शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गांधींजींच्या विचारांचा प्रभाव; नंतर एकही दंगल झाली नाही! - राह नबा कुमार

By अमित महाबळ | Updated: December 17, 2023 21:24 IST

रविवारी जळगावमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते

अमित महाबळ, जळगाव: भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी नौखालीत धार्मिक दंगली उसळल्या होत्या. त्या थांबाव्यात म्हणून महात्मा गांधीजींनी ज्या गावांमध्ये दौरा केला होता तेथे नंतरच्या काळात, अगदी आजपर्यंत एकही दंगल झालेली नाही. हा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव आहे, असे प्रतिपादन राह नबा कुमार यांनी केले. ते रविवारी, जळगावमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

राह नबा कुमार म्हणाले, की १९४६-४७ च्या दरम्यान नौखालीत धार्मिक दंगली उसळल्या होत्या. हा भाग आता बांगलादेशात आहे. या दंगली थांबाव्यात म्हणून त्यावेळी महात्मा गांधी चार महिने नौखालीत थांबले होते. त्यांनी ज्या गावात भेट दिली, दंगली थांबवल्या तेथे आजपर्यंत एकही धार्मिक दंगल झालेली नाही. दोन वर्षांपूर्वी, सन २०२१ मध्ये दुर्गापूजेवेळी बांगलादेशात दंगलींनी जोर धरला होता. नौखालीत हिंदूंच्या धार्मिक स्थळांना नुकसान पोहोचविण्याचा काही जणांकडून प्रयत्न झाला मात्र स्थानिक मुस्लिमांनी या ठिकाणांना संरक्षण पुरवले होते. हे गांधीजींच्या विचारांचे यश आहे, असेही राह नबा कुमार म्हणाले. आश्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

...तरच विधायक वळण मिळेल

तरुणाईच्या हातात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे पण त्यावर दुर्दैवाने एकमेकांच्या धर्माबद्दल अपप्रचार करणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट शेअर केल्या जातात. गांधींजींचे विचार तरुणाईपर्यंत पोहोचले तर त्यांच्या विचारांना विधायक वळण मिळेल. एकत्र राहिलो तर शांती व अहिंसा ही तत्त्वे यशस्वी होतील, असे राह नबा कुमार यांचा मुलगा अनन्य याने सांगितले.

कोण आहेत राह नबा कुमार...

आंतरराष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार केल्याबद्दल यंदाच्या जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित बांगलादेशातील नौखाली येथील महात्मा गांधी आश्रम ट्रस्टचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राह नबा कुमार आहेत. ते व त्यांच्या पत्नी तंद्रा बारुआ, मुलगा अनन्य गांधीतीर्थला भेट देण्यासाठी जळगावला आले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव