शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबल्यास चाऱ्याची बिकट स्थिती होणार - पालकमंत्र्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:31 IST

प्रसंगी शेजारील राज्याची मदत घेणार

जळगाव : टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक लाख एकरवर चाºयाची लागवड करण्यात आली असून सध्या चाºयाची स्थिती बºयापैकी असली तरी पाऊस लांबल्यास बिकट स्थिती उद्भवू शकते, असे संकेत महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले. यासाठी दक्षता म्हणून शेजारील राज्यांशी चर्चा केलेली असून अशी स्थिती उद्भवल्यास त्या राज्यांची मदत घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.चंद्रकांत पाटील हे शनिवारी दुष्काळी पाहणीसाठी जिल्हा दौºयावर आले असताना संध्याकाळी जिल्हा नियोजन भवन येथे पत्रकार परिषद झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी पाणी, चारा, गुरांच्या छावण्या, रोजगार, पिक कर्ज, पिक विमा या संदर्भात माहिती दिली.जिल्ह्यातील संस्था पुढे आल्यास छावण्या सुरु करणारदुष्काळामुळे राज्यात गुरांच्या १३०० छावण्या सुरू असून त्यात साडे नऊ लाख गुरे आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यात एकही संस्था पुढे न आल्याने सरकारी छावणी नसल्याचे ते म्हणाले. यासाठी आतादेखील कोणत्या संस्था पुढे आल्यास छावणी सुरू करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. या सोबत गुरांसाठी देण्यात येणारे अनुदान ७० रुपयांवरून १०० रुपये प्रती जनावर करण्यात आले असून वेळ पडल्यास ते आणखी वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले.पावसाचा अंदाज घेत पाण्याचा वापरजिल्हा दौºयादरम्यान चाळीसगाव, पारोळा, अमळनेर या तीन तालुक्यातील नऊ गावांमध्ये जाऊन आपण पाहणी केली. यात फळबागांची स्थिती वाईट असल्याचे त्यांना मान्य करीत पिण्याचे पाणी, चारा यांची अधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी लोक जे मागत आहे, ते आपण देत असल्याचाही दावाही त्यांनी केला. या सोबत जिल्ह्यात १९० गावांना १७१ टँकरद्वारे पाणी पुरविले जात असल्याचे सांगत पावसाचा अंदाज घेऊन पाण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. यात वाघूर धरणात पुरेसा जलसाठा असला तरी जून अखेरपर्यंत पाऊस येणार नसल्याचे हवामान खात्याने म्हटल्याने पाण्याची काटकसर केली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.अमळनेर तालुक्यात पिक विम्याबाबत चौकशीचे आदेशशेतकऱ्यांच्या पिकांचा विमा काढल्यानंतर बाधीत शेतकºयांना नुकसान भरपाईचे वाटप केले जात असून यात ३२०० कोटी रुपये वाटप झाल्याचे पालकमंत्री पाटील म्हणाले. मात्र या संदर्भात अमळनेर तालुक्यात तक्रारी आल्या असून त्या संदर्भात चौकशीचेआदेशदिले असल्याचेही त्यांनीसांगितले.शेतकºयांच्या अनुदानातून रक्कम वजा केल्यास बँकांवर कारवाईशेतकºयांना कोरडवाहू, बागायती, फळबाग अनुदान ६७ लाख शेतकºयांना वाटप केले असून जिल्ह्यात पाहणी केलेल्या गावातून या बाबत एकही तक्रार नसल्याचे पालकमंत्री म्हणाले. या सोबतच दुष्काळी अनुदानाचे ३८६ कोटी ३८ लाख रुपये वाटप झाल्याचे ते म्हणाले. मात्र हे अनुदान बँका कृषी कर्जात वर्ग करीत असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता बँका शेतकºयांचे अनुदान अथवा पिक विम्याची रक्कम वजा करू शकत नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगत तसे होत असल्यास व तशा तक्रारी आल्यास बँकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.जिल्हा बँकेचे चुकीचे धोरणशेतकºयांनी कर्जाची परतफेड केली तरी त्यांना जिल्हा बँक ५० टक्केच कर्ज देत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की, ज्यांनी कर्जफेड केली आहे, त्यांना पूर्ण कर्ज मिळालेच पाहिजे, असे सांगत बँक जर ५० टक्केच कर्ज देत असेल तर ते चुकीचे असल्याचेही पालकमंत्र्यांनी मान्य केले. इतकेच नव्हे कर्ज माफीची तारीख व परतफेड या दरम्यानचे व्याज सरकार भरणार असल्याचे परिपत्रक असले तरी बँका त्यास जुमानत नसल्याच्या मुद्यावर बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकराची नोंद घेण्यात येईल व बँकांना सूचना देऊ.‘बीएचआर’प्रकरणी एसपींकडून माहिती घेणारभाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतपेढीतील गैरव्यवहार प्रकरणी पतपेढीची ईडीमार्फत चौकशी करण्यासोबतच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फेही चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे का वर्ग झाला, याबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, या प्रकराची आपण पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव