शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

आता तरी सुधरा... नियम पाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:14 IST

एकीकडे जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी आदेश काढून नियम पाळण्याचे आवाहन करण्यात ...

एकीकडे जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी आदेश काढून नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडून त्याच तत्परतेने त्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शासन, प्रशासकीय यंत्रणा ही लोकांमध्ये जनजागृती करून ही साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिल्या लाटेनंतर साथ आटोक्यात आली असे वाटत असतानाच बेफिकीरपणा वाढल्याने पहिल्या लाटेपेक्षाही अधिक अशी दुसरी लाट आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जिल्ह्यात दररोज हजार-बाराशे रुग्ण आढळून येत आहेत. गंभीर रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक राहिलेले नाहीत. त्यांना ऑक्सिजनची गरज भासली तर ती यंत्रणाही तोकडी पडत आहे. सामाजिक संस्थांनी ही अडचण ओळखून पुढे येत मदतीचा हात दिला आहे. या सामाजिक संस्थांकडून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन लोकांना माफक शुल्क आकारून उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळत आहे. कोविड सेंटर्सदेखील फुल्ल असल्याने मोहाडी येथील बांधकाम सुरू असलेल्या रुग्णालयात तातडीने व्यवस्था करीत मोठे कोविड केअर सेंटर प्रशासनाकडून सोमवारपासून सुरू करण्यात येत आहे. जनतेच्या कराच्या पैशांमधूनच हा सर्व खर्च होत आहे. त्यामुळे जनतेनेही शासन, प्रशासनाकडून वेळोवेळी केले जाणारे नियम, आवाहन काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. शासन, प्रशासन हे नागरिकांचा जीव वाचविण्यासाठीच ही सर्व धडपड करीत आहे, हे जनतेला माहिती असतानाही व परिस्थिती गंभीर बनलेली असतानाही नागरिक मात्र बाजारात गर्दी करताना दिसून येत आहेत. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन सातत्याने केले जात आहे. मास्क वापरण्याचे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र प्रत्येकजण सोयीने वागत असल्याने रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याचेच चित्र आहे. शेवटी शासन, प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांनाही एक मर्यादा आहे. ती जर नागरिकांनी लक्षात घेतली नाही व नियम पाळले नाहीत तर नंतर बेड मिळाला नाही, ऑक्सिजन मिळाला नाही, रेमडेसिवीर सारखे महत्वाचे इंजेक्शन मिळाले नाही म्हणून जीव गमवायची वेळ येऊ शकते. प्रशासन रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी पावले उचलत आहेच, पण नागरिकांनी ते खरेदी करण्याची वेळच येणार नाही, अशीच खबरदारी घेतली तर काय हरकत आहे?