शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

प्रशासनाची प्रतिमा होतेय मलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 12:06 IST

हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेत विविध घोटाळे लागोपाठ गाजत आहेत. मात्र प्रत्येक वेळी काही तरी पळवाटा काढून प्रकरण थंड बस्त्यात टाकले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या या जिल्हा परिषदेकडे नागरिकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. आतापर्यंत गेल्या काही वर्षातच गणवेश घोटाळा, शालेय पोषण आहार प्रकरण, अपंग युनीट ...

हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेत विविध घोटाळे लागोपाठ गाजत आहेत. मात्र प्रत्येक वेळी काही तरी पळवाटा काढून प्रकरण थंड बस्त्यात टाकले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या या जिल्हा परिषदेकडे नागरिकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. आतापर्यंत गेल्या काही वर्षातच गणवेश घोटाळा, शालेय पोषण आहार प्रकरण, अपंग युनीट मधील बोगस नियुक्ती याद्या ही सगळी प्रकरणे खूप गाजली मात्र आकाश झाकाळून जावे आणि मेघांचा प्रचंड गडगडाट व्हावा... परंतु पाऊस न पडता झाकाळलेले आकाश पुन्हा निरभ्र व्हावे... असाच अनुभव या प्रकरणांमध्ये आला. जणू काही झालेच नाही.. असा या प्रकरणांचा शेवट झाला. कारवाई काही झालीच नाही. अपंग युनीट प्रकरणात बोगस नियुक्ती याद्या तयार झाल्या परंतु कोणासही नियुक्ती दिली नाही, म्हणजे फसवणूक झाली नाही... असा अर्थ काढून गुन्हा दाखल झाला नाही. खूप ओरड होत असताना उपयोग होत नसल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित केल्याने शिक्षण मंत्री तावडे यांनी या प्रकरणाची विशेष चौकशी समिती मार्फत चौकशी होईल, असे जाहीर केले मात्र जवळपास दोन महिने उलटूनही कार्यवाही झाली नाही. नुकतीच बुरशीयुक्त शेवयांचा पुरवठा पाचोरा तालुक्यात झाल्याची तक्रार आल्यावर स्थायी समिती सभेत पुरवठादाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा ठराव होवूनही गुन्हा दाखल होवू शकला नाही. खराब पाकिटे बदलून दिल्याने गुन्हा दाखल होवू शकत नाही, असा निर्णय पोलिसांनी दिला. परंतु खराब शेवया खाण्यात येवून मुलांच्या आरोग्यास हानी पोहचली असती तर याला जबाबदार कोण राहिले असते ? या प्रश्नावर मात्र हानी पोहचली असती तर गुन्हा दाखल होवू शकला असता असे मत व्यक्त होत आहे. परंतु एकीकडे चोरी केली तर गुन्हा दाखल होतोच परंतु चोरीचा प्रयत्न केला तरीही गुन्हा दाखल होतो. मग अशा प्रकरणांमध्ये गुन्हा घडण्याची वाट का पाहिली जाते ? अपंग युनीट प्रकरणात फसवणूक झाली नाही असे म्हटले तरी फसवणुकीचा प्रयत्न निश्चित झाला आहे. शेवया प्रकरणात कोणास हानी पोहचली नसली तरी पुरवठादारांचा हलगर्जीपणा गंभीर आहे, यामुळे गुन्हा दाखल का केला जात नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याप्रकारे एकूणच ही प्रकरणे जाणीवपूर्वक दडपली जात असल्याचा संशय मात्र दिवसेंदिवस नागरिकांमध्ये बळावत आहे. कोण जबाबदार हे स्पष्ट होत नसले तरी प्रशासनाची आणि शासनाचीही प्रतिमा यात मलीन होत आहे हे निश्चित. परंतु याची कोणालाही फिकीर नाही.. हे दुर्दैव आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव