शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

निधी देत नसाल तर यावल पंचायत समिती बरखास्त करा

By admin | Updated: June 24, 2017 12:35 IST

यावल येथे पं.स.सदस्यांच्या बैठकीत ठराव

ऑनलाईन लोकमत

यावल,दि.24 : तालुक्याचे मिनी मंत्रालय समजल्या जात असलेल्या  पंचायत समितीला  सध्या केवळ सेस फंडाच्या किरकोळ निधीशिवाय दुसरा निधीच मिळत नसल्याने आणि त्यातील 33 टक्के निधी समाज कल्याण , महिला व बालविकास, अंपग कल्याण योजनेसाठी द्यावा लागत असल्याने उर्वरीत 67 टक्क्यामधून ग्रामविकासासाठी तोकडी रक्कम राहत आहे. त्यामुळे   पंचायत समिती बरखास्त करा अशा आशयाचा ठराव शासनाकडे पाठविण्याचा प्रस्ताव शुक्रवारी पं.स. सदस्यांच्या बैठकीत काँग्रेसचे गटनेते  शेखर पाटील यांनी मांडला. सदस्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. हा ठराव  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल़े
 पं.स. सदस्यांची सभापती संध्या महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मासिक सभा झाली. आयत्या वेळी   सेस फंडाचा विषय चर्चेत आला.  सेस फंडाअंतर्गत 13 लाखाचा निधी प्राप्त  झाला आहे. त्यातील 20 टक्के निधी समाज कल्याण, 10 टक्के   महीला व बाल विकास प्रकल्प तर  3 टक्के निधी अपंग कल्याण योजनेअंतर्गत असा 4 लाख 29 हजार रुपये खर्च करावयाचा आहे. उर्वरीत 67 टक्के  रकमे अंतर्गत  आठ लाख 71  हजार रुपये निधी 67 ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या 87 गावासाठी विकासनिधी म्हणून मिळेल. पं.स.त 10 सदस्य आहेत. प्रत्येकाच्या हिश्यावर 81 हजार 100 रुपये येतील.  सदस्यांच्या कार्यक्षत्रात सुमारे 10 ते 15 गावाचा समावेश असल्याने मिळणा:या रकमेतून कोणत्या गावाला किती निधी द्यावा असा प्रश्न  असल्याने आणि कोणत्या गावास निधी देता आला नाही तर विनाकारण वाद निर्माण होण्याची भिती आहे त्यामुळे  अल्प निधी शासन देत असले तर पंचायत समिती  कशासाठी यावर चर्चा झाली.   त्यामुळे पंचायत समिती बरखास्त करा अशा आशयाचा ठराव ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठवून द्यावा असे ठरले.