शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीत सव्वादोन मीटरपर्यंत वाढ

By admin | Updated: January 15, 2015 15:03 IST

जिल्हातील १५ तालुक्यांमध्ये सव्वादोन मीटरपर्यंत भूजल पातळीत वाढ झालेली असल्याचे दिसून आले आहे.

सात तालुक्यात एक मीटरपर्यंत वाढ : भुसावळ, यावल व धरणगावही चांगली परिस्थिती

सुधाकर जाधव■ जळगावभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेव्दारे जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींमधील स्थिर भूजल पातळीची वाचने सप्टेंबर अखेर घेण्यात आलेली असून त्याची तुलना मागील पाच वर्षाच्या सप्टेंबर अखेरच्या सरासरी स्थिर भूजल पातळीशी करण्यात आली. त्यानुसार जिल्हातील १५ तालुक्यांमध्ये सव्वादोन मीटरपर्यंत भूजल पातळीत वाढ झालेली असल्याचे दिसून आले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेव्दारे दरवर्षी सप्टेंबर अखेर झालेले एकूण पर्जन्यमान व त्याची सरासरीच्या तुलनेच्या आधारे निरीक्षण विहिरीच्या स्थिर भूजल पातळीत सरासरीच्या तुलनेत सप्टेंबर अखेर झालेली वाढ अथवा घट याबाबत अभ्यास करण्यात येतो. त्या आधारे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार्‍या संभाव्य गावांची यादी तयार केली जाते. दरम्यान, टंचाईमुक्त महाराष्ट्र २0१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १४६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात टँकर असलेल्या, पन्नास टक्क्यांच्या आत पाऊस पडलेल्या गावांचा या अभियानात समावेश करण्यात आला. पहिला टप्पा जानेवारी २0१५ ते जानेवारी २0१६ तर दुसरा टप्पा जानेवारी २0१६ ते मार्च २0१५ या कालावधित राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत तीन वर्षात ही सर्व गावे टॅंकरमुक्त करण्याचा उद्देश आहे. या अभियानांतर्गत सिमेंट नाला, विहीर पुनर्भरण, बांध बंदिस्ती, पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम राबवून जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यात येणार आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेव्दारे गावांच्या पाण्याचा ताळेबंद तयार करण्यात आला आहे. 

सात तालुके अवर्षण प्रणव

जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यांपैकी जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव व पाचोरा हे सात तालुके अवर्षण प्रवण क्षेत्रात येतात.

तालुकानिहाय निरीक्षण विहिरींची संख्या

■ मुक्ताईनगर-११ ■ रावेर-१0■ भुसावळ-७ ■ बोदवड-६ ■ यावल-७ ■ जामनेर-२४ ■ जळगाव-१५ ■ धरणगाव-७ ■ एरंडोल-४ ■ चोपडा-१४ ■ अमळनेर-१४ ■ पारोळा-१६ ■ पाचोरा-१४ ■ भडगाव-८ ■ चाळीसगाव-२१

कोणत्या तालुक्यात किती वाढ?

बोदवड, जामनेर, अमळनेर, पारोळा, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव या सात तालुक्यांमध्ये भूजल पातळी 0ते १ मीटरने वाढली आहे. जळगाव, रावेर, चोपडा, एरंडोल, मुक्ताईनगर या तालुक्यांची १-२ मीटर तर भुसावळ, धरणगाव व यावल तालुक्याची पाणी पातळी २-३ मीटरने वाढली आहे. ९२.७४ टक्के पाऊस यावर्षी सप्टेंबर अखेर सरासरी पर्जन्यमानाच्या ९२.७४ टक्के पाऊस झाला आहे. एरंडोल, यावल, चोपडा, जळगाव व धरणगाव तालुका वगळता बाकी सर्व तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत यावर्षीच्या पर्जन्यमानात घट आढळून येते. वाढ झालेल्या पाच तालुक्यांचे पर्जन्यमानात सरासरीच्या तुलनेत २.६६ ते २६.४३ एवढी वाढ दिसून येते. मुक्ताईनगर, जामनेर व बोदवड तालुक्यात पर्जन्यमान घटले भडगाव व अमळनेर तालुक्याच्या पर्जन्यमानात 0 ते १0 टक्के पर्यंत घट, रावेर, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा व भुसावळ या तालुक्यात १0 ते २0 टक्क्यांपर्यंत घट आणि मुक्ताईनगर, जामनेर व बोदवड या तालुक्यात २0 ते ५0 टक्क्यापयर्ंत घट आढळून आलेली आहे.