शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अमळनेर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 15:52 IST

अमळनेर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत चालली असून, ३३ गावांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, २१ गावांना विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

ठळक मुद्देतालुक्यातील ३३ गावांना होतोय टँकरने पाणीपुरवठा२१ गावांना विहीर अधिग्रहणगुरांचे होताहेत हालस्वतंत्र टँकरची मागणीसध्या सिंधी कॉलनी व धावडे येथून पुरवठा

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत चालली असून, ३३ गावांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, २१ गावांना विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र गुरांना पाणी अपूर्ण पडू लागल्याने ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी वाढीव टँकरची मागणी केली आहे.अमळनेर तालुक्यात अटाळे, पिंपळे बद्रूक, पिंपळे खुर्द, वाघोदा, निसर्डी, अंचलवाडी, डांगर बुद्रूक, भोरटेक मालपूर, धानोरा सबगव्हाण, शिरसाळे, झाडी, गलवाडे बुद्रूक, गलवाडे खुर्द, जैतपीर, खेडी, खरदे, वासरे, गडखांब, पिंपळी प्र.ज., आर्डी, अनोरे, भरवस, लोणपंचम, इंद्रापिंप्री, जानवे, धुपी, मांजर्डी, नगाव बुद्रूक, सुंदरपट्टी या गावांना पिण्याच्या पाण्याचे १६ टँकर सुरू आहेत. या गावांसाठी सध्या अमळनेर पालिकेच्या मालकीच्या सिंधी कॉलनी भागातील विहिरीवरून व तापी नदी काठावरील धावडे या दोन गावनवरून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यासह अजून २१ गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली आहे.अमळनेर, कळमसरे, करणखेडा, ढेकूसीम, दहिवद खुर्द, रढावण राजोरे, सोनखेडी, तळवाडे, कुºहे बुद्रूक, मेहेरगाव, टाकरखेडा, पिंगळवाडे, एकतास, लोंढवे, पाडसे, रामेश्वर खुर्द, रामेश्वर बुद्रूक, नंदगाव, लाडगाव, खवशी, एकरुखी, लोण, चारम तांडा आदी गावांना विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र दररोज जमिनीची पाणी पातळी खालावत चालली असल्याने प्रस्तावांची संख्या वाढत आहे. खेडी प्र. ज. व शिरूड या दोन गावांचेही टँकर प्रस्ताव आलेले आहेत. काही गावांना गुरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.तरवाडे येथे विहीर अधिग्रहणाने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. मात्र गुरांसाठी स्वतंत्र टँकर मागतो, प्रशासन देत नाही. माणसे व गुरांसाठी तीन टँकर घेऊन विहीर अधिग्रहण बंद करा, असे सांगतात. मात्र अमळनेरचे पाणी पिण्यायोग्य नाही.-रामकृष्ण पाटील, सरपंच, तरवाडे, ता.अमळनेरसुंदरपट्टी येथे अद्याप टँकर सुरू झालेले नाही. परिसरातून नागरिक पाणी आणत आहेत. गोशाळेतर्फे गुरांसाठी दररोज पाच हजार लीटरचे टँकर येत आहे.-सुरेश पाटील, सुंदरपट्टी, अमळनेरनगाव बुद्रूक येथे मागील वेळी झालेल्या बंधारे व जलयुक्तची कामे केल्याने चिखली नदीत पाणी अडवण्यात आले होते. परंतु ग्रामस्थांनी शेतीसाठी त्याचा उपसा केल्याने पाणी साठा संपला, अन्यथा ते पाणी किमान मेपर्यंत पुरले असते. अनेकवेळा तक्रारी करूनही संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने उपसा थांबवण्यात येऊ शकला नाही.-महेश पाटील, नगावसध्या सिंधी कॉलनी व धावडे येथून पुरवठा होत आहे. मात्र तापीचे आवर्तन सुटल्यास जळोद येथून व पांझरेतून आवर्तन सोडल्यास भिलाली, एकलहरे, कलंबू, बोदडे आदी ठिकाणाहून टँकर भरले जातील.-अजयकुमार नष्टे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर

टॅग्स :water shortageपाणीटंचाईAmalnerअमळनेर