शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

मागील वर्षीची चूक सुधारून प्रशिक्षणाला दर्जेदार माणसे पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:42 PM

राज्य समन्वयक डॉ.अविनाश पोळ

ठळक मुद्दे पानी फाऊंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धेसाठी कार्यशाळा चित्रफितीने भारावले उपस्थित मागील वर्षी दोन तालुक्यात १०४ कोटी लिटर पाणीसाठा

जळगाव: दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी मागील वर्षी केले त्यापेक्षा अधिक प्रयत्न करून, अधिक जोमाने काम करा. जिल्ह्यात मागील वर्षी जी चूक झाली ती सुधारून यंदा अधिक दर्जेदार व या कामाची मनापासून आवड असलेल्यांनाच प्रशिक्षणासाठी पाठवा, असे आवाहन आमिरखानच्या पानी फाऊंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे राज्य समन्वयक डॉ.अविनाश पोळ यांनी केले. या स्पर्धेंतर्गत राज्यातील पहिली कार्यशाळा गुरूवार, १३ डिसेंबर रोजी जळगावातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यमंदिरात दुपारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा अधिक्षक कृषी  अधिकारी संभाजी ठाकूर, पानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक विकास गायकवाड, नाशिक जिल्हा समन्वयक सुकदेव भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले.चित्रफितीने भारावले उपस्थितयावेळी दुष्काळाशी दोन हात ही १७ मिनिटांची चित्रफित दाखविण्यात आली. त्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी कशा पद्धतीने आपसातील वाद, मतभेद मिटवून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना कसे यश मिळाले, हे दाखविण्यात आले. ते पाहून या कार्यशाळेला उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ भारावले.मागील वर्षी दोन तालुक्यात १०४ कोटी लिटर पाणीसाठापानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक गायकवाड यांनी मागील वर्षी अमळनेर व पारोळा या दोन तालुक्यांचा समावेश या योजनेत होता. त्याचा आढावा सादर केला. या दोन्ही तालुक्यात मिळून सुमारे १०४ कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला. त्यातून सुमारे २ लाख टँकर भरले जाऊ शकतील. तसेच त्याची बाजारभावानुसार किंमत १० कोटी रूपये असेल असे सांगितले.सरकारी यंत्रणेकडे बघण्याचा चष्मा बदलाडॉ.पोळ म्हणाले की, शिकून, ज्ञान घेऊन सरकारी खुर्चीत बसलेल्या अधिकाºयांकडे आपण जात नाही. कारण आपला सरकारी यंत्रणेकडे बघण्याचा चष्मा वेगळा आहे. मात्र आपण चांगल्या हेतूने गेलो तर यंत्रणा निश्चित मदत करते, हा माझा अनुभव आहे. माझी कोणतीही संस्था नाही. संत गाडगेबाबांचीही संस्था नव्हती. तरीही ते मंत्रालयात गेले तर मुख्यमंत्री उतरून खाली येत असत. ही त्यांच्या नैतिकतेची ताकद होती. दुर्देवाने ही ताकद निर्माण करण्यात आपण कमी पडतो. सरकारी यंत्रणेत खूप ताकद आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सरकारी यंत्रणेतील अधिकारी मित्रमंडळींच्या मदतीमुळेच बिबळेवाडी या सातारा जिल्'ातील गावात अनेक अडथळे पार करून महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, तसेच बायोगॅस युनिट उभारण्यात कसे यश मिळविले, याचा किस्सा उपस्थितांना ऐकविला.स्पर्धेचे निकषही सुधारीतडॉ.पोळ म्हणाले की, स्पर्धेचे निकषही यंदा सुधारीत केले आहेत. तसेच गेल्या वर्षी ७५ तालुक्यांचा समावेश होता. यंदा ७६ तालुक्यांचा समावेश केला आहे. केवळ जळगावसाठी हा बदल करून चाळीसगाव व जामनेर तालुक्यांचा समावेश केला  असल्याचे सांगितले.