शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दिलासा..... तूर, हरभरा व उडीद डाळीच्या भावात मोठी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 13:18 IST

नवीन आवक वाढल्याचा परिणाम : तूर डाळ १००० ते ११००, हरभरा डाळ १००० ते ११०० तर उडीद डाळीचे भाव १६०० ते २१०० रुपये प्रती क्विंटलने कमी

जळगाव : रब्बी हंगाम चांगला असल्याने नवीन कडधान्याची व डाळींची आवक वाढल्याने तूर, हरभरा व उडीद डाळीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. तूर डाळीचे १००० ते ११०० रुपयांनी कमी होऊन ७७०० ते आठ हजार रुपये, हरभरा डाळ १००० ते ११०० रुपयांनी कमी होऊन ५००० ते ५४०० रुपयांवर तर उडीद डाळीचे भाव १६०० ते २१०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ८००० ते ८४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून अति पावसामुळे डाळींचे भाव जास्त राहण्याची चिंताही दूर झाली आहे.देशातील डाळ निर्मितीमध्ये जळगावचा मोठा वाटा असून येथे तयार झालेली डाळ देशातील विविध भागासह विदेशातही निर्यात होते. त्यामुळे कडधान्याच्या उत्पादनाचा एकूणच परिणाम जळगावच्या बाजारपेठेवर होत असतो. हल्ली महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान या भागातून मोठ्या प्रमाणात कच्चा माल येऊ लागल्याने डाळींचे उत्पादन वाढल्याने डाळींचे भाव कमी होण्यास मदत होत आहे.रब्बी हंगामाची साथअति पावसामुळे यंदा उडीद-मुगाला मोठा फटका बसला व या डाळींचे भाव दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात वाढले. त्यात मूग डाळीने शंभरी पार केली तर उडीद डाळही नव्वदीच्या पुढे गेली. त्यामुळे रब्बी हंगामात तूर व हरभरा चांगला येऊन भाव कमी राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार यंदा सर्वत्र चांगले पाणी असल्याने व थंडीचेही प्रमाण चांगले असल्याने हरभरा व तुरीचे चांगले उत्पादन आले.बाजारात आवक वाढलीरब्बी हंगाम चांगला आल्याने बाजारात हरभरा व तूर डाळीची आवक सुरू झाली आहे. जळगावात दररोज १० ते १५ टन तुरीच्या डाळीची आवक होत असून हरभरा डाळदेखील सात ते आठ टनापर्यंत पोहचली आहेत. जळगावातील दालमिलसह तुरीची डाळ लातूर, परतवाडा, अकोला, मलकापूर येथूनही येत आहे. अशाच प्रकारे दिल्ली, मध्यप्रदेशातून हरभरा डाळ येत आहे.चिंता दूरचार वर्षांपूर्वी तूर डाळीचे भाव दोनशे रुपये प्रती किलोच्या पुढे गेल्याने सर्वच चिंतीत झाले होते. त्यानंतर मात्र दुसऱ्या वर्षापासून कमी झाले. मात्र यंदा अति पावसामुळे उडीद, मुगाच्या डाळींचा अनुभव पाहता वर्षभराच्या धान्य खरेदी वेळी तूर डाळीचेही भाव कडाडता की काय, अशी चिंता होती. मात्र आवक वाढल्याने भाव कमी झाले व सर्वांची चिंताही दूर झाली आहे.भावात घसरणगेल्या आठ ते दहा दिवसांच्या तुलनेत डाळींचे भाव चांगलेच घसरले आहे. ८००० ते ९००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या तूर डाळीच्या भावात १००० ते १३०० रुपयांनी घसरण ती आता ७७०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे. अशाच प्रकारे ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीच्या भावात १००० ते ११०० रुपये प्रती क्विंटलने घसरण होऊन ती ५००० ते ५४०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे तर दहा हजार ते १०,५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या उडीद डाळीच्या भावात १६०० ते २००० रुपये प्रती क्विंटलने घसरण होऊन ती ८००० ते ८४०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे.मुगाची डाळ मात्र खातेय ‘भाव’तूर, हरभरा व उडीद डाळीच्या भावात घसरण झाली असली तरी मूग डाळ मात्र अजूनही ‘भाव’ खात आहे. ९६०० ते १०,००० रुपये प्रती क्विंटलवर असलेली मुगाची डाळ त्याच भावावर स्थिर आहे. अतिपावसामुळे मुगाला मोठा फटक बसल्याने आवकच कमी आहे, त्यामुळे या डाळीचे भाव कमी होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.यंदा रब्बी हंगामात कडधान्याचे चांगले उत्पादन आल्याने सध्या डाळींची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे डाळींचे भाव कमी झाले आहे.-प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव