शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

वातावरणातील बदलाने रुग्ण संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 14:49 IST

चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हे वातावरण आरोग्यासाठी अपायकारक आहे.

ठळक मुद्देचाळीसगाव तालुक्यातील चित्ररोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने सर्दी, ताप, मळमळ, खोकला, अंग दुखणे, घशात खवखव व उलटीसारखी लक्षणे वाढलीकोरडा दिवस पाळावा

रईस शेखमेहुणबारे, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हे वातावरण आरोग्यासाठी अपायकारक आहे. यामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’च्या रुग्णांची संख्या वाढतच असून मेहुणबारे, ता.चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रोजचे बाह्य रुग्ण पन्नासावर येत आहेत. दुसरीकडे खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. या व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने सर्दी, ताप, मळमळ, खोकला, अंग दुखणे, घशात खवखव व उलटीसारखी लक्षणे वाढली आहेत.पावसामुळे वातावरणातल्या बदलाने संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दूषित पाणीपुरवठ्याने गॅस्ट्रो व मलेरियाच्या रुग्णात वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण, कधी पाऊस, पावसामुळे थंडीचे वातावरण यामुळे जीवाणू व विषाणूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुलांच्या आरोग्याला बसत आहे. प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना संसर्गजन्य आजाराचा धोका असतो. मुले व वृद्धांना जास्त धोका वातावरणात बदल झाला की व्हायरलचा धोका अधिक असतो. या वातावरणाचा व व्हायरलचा सर्वाधिक फटका लहान मुले तसेच वृद्धांना बसण्याची दाट शक्यता अधिक असते. त्यामुळे लहान मुले व वृद्धांची काळजी घेण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांंचे म्हणणे आहे.दमाच्या रुग्णांना ञासवातावरणाच्या परिणामामुळे ज्यांना दमाचा ञास होत आहे अशा ज्येष्ठांच्या श्वसनक्रियेवर परिणाम होत असून त्यांना खुपच ञास होत आहे.दमाचा आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सध्याच्या वातावरणामुळे वायरल इन्फेक्शनचा धोका अधिक आहे. तापासह थंडी, सर्दी, खोकला, मळमळ, उलटी, अंग दुखणे आणि डोके दुखण्याचे विकार असलेल्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. व्हायरल इन्फेक्शनचे आठवडाभरात मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात १७६च्या आसपास रुग्णांनी उपचारासाठी आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.व्हायरल इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लहान मुलांकडे या वातावरणात विशेष लक्ष देण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे. गावोगावी स्वच्छतेचा अभाव असल्याने साथीचे रोग पसरत आहे. यामुळे प्रत्येक गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.कोरडा दिवस पाळावाया वर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. सांडपाणी व साठवणूक केलेले पाणी व गावेगाव असलेले कचऱ्याचे ढीग यामुळे रोगराई पसरत असून, मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच वातावरणातील बदलांमुळे व्हायरल इन्फेकशन सर्वत्र होत आहे. थोडा त्रास वाटल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्टराचा सल्ला घ्यावा. तसेच पाणी उकळून प्यावे. आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांंचे म्हणणे आहे.तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळलाच पाहिजे. तसेच गावात तुंबलेल्या गटाराची पाणी मोकळी करुन वाहती करावी. धुरळणी यंत्राने औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.‘इन्फेक्शन’ची लक्षणेथंडीवाजून ताप येणेमळमळ होणेडोक व संपूर्ण अंग दुखणेसर्दी, खोकलाश्वास घ्यायला त्रास होणेऔषध घेतल्यावरसुध्दा तीन दिवस ताप चढउतार राहणेउपायशक्यतोवर पावसात ओले होऊ नयेपाणी उकळून प्यावेडासांपासून बचाव करणेघरासह परिसर स्वच्छ ठेवणेव्हायरल असलेल्या रुग्णाच्या संपर्क टाळणेया वातावरणात लहान मुलांना हातात पंजा व पायात मोजे घालून त्यांची निगा ठेवावी. आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. जेणेकरून डास, मच्छर होणार नाही. ताप किंवा थंडी वाजून आल्यास तातडीने रुग्णालयात उपचार घ्यावा. पाणी गरम करून प्यावे.-डॉ वैधवी पंडितवैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, मेहुणबारे

टॅग्स :RainपाऊसChalisgaonचाळीसगाव