शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

अमळेनरात फेरीवाला धोरण गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 01:08 IST

अमळनेर शहरात फेरीवाला धोरण राबवण्याऐवजी ते गुंडाळले गेल्याने फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून सामान्य नागरिकाला ते उघडपणे दादागिरी करू लागले आहेत. विक्रेत्यांनी रस्ते अडविल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे

ठळक मुद्देकिरकोळ विक्रेत्यांनी रस्ते अडविले प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

अमळनेर : शहरात फेरीवाला धोरण राबवण्याऐवजी ते गुंडाळले गेल्याने फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून सामान्य नागरिकाला ते उघडपणे दादागिरी करू लागले आहेत. विक्रेत्यांनी रस्ते अडविल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहेशहरातील मुख्य भाजीपाला मार्केट परिसर, लालबाग पाण्याच्या टाकीचा परिसर, सुभाष चौक ते कुंटे रोड , गंगा घाट, बसस्थानक परिसरात हातगाड्या व किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे वाहतूक खोळंबते. महिला, आबालवृद्धांना जाण्यास जागा नसते फेरीवाले रस्त्यातून हलायला तयार नसतात. उलटपक्षी बाजूला होण्यास सांगितले तर दादागिरी करतात हातगाडी हलवत नाहीत, अशा तक्रारी आहेत. शासनाच्या आदेशानुसार पालिकेने फेरीवाला धोरण राबविण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. समितीची बैठक होते की नाही ही देखील शोधाची बाब आहे. फेरीवाला धोरणात हातगाड्यांना क्रमांक देऊन त्यांना विभाग ठरवून द्यायचा आहे. ज्या त्या भागातील हातगाड्या त्यांच्याच भागात पाहिजे इतरत्र आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र हातगाड्यांचे शहराच्या मध्यवर्ती भागात केंद्रीकरण झाले असल्याने बेशिस्त वर्तन हातगाडी चालकांकडून घडत असल्याच्या तक्रारी आहेत.शहराची हद्द वाढल्यामुळे चारही दिशांना भाजीपाला बाजार असला पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही. वाटेल तिथे रस्त्यावर गाडया उभ्या करून पाहिजे त्यावेळी माल विकायला उभे राहत असल्याने प्रवाशी वाहनांना थांबावे लागते. किरकोळ विक्रेत्यांसाठी न.पा ने लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ ओटे बांधून दिले होते . मर्यादा रेषा आखून दिली होती परंतु सर्व मर्यादा ओलांडून रस्त्यावर गाड्या उभ्या असतात. तथापि न. प. चे अधिकारी किंवा कर्मचारी कारवाई करताना दिसत नाहीत.एक विशिष्ट समाजाच्या दबावाला बळी पडून कारवाई होत नसल्याचे बोलले जाते.

टॅग्स :hawkersफेरीवाले