शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जळगाव : राज्य सरकारनेच मागवल्या उच्च शिक्षणावर सूचना

By अमित महाबळ | Updated: April 9, 2023 19:21 IST

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शासनाने ३१ मार्च रोजी झालेल्या ऑनलाइन सभेत पाच वर्षांच्या कालावधीकरिता तयार होणाऱ्या बृहत आराखड्यासाठी थेट सूचना मागविल्या आहेत.

जळगाव : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नव्याने होऊ घातलेल्या बृहत आराखड्याच्या अनुषंगाने तीन जिल्ह्यातील शिक्षण प्रेमींकडून १५ एप्रिलपर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शासनाने ३१ मार्च रोजी झालेल्या ऑनलाइन सभेत पाच वर्षांच्या कालावधीकरिता तयार होणाऱ्या बृहत आराखड्यासाठी थेट सूचना मागविल्या आहेत. सूचना मागविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने लिंक दिली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी अंतर्गत असलेल्या जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य,संचालक, पालक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षणतज्ज्ञ इत्यादींनी आपल्या सूचना १५ एप्रिल २०२३ पर्यंत वेबलिंक फॉर्ममध्ये भरून शासनास पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी विद्यापीठाचे संकेतस्थळ पाहावे,असे विद्यापीठाच्या वतीने प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी सांगितले.

विद्यापीठाने बृहत आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाचे काम होती घेतले. प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, औद्योगिक आदी क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासू व्यक्तींशी संवाद साधून माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यानंतर आता थेट राज्य शासनानेच सूचना मागवल्या आहेत.