शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

किनगाव येथे मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:36 IST

किनगाव येथे राज्यस्तरीय मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा रविवारी घेण्यात आला. यात जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या सुमारे २५० विवाहेच्छुक युवक-युवतींनी व पालकांनी परिचय दिला.

ठळक मुद्देमेळाव्यात २५० युवक-युवतींनी दिला परिचयआजही शेती उत्तम-विलास पाटीलअनिष्ठ रुढींना फाटा द्या- जयश्री पाटील, तिलोत्तमा पाटील

यावल, जि.जळगाव : तालुक्यातील किनगाव येथे राज्यस्तरीय मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा रविवारी घेण्यात आला. यात जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या सुमारे २५० विवाहेच्छुक युवक-युवतींनी व पालकांनी परिचय दिला. त्यात समाजातील विधवा, घटस्फोटीत युवतींचाही समावेश होता. काही पालकांच्या संबंधाबाबत सकारात्मक बैठकाही पार पडल्या. किनगाव येथील युवकांनी एकत्रित येत येत या मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी राष्टÑवादीचे माजी कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील होते.राष्ट्रमाता जिजाऊचा वारसा घेत तालुक्यातील किनगाव येथील युवकांनी मराठा समाजातील लग्न पध्दतीची अवस्था बदलण्याच्या निर्धाराने आणि युवक-युवतींचा एकमेकांशी परिचय होऊन मनपसंतीचे संबंध व्हावेत या उदात्त हेतूने गावातील तरूणांनी या मेळाव्याचे नियोजन केले होते.याप्रसंगी अमळनेरच्या राष्टÑवादीच्या जि.प.सदस्या जयश्री पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना समाजातील अनिष्ठ रुढींना फाटा देवून आधुनिक विचार प्रणालीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर युवतीनी नोकरीवाला वर पाहिजे हा हट्ट धरण्यापेक्षा होतकरू, व्यावसायिक, प्रगतीशील व कष्टाळू शेतकरी यांनाही प्राधान्य देण्याचे आवाहन केले. मेळाव्यात सुमारे २५० युवक-युवतीनी आपला परीचय दिला. त्यात समाजातील विधवा, घटस्फोटीत युवतींचाही समावेश होता.आजही शेती उत्तम-विलास पाटीलकार्यक्रमाचे अध्यक्ष विलास पाटील यांंनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, मूळात मराठा समाज शेतकरी आहे. आमच्या पूर्वजांनी उत्तम शेती, मधम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असल्याचे म्हटले आहे. आज समाजातील मुलांचा व पालकांचा कल नोकरदारांकडे आहे. मात्र स्वत:च्या शेतकरी मुलासाठी मुलगी शेतकरी पाहतात आणि मुलीसाठी नोकरदाराची मागणी करतात, ही अवस्था बदलावयास पाहिजे. आजही शेती व्यवसाय हा उत्तम आहे. समाजाने अनिष्ठ रुढी बंद कराव्यात. समाजाने समाजातील युवक-युवतीसाठी स्पर्धा परीक्षांचे वर्ग उघडावे. तसेच समाज प्रबोधन व तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करावीत, असे आवाहन केले. लग्न मुहूर्त काढले जाते. मात्र लग्न वेळेवर लागत नाहीत तर मुहूर्त कशासाठी अशी विचारणा करत लग्नातील बडेजावपणाही कमी करावा. विनाकारण कर्ज काढून बडेजावपणा करू नये असे आवाहन पाटील यांनी केले.व्यासपिठावर माजी आमदार रमेश चौधरी, विजयकुमार पाटील, अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, तिलोत्तमा पाटील, नवाबखा तडवी, पं.स.उपसभापती उमाकांत पाटील, गोकुळ पाटील, दिनकर पाटील, अनिल साठे, सरपंच टिकाराम चौधरी, नायगावचे सरपंच एल.व्ही.पाटील, भीमराव पाटील, डॉ.विजय बोरसे, विरावलीचे नानाजी पाटील, एकनाथ बुधा पाटील, रवींद्र ठाकूर, दहिगावचे ललित पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील यांच्यासह समाजातील जिल्ह्यातून आलेले मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक एम.एच.पाटील यांनी, तर सूत्रसंचालन एन. आर. पाटील यांनी केले.आयोजक नंदकिशोर पाटील, उनिष पाटील, गुलाब पाटील, प्रमोद रामराव पाटील, उनिष कवठळकर, विनय पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह गावातील समाज बांधवांनी यशस्वतेसाठी परिश्रम घेतले.अंध युवकानेही दिला परिचयमूळचा किनगाव येथील रहिवाशी व सध्या जळगाव येथील एका बॅकेत लिपीक पदावर कार्यरत असेलला स्वप्नील भागवत पाटील या पदवीधर युवकाने आपला परिचय देताना वयाच्या १२ वर्षानंतर आंधळेपणा आल्याचे सांगून जिद्दीने नाशिक व पुणे येथे आपले शिक्षण पूर्ण करून इतिहास विषयात एम. ए केल्याचे सांगून वधूविषयी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल