शहरं
Join us  
Trending Stories
1
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
2
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
3
अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
4
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
5
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
6
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
7
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
8
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
9
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
10
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
11
Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
12
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
13
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
14
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
15
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
16
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
17
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
18
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
19
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
20
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
Daily Top 2Weekly Top 5

तेलाच्या मागणीत वाढ; पेरणी क्षेत्रात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:13 IST

सोयाबीनच्या ७५ टक्के उत्पादनात घट (डमी) तिळाचे उत्पादन घटले : सूर्यफूल, करडई हद्दपार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

सोयाबीनच्या ७५ टक्के उत्पादनात घट

(डमी)

तिळाचे उत्पादन घटले : सूर्यफूल, करडई हद्दपार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे तेलाच्या मागणीत वाढ होत असताना दुसरीकडे जिल्ह्यात तेलबीयांच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तेलबियांमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन हे सोयाबीनचे घेतले जाते. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. हीच स्थिती खान्देशात इतर ठिकाणीदेखील पहायला मिळत आहे. यासह जिल्ह्यात तीळ, सूर्यफूल, करडईसारख्या तेलबीयांची लागवड आता नसल्यासारखीच आहे.

जिल्ह्यात तेलबीयांमध्ये सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही जिल्ह्यात २५ हजार हेक्टरपर्यंत सोयाबीनची लागवड झाली होती. अतिवृष्टीमुळे सुमारे २० ते २२ हजार हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले. यासह भुईमूगचा पेराही आता दरवर्षी कमी होत आहे. केवळ चोपडा, धरणगाव, अमळनेर तालुक्यातील काही भागातच भुईमुगाचा पेरा केला जातो. जिल्ह्यात शेंगदाण्यावरील प्रक्रिया केंद्र कमी आहेत तसेच माल विक्रीसाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागते. तसेच व्यापाऱ्यांच्या टोळीमुळे भावदेखील बऱ्यापैकी मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस भुईमुगाच्या पेऱ्यात घट होत आहे. त्या उलट सोयाबीनच्या पिकाला चांगला भाव मिळतो. तसेच पावसाच्या पाण्यावरदेखील हे पीक येत असते. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होत आहे. मात्र, शेंगदाणा व सोयाबीनच्या तेलाच्या दरात ज्या प्रमाणे वाढ होत आहे. त्या प्रमाणात पेऱ्यात वाढ होत नसून, उलट हे क्षेत्र घटत जात आहे.

तेलपीक पेरणी क्षेत्रपीक

पीक - २०१९ - २०२० - घट - वाढ

सूर्यफूल - १९ - १७ - ०२ - ००

तीळ -५६९ - ४९८ - ७१ - ००

भुईमूग - २ हजार ३०० - १ हजार ७४२ - ६०० - ००

सोयाबीन -२७ हजार २०० - २५ हजार ६२० - १८०० - ००

तीळ, सूर्यफूल, करडई हद्दपार

सोयाबीनचा पेरा वाढत असताना दुसरीकडे तीळ, सूर्यफूल व करडई अशा तेलबीयांचा पेरा प्रत्येक वर्षी घटत आहे. योग्य बाजारपेठ नसणे, पाण्याची आवश्यकता यामुळे शेतकऱ्यांनी या तेलबीयांच्या पेरणीकडे जवळपास दुर्लक्ष केले आहे. तीळ, सूर्यफूल ही पिके तर आता जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. करडईचेदेखील उत्पादन जिल्ह्यात ठरावीक क्षेत्रावरच घेतले जाते. भुईमुगाचा क्षेत्र आता कमी होत आहे. त्यादृष्टीने सोयाबीनचे उत्पादन स्थिर असून, कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते, तर सूर्यफुलाचे उत्पादन धरणगाव तालुक्यातच काही प्रमाणात घेतले जाते.

कोट..

सोयाबीनला चांगला भावदेखील मिळत असतो. तसेच बागायतदार असो वा कोरडवाहु अशा कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्याला हे पीक सोईचे आहे. त्यामुळे सोयाबीनलाच शेतकरी प्राधान्य देतात. त्या दृष्टीने तीळ किंवा सूर्यफूल जिकिरीचे पीक आहे. खुल्या बाजारात सूर्यफुलाला चांगला भाव मिळतोच असे नाही.

-दीपक पाटील, शेतकरी