शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तेलाच्या मागणीत वाढ; पेरणी क्षेत्रात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:13 IST

सोयाबीनच्या ७५ टक्के उत्पादनात घट (डमी) तिळाचे उत्पादन घटले : सूर्यफूल, करडई हद्दपार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

सोयाबीनच्या ७५ टक्के उत्पादनात घट

(डमी)

तिळाचे उत्पादन घटले : सूर्यफूल, करडई हद्दपार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे तेलाच्या मागणीत वाढ होत असताना दुसरीकडे जिल्ह्यात तेलबीयांच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तेलबियांमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन हे सोयाबीनचे घेतले जाते. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. हीच स्थिती खान्देशात इतर ठिकाणीदेखील पहायला मिळत आहे. यासह जिल्ह्यात तीळ, सूर्यफूल, करडईसारख्या तेलबीयांची लागवड आता नसल्यासारखीच आहे.

जिल्ह्यात तेलबीयांमध्ये सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही जिल्ह्यात २५ हजार हेक्टरपर्यंत सोयाबीनची लागवड झाली होती. अतिवृष्टीमुळे सुमारे २० ते २२ हजार हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले. यासह भुईमूगचा पेराही आता दरवर्षी कमी होत आहे. केवळ चोपडा, धरणगाव, अमळनेर तालुक्यातील काही भागातच भुईमुगाचा पेरा केला जातो. जिल्ह्यात शेंगदाण्यावरील प्रक्रिया केंद्र कमी आहेत तसेच माल विक्रीसाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागते. तसेच व्यापाऱ्यांच्या टोळीमुळे भावदेखील बऱ्यापैकी मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस भुईमुगाच्या पेऱ्यात घट होत आहे. त्या उलट सोयाबीनच्या पिकाला चांगला भाव मिळतो. तसेच पावसाच्या पाण्यावरदेखील हे पीक येत असते. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होत आहे. मात्र, शेंगदाणा व सोयाबीनच्या तेलाच्या दरात ज्या प्रमाणे वाढ होत आहे. त्या प्रमाणात पेऱ्यात वाढ होत नसून, उलट हे क्षेत्र घटत जात आहे.

तेलपीक पेरणी क्षेत्रपीक

पीक - २०१९ - २०२० - घट - वाढ

सूर्यफूल - १९ - १७ - ०२ - ००

तीळ -५६९ - ४९८ - ७१ - ००

भुईमूग - २ हजार ३०० - १ हजार ७४२ - ६०० - ००

सोयाबीन -२७ हजार २०० - २५ हजार ६२० - १८०० - ००

तीळ, सूर्यफूल, करडई हद्दपार

सोयाबीनचा पेरा वाढत असताना दुसरीकडे तीळ, सूर्यफूल व करडई अशा तेलबीयांचा पेरा प्रत्येक वर्षी घटत आहे. योग्य बाजारपेठ नसणे, पाण्याची आवश्यकता यामुळे शेतकऱ्यांनी या तेलबीयांच्या पेरणीकडे जवळपास दुर्लक्ष केले आहे. तीळ, सूर्यफूल ही पिके तर आता जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. करडईचेदेखील उत्पादन जिल्ह्यात ठरावीक क्षेत्रावरच घेतले जाते. भुईमुगाचा क्षेत्र आता कमी होत आहे. त्यादृष्टीने सोयाबीनचे उत्पादन स्थिर असून, कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते, तर सूर्यफुलाचे उत्पादन धरणगाव तालुक्यातच काही प्रमाणात घेतले जाते.

कोट..

सोयाबीनला चांगला भावदेखील मिळत असतो. तसेच बागायतदार असो वा कोरडवाहु अशा कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्याला हे पीक सोईचे आहे. त्यामुळे सोयाबीनलाच शेतकरी प्राधान्य देतात. त्या दृष्टीने तीळ किंवा सूर्यफूल जिकिरीचे पीक आहे. खुल्या बाजारात सूर्यफुलाला चांगला भाव मिळतोच असे नाही.

-दीपक पाटील, शेतकरी