शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

गांधींजींच्या विचारांचा प्रभाव; नंतर एकही दंगल झाली नाही! - राह नबा कुमार

By अमित महाबळ | Updated: December 17, 2023 21:24 IST

रविवारी जळगावमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते

अमित महाबळ, जळगाव: भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी नौखालीत धार्मिक दंगली उसळल्या होत्या. त्या थांबाव्यात म्हणून महात्मा गांधीजींनी ज्या गावांमध्ये दौरा केला होता तेथे नंतरच्या काळात, अगदी आजपर्यंत एकही दंगल झालेली नाही. हा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव आहे, असे प्रतिपादन राह नबा कुमार यांनी केले. ते रविवारी, जळगावमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

राह नबा कुमार म्हणाले, की १९४६-४७ च्या दरम्यान नौखालीत धार्मिक दंगली उसळल्या होत्या. हा भाग आता बांगलादेशात आहे. या दंगली थांबाव्यात म्हणून त्यावेळी महात्मा गांधी चार महिने नौखालीत थांबले होते. त्यांनी ज्या गावात भेट दिली, दंगली थांबवल्या तेथे आजपर्यंत एकही धार्मिक दंगल झालेली नाही. दोन वर्षांपूर्वी, सन २०२१ मध्ये दुर्गापूजेवेळी बांगलादेशात दंगलींनी जोर धरला होता. नौखालीत हिंदूंच्या धार्मिक स्थळांना नुकसान पोहोचविण्याचा काही जणांकडून प्रयत्न झाला मात्र स्थानिक मुस्लिमांनी या ठिकाणांना संरक्षण पुरवले होते. हे गांधीजींच्या विचारांचे यश आहे, असेही राह नबा कुमार म्हणाले. आश्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

...तरच विधायक वळण मिळेल

तरुणाईच्या हातात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे पण त्यावर दुर्दैवाने एकमेकांच्या धर्माबद्दल अपप्रचार करणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट शेअर केल्या जातात. गांधींजींचे विचार तरुणाईपर्यंत पोहोचले तर त्यांच्या विचारांना विधायक वळण मिळेल. एकत्र राहिलो तर शांती व अहिंसा ही तत्त्वे यशस्वी होतील, असे राह नबा कुमार यांचा मुलगा अनन्य याने सांगितले.

कोण आहेत राह नबा कुमार...

आंतरराष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार केल्याबद्दल यंदाच्या जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित बांगलादेशातील नौखाली येथील महात्मा गांधी आश्रम ट्रस्टचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राह नबा कुमार आहेत. ते व त्यांच्या पत्नी तंद्रा बारुआ, मुलगा अनन्य गांधीतीर्थला भेट देण्यासाठी जळगावला आले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव