शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

गांधींजींच्या विचारांचा प्रभाव; नंतर एकही दंगल झाली नाही! - राह नबा कुमार

By अमित महाबळ | Updated: December 17, 2023 21:24 IST

रविवारी जळगावमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते

अमित महाबळ, जळगाव: भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी नौखालीत धार्मिक दंगली उसळल्या होत्या. त्या थांबाव्यात म्हणून महात्मा गांधीजींनी ज्या गावांमध्ये दौरा केला होता तेथे नंतरच्या काळात, अगदी आजपर्यंत एकही दंगल झालेली नाही. हा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव आहे, असे प्रतिपादन राह नबा कुमार यांनी केले. ते रविवारी, जळगावमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

राह नबा कुमार म्हणाले, की १९४६-४७ च्या दरम्यान नौखालीत धार्मिक दंगली उसळल्या होत्या. हा भाग आता बांगलादेशात आहे. या दंगली थांबाव्यात म्हणून त्यावेळी महात्मा गांधी चार महिने नौखालीत थांबले होते. त्यांनी ज्या गावात भेट दिली, दंगली थांबवल्या तेथे आजपर्यंत एकही धार्मिक दंगल झालेली नाही. दोन वर्षांपूर्वी, सन २०२१ मध्ये दुर्गापूजेवेळी बांगलादेशात दंगलींनी जोर धरला होता. नौखालीत हिंदूंच्या धार्मिक स्थळांना नुकसान पोहोचविण्याचा काही जणांकडून प्रयत्न झाला मात्र स्थानिक मुस्लिमांनी या ठिकाणांना संरक्षण पुरवले होते. हे गांधीजींच्या विचारांचे यश आहे, असेही राह नबा कुमार म्हणाले. आश्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

...तरच विधायक वळण मिळेल

तरुणाईच्या हातात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे पण त्यावर दुर्दैवाने एकमेकांच्या धर्माबद्दल अपप्रचार करणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट शेअर केल्या जातात. गांधींजींचे विचार तरुणाईपर्यंत पोहोचले तर त्यांच्या विचारांना विधायक वळण मिळेल. एकत्र राहिलो तर शांती व अहिंसा ही तत्त्वे यशस्वी होतील, असे राह नबा कुमार यांचा मुलगा अनन्य याने सांगितले.

कोण आहेत राह नबा कुमार...

आंतरराष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार केल्याबद्दल यंदाच्या जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित बांगलादेशातील नौखाली येथील महात्मा गांधी आश्रम ट्रस्टचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राह नबा कुमार आहेत. ते व त्यांच्या पत्नी तंद्रा बारुआ, मुलगा अनन्य गांधीतीर्थला भेट देण्यासाठी जळगावला आले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव