शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघातातील मृत्यूत जगात भारत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:08 IST

जळगाव : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार रस्ता अपघातात मृत्यूत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. ५५ टक्के अपघात हे भरधाव ...

जळगाव : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार रस्ता अपघातात मृत्यूत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. ५५ टक्के अपघात हे भरधाव वेगाने वाहने चालविण्यामुळे झालेले आहेत. विशेष म्हणजे अपघातात मृत झालेल्या ७० टक्के व्यक्ती या १८ ते ४५ वयोगटातील अर्थात कुटुंबातील कर्त्या व्यक्ती होत्या. त्यातदेखील ३२ टक्के अपघात हे दुचाकीस्वारांचेच असल्याचे उघड झाले आहे.

जगातील एकूण रस्ते अपघातातील मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू भारतात होत आहे. २०१८ मध्ये देशात ४ लाख ६७ हजार ४४ अपघात झाले तर १ लाख ५१ हजार ४१७ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ लाख ६९ हजार ४१८ जण जखमी झाले आहेत. ही आकडेवारी रस्ता सुरक्षा अभियानात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सादर केली. जळगाव जिल्ह्यात मागील वर्षभरात ७५२ अपघात झाले असून त्यात ४७१ जणांचा मृत्यू झालेला आहे तर ५१४ जण जखमी झालेले आहेत. २०१९ च्या तुलनेत अपघाताच्या संख्येत घट झालेली असली तरी मृत्यूमध्ये ४ टक्के वाढ झालेली आहे. २०१९ मध्ये ८३५ अपघात झाले होते तर ४५४ जणांचा मृत्यू झाला होता.

या कारणांमुळे होतो अपघात

रस्त्यावरील अपघाताचे मुख्यत्वे कारणे अतिवेगाने वाहन चालविणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे, ओव्हरटेकिंग, लेनकटिंग, रॅश ड्रायव्हिंग, मद्यपान करून वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, रात्रीच्या वेळी वाहन चालविणे आदी प्रमुख कारणे समोर आलेली आहेत. देशातील एकूण रस्त्याच्या लांबीपैकी २ टक्के लांबी राष्ट्रीय महामार्गाने व्यापलेली असताना याच महामार्गावर सर्वाधिक ३५ टक्के अपघात झालेले आहेत. राज्य मार्गावर २५ टक्के अपघात झाले आहेत. ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केलेले आहे, त्यांचा जीव या अपघातात वाचल्याचेही समोर आले आहे. अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये पादचारी, सायकलस्वार व दुचाकीस्वार यांची संख्या ५४ टक्के आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावरील अपघातांची सं‌ख्या दरवर्षी १० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

एक नजर अपघातांवर

देशातील अपघातांची संख्या : ४,६७,०४४

देशातील अपघातांतील मृत्यू : १,५१,४१७

जळगाव जिल्हा अपघात : ७५२

जळगाव जिल्हा अपघातात मृत्यू : ४७१

अपघातात मृत झालेल्या तरुणांची संख्या : ७० टक्के

अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू : ३६.५ टक्के