शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमधून अवैध उपसा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:13 IST

जामनेर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या वाघूर धरणाच्या बॅक वॉटरमधून वीज पंप लावून सर्रास पाण्याचा दिवसाढवळ्या उपसा सुरू असून प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झाल्याने पाणी टंचाईची भिती कायम आहे.

ठळक मुद्देपाऊस कमी झालेला असतांनाही पाण्याची पळवापळवीसंभाव्य टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने उपाय योजन्याची मागणी

जामनेर : शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर धरणातील पाण्याची स्थिती लक्षात घेत पालिकेने पाणी कपातीला सुरुवात केलेली असली तरी धरणातील बॅक वॉटरमधून वीज पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरुच असल्याचे दिसत आहे. पाटबंधारे विभाग व महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.यंदा सरासरीच्या केवळ ५५ टक्के इतकाच पाऊस झाला. परिणामी तालुक्यातील धरण, पाझर तलाव, पाटबंधारे प्रकल्प अपूर्ण भरलेले आहेत. कांग, वाघुर व सूर या नद्यांना मोठे पूर न गेल्याने वाघुर धरणातील पाणी साठ्यात अपेक्षीत वाढ झालेली नाही. सद्यस्थितीत एकमेव कांग प्रकल्पात समाधानकारक पाणी साठा असून तोंडापुर मध्यम प्रकल्पात फक्त २० टक्के साठा आहे. जुन अखेर पर्यंत तालुक्यात दहा गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. आॅगष्टमध्ये झालेल्या पावसाने टँकरची संख्या कमी झाली. सध्या टँकर नसले तरी पुढील महिन्यात ग्रामिण भागात पाणी टंचाईची तिव्रता वाढू शकते.तालुक्यातील हिवरखेडे बुद्रुक, खादगांव, हिंगणे, गंगापुरी, गारखेडे, शिंगाईत, मांडवे, चिंचखेडे, नेरी आदी बुडीत क्षेत्रातील पाण्ी साठ्यातून मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. संभाव्य टंचाई स्थिती लक्षात घेवुन संबंधीत विभागाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Waterपाणी