शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

हवामान बदलाची सर्वाधिक झळ भारताला बसणार; अर्थतज्ज्ञ देसरडा यांचा इशारा

By अमित महाबळ | Updated: June 30, 2023 22:40 IST

जळगाव : जून महिना संपला पण अजून मान्सून सार्वत्रिक झालेला नाही. हे हवामान बदलाचे आव्हान आहे आणि ते दारात ...

जळगाव : जून महिना संपला पण अजून मान्सून सार्वत्रिक झालेला नाही. हे हवामान बदलाचे आव्हान आहे आणि ते दारात आले आहे. याची सर्वाधिक झळ भारताला बसणार आहे. कारण, भारतात हवामानाशी निगडीत बरेच व्यवसाय आहेत. विकासाच्या नावाखाली होणारे उद्ध्वस्तीकरण रोखायला हवे. त्यासाठी जनआंदोलन आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व महाराष्ट्र नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी, जळगावमध्ये पद्मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रा. एच. एम. देसरडा म्हणाले, की भारत आणि महाराष्ट्रासमोर आर्थिक विषमता, सामाजिक व धार्मिक विसंवाद, पर्यावरणीय विध्वंस हे प्रमुख तीन प्रश्न आहेत. देशातील १४० कोटींपैकी १०० कोटी तर महाराष्ट्रातील साडेतेरा कोटींपैकी १० कोटी जनता प्राथमिक गरजांपासून वंचित आहे. हे सगळे शेतमजूर, कामगार, हातावर पोट असणारे आहेत. त्यामुळे देशाच्या विकासाचा फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. १०० कोटी लोकांना त्यांच्या गरजांपासून वंचित ठेवून कोणाचा विकास होत आहे, असा परखड प्रश्नही प्रा. देसरडा यांनी उपस्थित केला.

विकासाचे ‘हे’ मॉडेल आपले नाही

अमेरिकेच्या धर्तीवरील रस्ते, वाहने हे भारतात विकासाचे मॉडेल होऊ शकत नाही. एक टक्के जनतेकडे ४० टक्के संपत्ती आहे. बाकीच्यांची परिस्थिती विदारक आहे. सरकारचा ९० टक्के खर्च आधीच्या कर्जावरील व्याज, पगार-पेन्शन, अनुदान यावरच खर्च होतो. लोकशाही बळकट राहण्यासाठी जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी जनजागरण हवे आहे.

जनतेचे प्रश्न मांडले जात नाहीत

राज्यकर्त्यांना जनता मतदार म्हणून हवी आहे. परंतु, जनता जातीयवादी नाही, राजकारणी त्यांना तसे बनवत आहे. निवडणुकीत जातीय-धार्मिक ध्रुवीकरण होते, त्यात जनतेच्या दैनंदिन जीवनाचे प्रश्न नसतात. ते मांडले गेले पाहिजेत. जनतेला ग्राहक म्हणून बघणे बंद झाले पाहिजे. त्यांना नागरिक म्हणून बघा. भारतात १२ ते १५ टक्के राष्ट्रीय उत्पन्न कर रुपाने सरकारकडे येते. अमेरिका व युरोपमध्ये हे प्रमाण २० ते ४० टक्के आहे. भारताला २५ टक्के कर महसूल मिळाला तर ७५ लाख कोटी रुपये मिळू शकतात. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, असेही प्रा. एच. एम. देसरडा यांनी सांगितले.

शिक्षकांच्या नियुक्त्या आयोगामार्फत करा

शिक्षणक्षेत्रात भ्रष्टाचार वाढला आहे. जनतेला गुणवत्तापूर्ण व चरितार्थ चालेल असे शिक्षण मिळायला हवे. शिक्षक नियुक्तीत लाखोंचे व्यवहार होतात. त्यामुळे लोकसेवा आयोगामार्फत शिक्षकांच्या परीक्षा व नियुक्त्या व्हाव्यात, असेही प्रा. एच. एम. देसरडा म्हणाले.