शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मनोबल वाढवा... आनंदी व्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:20 IST

आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाची मन:शांती कुठेतरी हरवली आहे. त्यामुळे मनुष्य हा कमकुवत बनलेला आहे. त्याचा परिणाम म्हणजे शरीर रोगाचे भांडार बनलेले आहे. यासाठी मानवी जीवनात अध्यात्म शास्त्राचे महत्व वाढलेले नव्हे अत्यंत आवश्यक बनले आहे. मनोबल वाढविण्यासाठी अध्यात्माचा आधार घेणे ही आजच्या काळाची गरज आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाची मन:शांती कुठेतरी हरवली आहे. त्यामुळे मनुष्य हा कमकुवत बनलेला आहे. त्याचा परिणाम म्हणजे शरीर रोगाचे भांडार बनलेले आहे. यासाठी मानवी जीवनात अध्यात्म शास्त्राचे महत्व वाढलेले नव्हे अत्यंत आवश्यक बनले आहे. मनोबल वाढविण्यासाठी अध्यात्माचा आधार घेणे ही आजच्या काळाची गरज आहे.भगवतप्राप्ती हे माणसाचे जीवनाचे अंतिम सत्य आहे. नेमके हेच माणूस विसरला आहे. श्रृती वचन असं सांगते की, ‘नायं आत्मा बलहिन लभ्यम्’ परमात्मा हा केवळ बलवानालाच भेटतो. साऱ्या संतांच्या मांदियाळीकडे बघितलं तर ते अध्यात्मिक दृष्टीने अत्यंत बलवान म्हणून त्यांना भगवंत भेटला.माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ‘जे दिठीहिन पविजे। जे दिठीवीन देखिजे। ते अतिंद्रिय लाहिजे। ज्ञान बळ।। ज्ञानाच्या बळानेही देव अनुभवता येतो. पण आज व्हाट्सअप, फेसबुक वरून इंटरनेटवरून आपण ज्ञान मिळवून ज्ञानी जरूर बनतो आहे. परंतु ते देव ओळखण्याचे ज्ञान नाही. म्हणून यासाठी वाचावी ज्ञानेश्वरी। डोळा पहावी पंढरी।। ज्ञान होय अज्ञानासी। ऐसावर या टिकेसी।. देव अनुभवण्याचे सर्वात सोपे बळ म्हणजे भावाचे बळ आहे पण एवढं सोपही बळ आपल्याकडे नाही. कारण माणसं भाव खातात. नेमकं जिथं भाव ठेवावा तिथं आपला भाव नाही आणि जिथं कृतीची गरज नाही तिथं आपण कृती करतो.संसारात प्रगती करण्यासाठी कृतीच करा आणि देव मिळविण्यासाठी भावच ठेवा. आपण नेमकं उलटं करतो संसार भावनेने आणि परमार्थ कृतीने.संत वाङ्मयात काही बळं सांगितली आहे. वैराग्याचे बळ, योगाचे बळ, ज्ञानाचे बळ, भावाचे बळ, निश्चयाचे बळ आदी. संत तुकाराम महाराजांच्या ्रजीवनामध्ये फार मोठे वैराग्याचे बळ होते. त्यामुळे वैराग्यातून जी भक्ती घडली त्यामुळे त्यांना देव भेटला. संसारात राहूनच त्यांनी वैराग्य अनुभवलं, ‘संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पूण्यधर्म केला’ योगाच्या बळाने माऊली ज्ञानेश्वरांना देव भेटला’ अंगी योगाचे बळ । मन केतुले चपळ’ आज आम्हीही योग करतो. यम, नियम, ध्यानधारणा, प्रत्याहार, प्राणायाम, स्वाध्याय, आसन, समाधी हे अष्टांग योग माऊलींनी केली म्हणून ते योगी बनले आणि त्याना देव भेटला.देव आपली कृती नाही पाहत भाव पाहतो. ‘अंतरीची घेतो गोडी। पाहे जोडी भावाची।।या पैकी कोणतेच बळ नसेल तर कमीत कमी निश्चयाचे बळ तरी असावे. निश्चय काय करू शकत नाही. तुकाराम महाराज सांगतात, निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेचि फळ।।म्हणून मनोबल वाढवूृ या, अध्यामाचा आधार घेऊन आनंदी राहून जन्माचे सार्थक करु या...- भाऊराव महाराज, मुक्ताईनगर.

टॅग्स :Jalgaonजळगाव