शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

प्रशासनाची प्रतिमा होतेय मलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 12:06 IST

हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेत विविध घोटाळे लागोपाठ गाजत आहेत. मात्र प्रत्येक वेळी काही तरी पळवाटा काढून प्रकरण थंड बस्त्यात टाकले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या या जिल्हा परिषदेकडे नागरिकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. आतापर्यंत गेल्या काही वर्षातच गणवेश घोटाळा, शालेय पोषण आहार प्रकरण, अपंग युनीट ...

हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेत विविध घोटाळे लागोपाठ गाजत आहेत. मात्र प्रत्येक वेळी काही तरी पळवाटा काढून प्रकरण थंड बस्त्यात टाकले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या या जिल्हा परिषदेकडे नागरिकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. आतापर्यंत गेल्या काही वर्षातच गणवेश घोटाळा, शालेय पोषण आहार प्रकरण, अपंग युनीट मधील बोगस नियुक्ती याद्या ही सगळी प्रकरणे खूप गाजली मात्र आकाश झाकाळून जावे आणि मेघांचा प्रचंड गडगडाट व्हावा... परंतु पाऊस न पडता झाकाळलेले आकाश पुन्हा निरभ्र व्हावे... असाच अनुभव या प्रकरणांमध्ये आला. जणू काही झालेच नाही.. असा या प्रकरणांचा शेवट झाला. कारवाई काही झालीच नाही. अपंग युनीट प्रकरणात बोगस नियुक्ती याद्या तयार झाल्या परंतु कोणासही नियुक्ती दिली नाही, म्हणजे फसवणूक झाली नाही... असा अर्थ काढून गुन्हा दाखल झाला नाही. खूप ओरड होत असताना उपयोग होत नसल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित केल्याने शिक्षण मंत्री तावडे यांनी या प्रकरणाची विशेष चौकशी समिती मार्फत चौकशी होईल, असे जाहीर केले मात्र जवळपास दोन महिने उलटूनही कार्यवाही झाली नाही. नुकतीच बुरशीयुक्त शेवयांचा पुरवठा पाचोरा तालुक्यात झाल्याची तक्रार आल्यावर स्थायी समिती सभेत पुरवठादाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा ठराव होवूनही गुन्हा दाखल होवू शकला नाही. खराब पाकिटे बदलून दिल्याने गुन्हा दाखल होवू शकत नाही, असा निर्णय पोलिसांनी दिला. परंतु खराब शेवया खाण्यात येवून मुलांच्या आरोग्यास हानी पोहचली असती तर याला जबाबदार कोण राहिले असते ? या प्रश्नावर मात्र हानी पोहचली असती तर गुन्हा दाखल होवू शकला असता असे मत व्यक्त होत आहे. परंतु एकीकडे चोरी केली तर गुन्हा दाखल होतोच परंतु चोरीचा प्रयत्न केला तरीही गुन्हा दाखल होतो. मग अशा प्रकरणांमध्ये गुन्हा घडण्याची वाट का पाहिली जाते ? अपंग युनीट प्रकरणात फसवणूक झाली नाही असे म्हटले तरी फसवणुकीचा प्रयत्न निश्चित झाला आहे. शेवया प्रकरणात कोणास हानी पोहचली नसली तरी पुरवठादारांचा हलगर्जीपणा गंभीर आहे, यामुळे गुन्हा दाखल का केला जात नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याप्रकारे एकूणच ही प्रकरणे जाणीवपूर्वक दडपली जात असल्याचा संशय मात्र दिवसेंदिवस नागरिकांमध्ये बळावत आहे. कोण जबाबदार हे स्पष्ट होत नसले तरी प्रशासनाची आणि शासनाचीही प्रतिमा यात मलीन होत आहे हे निश्चित. परंतु याची कोणालाही फिकीर नाही.. हे दुर्दैव आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव