शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

सिंचनावर पाण्यासारखा खर्च, तरीही शेती तहानलेलीच

By admin | Updated: October 3, 2015 00:14 IST

सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सरकारने प्रकल्पांवर अब्जावधी रुपयांचा खर्च केला तरी पाणी शेतार्पयत पोहचविण्याचे नियोजन न झाल्याने प्रकल्पातील पाणीसाठा शोभेचा ठरला आहे.

 

राज्यात सातत्याने मागास, मागास म्हणून हिणवल्या जाणा:या नंदुरबार जिल्ह्याला विकासाची दिशा देण्यास सरकारी धोरणच आणि बेफिकीर प्रशासन कसे जबाबदार आहे, याचे बोलके उदाहरण जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेचे आहे. सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सरकारने एकीकडे प्रकल्पांवर अब्जावधी रुपयांचा खर्च केला असला तरी पाणी शेतार्पयत पोहचविण्याचे कुठलेही नियोजन न झाल्याने जिल्ह्यातील अनेक प्रकल्पातील पाणीसाठा केवळ शोभेचा ठरला आहे.

राज्यात सरासरी सिंचन क्षेत्राच्या यादीत सर्वात शेवटी नंदुरबार जिल्ह्याचे नाव आहे. राज्याच्या सरासरी सिंचन क्षेत्राच्या तुलनेत निम्मे प्रमाण जिल्ह्याचे आहे. आतार्पयत जिल्ह्यातील सरासरी जेमतेम नऊ ते साडेनऊ टक्के शेती सिंचनाखाली आणण्यात शासनाला यश आले आहे. हे प्रमाण वाढवून जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी गेल्या 30 वर्षात अनेक प्रय} झाले. } झाले. स्वतंत्र तापी खोरे विकास मंडळाची स्थापना झाली. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’सारखी अवस्था या प्रकल्पांची झाली आहे.

नवीन सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांच्या कामांसाठी काही अडथळे होते, ते अडथळे दूर करण्याचे प्रय

या मंडळांतर्गत सर्व मंजुरीप्राप्त प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरविला गेला. पण हे सर्व होत असताना

तापी विकास मंडळाची स्थापना झाल्यानंतर गेल्या 18 वर्षात सिंचन प्रकल्पांवर जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या आसपास खर्च झाला; पण शेतक:यांच्या शेतात पाणी पोहचण्याचे प्रमाण अर्धा टक्काही वाढले नाही.

वास्तविक तापी विकास मंडळाची स्थापना झाल्यानंतर प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी चांगले नियोजन होईल, प्रकल्प मार्गी लागतील, सिंचनाचे क्षेत्र वाढेल अशी अपेक्षा शेतक:यांना लागून होती. परंतु या काळातही शेतक:यांची निराशा झाल्याने सहनशील व शांतताप्रिय असलेला जिल्ह्यातील शेतकरी प्रथमच रस्त्यावर आला आहे.

हक्काचे पाणी मिळावे यासाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच या भागातील शेतक:यांनी मोर्चा काढून अमरण उपोषण सुरू केल्याने आता शेतक:यांच्या सहनशीलतेचा बांधही फुटू लागल्याचे संकेत आहेत.

 

प्रकल्पांवर 951 कोटींचा खर्च

4तापी विकास महामंडळाची स्थापना झाल्यानंतर जिल्ह्यातील रखडलेल्या व मंजुरीप्राप्त प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी आतार्पयत 951 कोटी 46 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. परंतु प्रकल्पांची कामे करताना त्याचे नियोजन झाले नसल्याचे दिसून येते. विशेषत: या कामांमध्ये तापीवरील प्रकाशा प्रकल्पावर 176.39 कोटी व सारंगखेडा प्रकल्पावर 215 कोटी रुपये खर्च झाला आहे. या प्रकल्पांमध्ये गेल्या पाच वर्षापासून पाणीसाठा होत आहे. परंतु हे पाणी शेतात नेण्यासाठी योजना नाही. वास्तविक या भागात यापूर्वीच उपसा योजना राबविण्यात आल्या होत्या व त्या बंद व नादुरुस्त असल्याचे शासनकत्र्याना व प्रशासनालाही माहीत होते. त्यामुळे प्रकल्पाचे काम होत असताना या योजना कार्यान्वित करण्याचा उद्देशही असायला हवा होता. परंतु प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही अजूनही हवेत तीर मारणे सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांमध्ये 160 दशलक्ष घनमीटर सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु ते निकामी ठरले आहे. अशीच अवस्था कोराडी, देहली, शिवण, दरा, नागण या मध्यम प्रकल्पांची आहे. या प्रकल्पांची कामेही अर्धवट राहिली आहेत. त्यात पाणीसाठा दिसतो; पण तो निरुपयोगी आहे. लघु सिंचन प्रकल्पांची अवस्थाही अशीच आहे. या प्रकल्पांवर 185.68 कोटी रुपये खर्च झाला आहे; पण त्यांचीही फारशी उपयुक्तता नाही.