शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

अमळनेर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 15:52 IST

अमळनेर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत चालली असून, ३३ गावांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, २१ गावांना विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

ठळक मुद्देतालुक्यातील ३३ गावांना होतोय टँकरने पाणीपुरवठा२१ गावांना विहीर अधिग्रहणगुरांचे होताहेत हालस्वतंत्र टँकरची मागणीसध्या सिंधी कॉलनी व धावडे येथून पुरवठा

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत चालली असून, ३३ गावांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, २१ गावांना विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र गुरांना पाणी अपूर्ण पडू लागल्याने ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी वाढीव टँकरची मागणी केली आहे.अमळनेर तालुक्यात अटाळे, पिंपळे बद्रूक, पिंपळे खुर्द, वाघोदा, निसर्डी, अंचलवाडी, डांगर बुद्रूक, भोरटेक मालपूर, धानोरा सबगव्हाण, शिरसाळे, झाडी, गलवाडे बुद्रूक, गलवाडे खुर्द, जैतपीर, खेडी, खरदे, वासरे, गडखांब, पिंपळी प्र.ज., आर्डी, अनोरे, भरवस, लोणपंचम, इंद्रापिंप्री, जानवे, धुपी, मांजर्डी, नगाव बुद्रूक, सुंदरपट्टी या गावांना पिण्याच्या पाण्याचे १६ टँकर सुरू आहेत. या गावांसाठी सध्या अमळनेर पालिकेच्या मालकीच्या सिंधी कॉलनी भागातील विहिरीवरून व तापी नदी काठावरील धावडे या दोन गावनवरून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यासह अजून २१ गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली आहे.अमळनेर, कळमसरे, करणखेडा, ढेकूसीम, दहिवद खुर्द, रढावण राजोरे, सोनखेडी, तळवाडे, कुºहे बुद्रूक, मेहेरगाव, टाकरखेडा, पिंगळवाडे, एकतास, लोंढवे, पाडसे, रामेश्वर खुर्द, रामेश्वर बुद्रूक, नंदगाव, लाडगाव, खवशी, एकरुखी, लोण, चारम तांडा आदी गावांना विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र दररोज जमिनीची पाणी पातळी खालावत चालली असल्याने प्रस्तावांची संख्या वाढत आहे. खेडी प्र. ज. व शिरूड या दोन गावांचेही टँकर प्रस्ताव आलेले आहेत. काही गावांना गुरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.तरवाडे येथे विहीर अधिग्रहणाने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. मात्र गुरांसाठी स्वतंत्र टँकर मागतो, प्रशासन देत नाही. माणसे व गुरांसाठी तीन टँकर घेऊन विहीर अधिग्रहण बंद करा, असे सांगतात. मात्र अमळनेरचे पाणी पिण्यायोग्य नाही.-रामकृष्ण पाटील, सरपंच, तरवाडे, ता.अमळनेरसुंदरपट्टी येथे अद्याप टँकर सुरू झालेले नाही. परिसरातून नागरिक पाणी आणत आहेत. गोशाळेतर्फे गुरांसाठी दररोज पाच हजार लीटरचे टँकर येत आहे.-सुरेश पाटील, सुंदरपट्टी, अमळनेरनगाव बुद्रूक येथे मागील वेळी झालेल्या बंधारे व जलयुक्तची कामे केल्याने चिखली नदीत पाणी अडवण्यात आले होते. परंतु ग्रामस्थांनी शेतीसाठी त्याचा उपसा केल्याने पाणी साठा संपला, अन्यथा ते पाणी किमान मेपर्यंत पुरले असते. अनेकवेळा तक्रारी करूनही संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने उपसा थांबवण्यात येऊ शकला नाही.-महेश पाटील, नगावसध्या सिंधी कॉलनी व धावडे येथून पुरवठा होत आहे. मात्र तापीचे आवर्तन सुटल्यास जळोद येथून व पांझरेतून आवर्तन सोडल्यास भिलाली, एकलहरे, कलंबू, बोदडे आदी ठिकाणाहून टँकर भरले जातील.-अजयकुमार नष्टे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर

टॅग्स :water shortageपाणीटंचाईAmalnerअमळनेर