शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मनपा मालकीच्या जागांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 11:58 IST

अजय पाटीलनागरिकांच्या सोई-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नेहमी अर्थिक कर्जाचे रडगाणे सुरु होते. मनपावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामध्ये शहरातील विकास होणे कठीण असल्याचा कांगावा मनपाकडून केला जातो. मात्र, मनपा मालकीच्या कोट्यवधीच्या मालमत्ता मात्र धूळ खात पडल्या आहेत. घरकुल योजनेतील अपूर्णावस्थेत असलेल्या घरकुलांमध्ये मोडतोड करून बांधकाम साहित्याचे चोरीचे प्रकार नित्याचेच ...

अजय पाटीलनागरिकांच्या सोई-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नेहमी अर्थिक कर्जाचे रडगाणे सुरु होते. मनपावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामध्ये शहरातील विकास होणे कठीण असल्याचा कांगावा मनपाकडून केला जातो. मात्र, मनपा मालकीच्या कोट्यवधीच्या मालमत्ता मात्र धूळ खात पडल्या आहेत. घरकुल योजनेतील अपूर्णावस्थेत असलेल्या घरकुलांमध्ये मोडतोड करून बांधकाम साहित्याचे चोरीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मात्र याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अजय घेंगट यांनी आयुक्तांनी दिलेल्या पत्रामुळे हा गंभीर प्रकार समोर आला आहे. मनपा मालकीच्या अनेक जागांचे गैरव्यवहार होत असल्याचे या पत्रात म्हटले होते. तसेच या प्रकरणी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता या फाईली गायब झाल्याचे आढळून आल्याचेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराबाबत मनपा प्रशासन कोणतीही वाच्यता करण्याच्या स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मनपाच्या जागांचे गैरव्यहार होत आहेत तर दुसरीकडे कोट्यवधींच्या या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कुठल्याही उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात नसल्याने अनेकवेळा काही जणांकडून या जागेचे ताबा घेण्याचे प्रकारदेखील झाले आहेत. तत्कालीन जळगाव नगरपालिकेने शहरात घरकुल योजना सुरू केली होती. त्यातील अनेक योजनांच्या बांधलेल्या घरकुलांचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. अर्धवट बांधलेल्या या घरकुलांचे सांगडे तसेच पडून आहेत. गेल्या काही वर्षांपासून या मालमत्तांच्या सुरक्षेसाठीदेखील प्रशासनाने कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याने या बांधकामांची मोडतोड करण्यात आली आहे. सम्राट कॉलनी व महादेव मंदिरासमोरील घरकुलांमध्ये अक्षरश: म्हशी बांधण्यात येत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने महापालिकेने राबविलेल्या अपूर्णावस्थेतील घरकुल योजनांच्या जमिनी म्हाडाला देवून त्यातून उत्पन्न मिळविण्याच्या पर्यायाचा विचार प्रशासनाचाहोता. याबाबत महासभेत ठरावदेखील करण्यात आला. म्हाडानेदेखील याबाबत सकारात्मकता दर्शविली. मात्र याबाबतही प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही होत नसल्याने तोही प्रस्ताव रखडला आहे. मनपाच्याच मालकीची असलेली जागा आज धूळ खात पडून असून, याकडे सुस्त प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरात मनपा मालकीच्या सुमारे १०० कोटीच्यावर अधिक भाव असलेल्या मालमत्ता आहेत. या जागांचा उपयोग केल्यास मनपाला आर्थिक फायदा देखील होवू शकतो.

टॅग्स :Jalgaonजळगाव