शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

रस्ते अपघातातील मृत्यूत जगात भारत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:08 IST

जळगाव : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार रस्ता अपघातात मृत्यूत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. ५५ टक्के अपघात हे भरधाव ...

जळगाव : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार रस्ता अपघातात मृत्यूत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. ५५ टक्के अपघात हे भरधाव वेगाने वाहने चालविण्यामुळे झालेले आहेत. विशेष म्हणजे अपघातात मृत झालेल्या ७० टक्के व्यक्ती या १८ ते ४५ वयोगटातील अर्थात कुटुंबातील कर्त्या व्यक्ती होत्या. त्यातदेखील ३२ टक्के अपघात हे दुचाकीस्वारांचेच असल्याचे उघड झाले आहे.

जगातील एकूण रस्ते अपघातातील मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू भारतात होत आहे. २०१८ मध्ये देशात ४ लाख ६७ हजार ४४ अपघात झाले तर १ लाख ५१ हजार ४१७ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ लाख ६९ हजार ४१८ जण जखमी झाले आहेत. ही आकडेवारी रस्ता सुरक्षा अभियानात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सादर केली. जळगाव जिल्ह्यात मागील वर्षभरात ७५२ अपघात झाले असून त्यात ४७१ जणांचा मृत्यू झालेला आहे तर ५१४ जण जखमी झालेले आहेत. २०१९ च्या तुलनेत अपघाताच्या संख्येत घट झालेली असली तरी मृत्यूमध्ये ४ टक्के वाढ झालेली आहे. २०१९ मध्ये ८३५ अपघात झाले होते तर ४५४ जणांचा मृत्यू झाला होता.

या कारणांमुळे होतो अपघात

रस्त्यावरील अपघाताचे मुख्यत्वे कारणे अतिवेगाने वाहन चालविणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे, ओव्हरटेकिंग, लेनकटिंग, रॅश ड्रायव्हिंग, मद्यपान करून वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, रात्रीच्या वेळी वाहन चालविणे आदी प्रमुख कारणे समोर आलेली आहेत. देशातील एकूण रस्त्याच्या लांबीपैकी २ टक्के लांबी राष्ट्रीय महामार्गाने व्यापलेली असताना याच महामार्गावर सर्वाधिक ३५ टक्के अपघात झालेले आहेत. राज्य मार्गावर २५ टक्के अपघात झाले आहेत. ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केलेले आहे, त्यांचा जीव या अपघातात वाचल्याचेही समोर आले आहे. अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये पादचारी, सायकलस्वार व दुचाकीस्वार यांची संख्या ५४ टक्के आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावरील अपघातांची सं‌ख्या दरवर्षी १० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

एक नजर अपघातांवर

देशातील अपघातांची संख्या : ४,६७,०४४

देशातील अपघातांतील मृत्यू : १,५१,४१७

जळगाव जिल्हा अपघात : ७५२

जळगाव जिल्हा अपघातात मृत्यू : ४७१

अपघातात मृत झालेल्या तरुणांची संख्या : ७० टक्के

अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू : ३६.५ टक्के