शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाची तळमळ अन् आत्मियतेने मिळाली प्रेरणा - पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:50 IST

जिल्हा पोलीस अधीक्षकापर्यंतचा प्रवास करणाऱ्या डॉ.पंजाबराव उगले यांच्या आयुष्याला आकार देणारे कोण आहेत ते शिक्षक?

जळगाव: आपल्या विद्यार्थ्याने चांगले शिक्षण घ्यावे, खूप मोठं व्हावे...उच्च पदावर पोहचावे...तो मोठा झाला म्हणजे आपण मोठे झालो.गावाचे, शाळेचे व पालकांचेही नाव त्यात मोठे होते..आर.जे.कुळकर्णी (रा.नेवासा, जि.अहमदनगर) हे शिक्षक नेहमीच वर्गातील विद्यार्थ्यांना अत्यंत पोटतिडकीने व तळमळीने सांगत असायचे. त्यांचे हे बोल खºया अर्थाने प्रेरणा देणारे ठरले अन् आयपीएस झालो आणि वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदापर्यंत पोहचून समाजाची सेवा करण्याची चांगली संधी मिळाली. हा अनुभव सांगताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते.पहिली ते चौथी देवसरे, ता.नेवासा, जि.अहमदनगर या मुळ गावी शिक्षण झाले. त्यानंतर पुढचे शिक्षण वेगवेगळ्या गावांत झाले. ११ व १२ वी नेवासा तर पशुवैद्यकिय शिक्षण प्रवरा नगर येथे झाले. सातवी ते दहावी या काळात आर.जे.कुळकर्णी या शिक्षकांनीच खºया अर्थाने घडविण्याची प्रेरणा दिली. शिस्त व प्रेरणा या दोन्ही बाबी कुळकर्णी यांनीच शिकविल्या. पुढे वन विभागातील अधिकारी होण्याचे आकर्षण निर्माण झाले. नंतर पोलिसांच्या खाकीविषयी क्रेझ निर्माण झाली आणि त्यासाठी जिद्दीने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो व त्यात यशस्वीही झालो.अर्थातच सर्व श्रेय गुरुजनांना. आज शिक्षक दिनी त्यांना वंदन...!पूत्र आणि मित्र...भेदभाव नाहीचमी अभ्यासात हुशार होतो, तसा कुळकर्णी सरांचा मुलगा देखील हुशार होता. आम्ही दोघं चांगले जीवलग मित्र होतो. आम्ही दोघंच नेहमी वर्गात पहिला आणि दुसरा असे असायचो. आमच्यात तिसरा कधी आलाच नाही. शिक्षकांनी कधी मुलाचा मित्र आणि पूत्र असा भेदभाव केला नाही. उलट तू मला त्याच्यापुढे गेला पाहिचे असेच सांगून प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यांचाही मुलगा अभियंता झाला.हाथी मेरे साथी चित्रपट भावला‘हाथी मेरे साथी’ या हिंदी चित्रपटानेही जीवनात खूप बदल केला. या चित्रपटामुळे जंगल, प्राणी व पर्यावरणावर प्रेम निर्माण झाले तसेच ‘खाकी’चे आकर्षण वाढले. पुढे काही वर्षात गावातील एक उपनिरीक्षक मुलगा गणवेशात शाळेत आला. त्याने भाषण दिले..तेव्हा शिक्षकांनी त्याचे कौतुक करुन मुलांनाही त्याच्यापासून प्रेरणा घ्यायला सांगितले. तेव्हा पोलिसांच्या खाकीचे आकर्षण वाढले.अन् शिक्षकांच्या डोळ्यात आले पाणीजिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना बारावीत ८० टक्के गुण मिळाले. निकालाचे हे गुणपत्रक घेऊन पहिली ते चौथीपर्यंत शिकविणाºया सावंत व फाटके या दोन्ही शिक्षकांकडे गेलो तेव्हा..निकालपत्र पाहून या दोन्ही शिक्षकांचे डोळे पाणावले..रुमालाने डोळ्यातील पाणी पुसून ते म्हणाले..तु नक्की मोठा व्यक्ती होशील असे म्हणत आमचीही मान गर्वाने ताठ झाली असे म्हणत त्यांनी आशिर्वाद दिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव