शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जळगावच्या बाजारपेठेत मागणी वाढल्याने डाळींमध्ये तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:54 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : जळगावच्या बाजारपेठेमध्ये सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने व आवक कमी असल्याने त्यांच्या भावात प्रती क्विंटल ...

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगावच्या बाजारपेठेमध्ये सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने व आवक कमी असल्याने त्यांच्या भावात प्रती क्विंटल ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून सुरुवातीपासूनच त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. यात गेल्या वर्षी दिलासा दिलेल्या डाळींचे यंदा ग्राहकांसाठी चांगलेच डोकेदुखी ठरत आहे. दोन आठवड्यापूर्वी १०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झालेले गहू या आठवड्यात स्थिर असून तांदळालादेखील मागणी असली तरी त्यांचेही भाव स्थिर असल्याने तेवढा ग्राहकांना दिलासा आहे.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद, मुगाचे उत्पादन कमी झाले. हा फटका अद्यापही कायम असून ऐन खरेदीच्या हंगामात त्याचा मोठी परिणाम जाणवून डाळींमध्ये आणखी तेजी येत असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.गेल्या आठवड्यात ६८०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७२०० ते ७६०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीतही ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ५२०० ते ५५०० रुपयांवरून ५६०० ते ६००० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. गेल्या आठवड्यात ५३०० ते ५६०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५७०० ते ६००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. तर तूरडाळदेखील ७३०० ते ७५०० रुपये प्रती क्विंटलवरून ७६०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल झाली आहे.गव्हाचे भाव स्थिरअनेक ग्राहक आपल्या घरात वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवतात. त्यामुळे दिवाळीनंतर आता पुन्हा उन्हाळ््याच्या काळात गव्हाला मागणी वाढल्याने गेल्या आठवड्यात गव्हाच्या भावात ५० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली होती. या आठवड्यात मात्र गव्हाचे भाव स्थिर आहे. दोन आठवड्यांपूर्वी २१५० ते २२५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव २२०० ते २३०० रुपयावर पोहचले होते. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २१५० ते २२५० रुपये प्रती क्विंटलवरून , शरबती गहू २५५० ते २६५० रुपयांवरून २२०० ते २३०० रुपयावर पोहचले होते. चंदोसीचे भाव ३१५० ते ३९५० रुपयांवरून ३२०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले होते. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २३५० ते २४५० रुपये प्रती क्विंटलवरून २४०० ते २५०० रुपये प्रती क्विंटल झाले होते. या आठवड्यात मात्र सर्वच प्रकारच्या गव्हाच्या भावात कोणतीही वाढ न होता गेल्या आठवड्याच्याच भावावर गहू स्थिर राहिले. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे.तांदुळाचे भाव स्थिरतांदुळाची आवक नसली तरी त्याचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. यात सुगंधी मसुरी २ हजार ७०० रुपये प्रती क्विंटल, चिनोर ३ हजार रुपये प्रती क्विंटल, कालीमूछ ४ हजार रुपये प्रती क्विंटल, लचकारी कोलम ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल, आंबेमोहर ५ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल, बासमती ९०० ते १ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव