शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

तेलाच्या मागणीत वाढ; पेरणी क्षेत्रात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:13 IST

सोयाबीनच्या ७५ टक्के उत्पादनात घट (डमी) तिळाचे उत्पादन घटले : सूर्यफूल, करडई हद्दपार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

सोयाबीनच्या ७५ टक्के उत्पादनात घट

(डमी)

तिळाचे उत्पादन घटले : सूर्यफूल, करडई हद्दपार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे तेलाच्या मागणीत वाढ होत असताना दुसरीकडे जिल्ह्यात तेलबीयांच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तेलबियांमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन हे सोयाबीनचे घेतले जाते. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. हीच स्थिती खान्देशात इतर ठिकाणीदेखील पहायला मिळत आहे. यासह जिल्ह्यात तीळ, सूर्यफूल, करडईसारख्या तेलबीयांची लागवड आता नसल्यासारखीच आहे.

जिल्ह्यात तेलबीयांमध्ये सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही जिल्ह्यात २५ हजार हेक्टरपर्यंत सोयाबीनची लागवड झाली होती. अतिवृष्टीमुळे सुमारे २० ते २२ हजार हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले. यासह भुईमूगचा पेराही आता दरवर्षी कमी होत आहे. केवळ चोपडा, धरणगाव, अमळनेर तालुक्यातील काही भागातच भुईमुगाचा पेरा केला जातो. जिल्ह्यात शेंगदाण्यावरील प्रक्रिया केंद्र कमी आहेत तसेच माल विक्रीसाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागते. तसेच व्यापाऱ्यांच्या टोळीमुळे भावदेखील बऱ्यापैकी मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस भुईमुगाच्या पेऱ्यात घट होत आहे. त्या उलट सोयाबीनच्या पिकाला चांगला भाव मिळतो. तसेच पावसाच्या पाण्यावरदेखील हे पीक येत असते. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होत आहे. मात्र, शेंगदाणा व सोयाबीनच्या तेलाच्या दरात ज्या प्रमाणे वाढ होत आहे. त्या प्रमाणात पेऱ्यात वाढ होत नसून, उलट हे क्षेत्र घटत जात आहे.

तेलपीक पेरणी क्षेत्रपीक

पीक - २०१९ - २०२० - घट - वाढ

सूर्यफूल - १९ - १७ - ०२ - ००

तीळ -५६९ - ४९८ - ७१ - ००

भुईमूग - २ हजार ३०० - १ हजार ७४२ - ६०० - ००

सोयाबीन -२७ हजार २०० - २५ हजार ६२० - १८०० - ००

तीळ, सूर्यफूल, करडई हद्दपार

सोयाबीनचा पेरा वाढत असताना दुसरीकडे तीळ, सूर्यफूल व करडई अशा तेलबीयांचा पेरा प्रत्येक वर्षी घटत आहे. योग्य बाजारपेठ नसणे, पाण्याची आवश्यकता यामुळे शेतकऱ्यांनी या तेलबीयांच्या पेरणीकडे जवळपास दुर्लक्ष केले आहे. तीळ, सूर्यफूल ही पिके तर आता जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. करडईचेदेखील उत्पादन जिल्ह्यात ठरावीक क्षेत्रावरच घेतले जाते. भुईमुगाचा क्षेत्र आता कमी होत आहे. त्यादृष्टीने सोयाबीनचे उत्पादन स्थिर असून, कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते, तर सूर्यफुलाचे उत्पादन धरणगाव तालुक्यातच काही प्रमाणात घेतले जाते.

कोट..

सोयाबीनला चांगला भावदेखील मिळत असतो. तसेच बागायतदार असो वा कोरडवाहु अशा कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्याला हे पीक सोईचे आहे. त्यामुळे सोयाबीनलाच शेतकरी प्राधान्य देतात. त्या दृष्टीने तीळ किंवा सूर्यफूल जिकिरीचे पीक आहे. खुल्या बाजारात सूर्यफुलाला चांगला भाव मिळतोच असे नाही.

-दीपक पाटील, शेतकरी