी बांधून ओढत आणून पाण्यात टाकण्यात आले. पाण्यात दोन-चार दिवस राहिल्याने वाघाच्या शरीर संपूर्णपणे कुजले असल्याचे त्यांनी सांगितले.मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाल व फोरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल.यापूर्वीचा वाघाचा मृत्यू नैसर्गिकयापूर्वी डोलारखेडा परिसरात एका शेतात वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. त्याचा शवविच्छेदन अहवाल तसेच फॉरेन्सिक विभागाचाही अहवाल वनविभागाला प्राप्त झाला होता. त्यात त्या वाघाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याचे तसेच विषबाधा झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले असल्याचे उपवनसंरक्षक पगार यांनी सांगितले.

टॅग्स :TigerवाघJalgaonजळगाव