शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सहा महिन्यात दामदुप्पटीचे आमिष, शेतकऱ्याची ४० लाखांची फसवणूक

By चुडामण.बोरसे | Updated: September 14, 2022 20:54 IST

नागपूरच्या कंपनी संचालकाविरुद्ध गुन्हा

चाळीसगाव जि. जळगाव : स्मार्ट व्हिजन मल्टिरियल सोलुशन प्रा. लि. नागपूर या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केलेली रक्कम सहा महिन्यांतच दामदुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून शेतकऱ्याची ४० लाखात फसवणूक केली. याबाबत कंपनीचा संचालक संजय विठोबा उमाटे (रा.नागपूर)  याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सहा महिन्यात दामदुप्पट रक्कमेचे आमीष दाखविल्याने पुंडलीक दौलत पाटील (रा. उंबरखेड ता. चाळीसगाव) यांनी ६ ऑक्टोबर २०१० मध्ये  वरील कंपनीच्या नावाने असलेल्या बँक खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन भरली. त्यानंतर टप्याटप्याने त्यांनी बँकेत  ४० लाख रुपयांची रक्कम गुंतवणूक केली.

त्यानंतर पाटील यांनी नागपूर येथील कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. गुंतवणूकीच्या रकमेला सहा महिने झाल्यानंतर पाटील यांनी पैशाची मागणी केली असता   संजय उमाटे याने उलट उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली. उमाटे हा नागपूर येथील कंपनीचे कार्यालय व मोबाईल फोन बंद करून पळून गेल्याची खात्री झाल्यावर पुंडलीक पाटील यांनी याबाबत धंतोली पोलीस स्टेशन नागपूर व पोलीस अधिक्षक जळगाव यांच्या कार्यालयात ऑनलाईनने तक्रार केली होती.

गुंतवणूक केलेली रक्कम आजपावेतो परत न मिळाल्याने अखेर पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांत उमाटेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी