शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबल्यास चाऱ्याची बिकट स्थिती होणार - पालकमंत्र्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:31 IST

प्रसंगी शेजारील राज्याची मदत घेणार

जळगाव : टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक लाख एकरवर चाºयाची लागवड करण्यात आली असून सध्या चाºयाची स्थिती बºयापैकी असली तरी पाऊस लांबल्यास बिकट स्थिती उद्भवू शकते, असे संकेत महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले. यासाठी दक्षता म्हणून शेजारील राज्यांशी चर्चा केलेली असून अशी स्थिती उद्भवल्यास त्या राज्यांची मदत घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.चंद्रकांत पाटील हे शनिवारी दुष्काळी पाहणीसाठी जिल्हा दौºयावर आले असताना संध्याकाळी जिल्हा नियोजन भवन येथे पत्रकार परिषद झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी पाणी, चारा, गुरांच्या छावण्या, रोजगार, पिक कर्ज, पिक विमा या संदर्भात माहिती दिली.जिल्ह्यातील संस्था पुढे आल्यास छावण्या सुरु करणारदुष्काळामुळे राज्यात गुरांच्या १३०० छावण्या सुरू असून त्यात साडे नऊ लाख गुरे आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यात एकही संस्था पुढे न आल्याने सरकारी छावणी नसल्याचे ते म्हणाले. यासाठी आतादेखील कोणत्या संस्था पुढे आल्यास छावणी सुरू करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. या सोबत गुरांसाठी देण्यात येणारे अनुदान ७० रुपयांवरून १०० रुपये प्रती जनावर करण्यात आले असून वेळ पडल्यास ते आणखी वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले.पावसाचा अंदाज घेत पाण्याचा वापरजिल्हा दौºयादरम्यान चाळीसगाव, पारोळा, अमळनेर या तीन तालुक्यातील नऊ गावांमध्ये जाऊन आपण पाहणी केली. यात फळबागांची स्थिती वाईट असल्याचे त्यांना मान्य करीत पिण्याचे पाणी, चारा यांची अधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी लोक जे मागत आहे, ते आपण देत असल्याचाही दावाही त्यांनी केला. या सोबत जिल्ह्यात १९० गावांना १७१ टँकरद्वारे पाणी पुरविले जात असल्याचे सांगत पावसाचा अंदाज घेऊन पाण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. यात वाघूर धरणात पुरेसा जलसाठा असला तरी जून अखेरपर्यंत पाऊस येणार नसल्याचे हवामान खात्याने म्हटल्याने पाण्याची काटकसर केली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.अमळनेर तालुक्यात पिक विम्याबाबत चौकशीचे आदेशशेतकऱ्यांच्या पिकांचा विमा काढल्यानंतर बाधीत शेतकºयांना नुकसान भरपाईचे वाटप केले जात असून यात ३२०० कोटी रुपये वाटप झाल्याचे पालकमंत्री पाटील म्हणाले. मात्र या संदर्भात अमळनेर तालुक्यात तक्रारी आल्या असून त्या संदर्भात चौकशीचेआदेशदिले असल्याचेही त्यांनीसांगितले.शेतकºयांच्या अनुदानातून रक्कम वजा केल्यास बँकांवर कारवाईशेतकºयांना कोरडवाहू, बागायती, फळबाग अनुदान ६७ लाख शेतकºयांना वाटप केले असून जिल्ह्यात पाहणी केलेल्या गावातून या बाबत एकही तक्रार नसल्याचे पालकमंत्री म्हणाले. या सोबतच दुष्काळी अनुदानाचे ३८६ कोटी ३८ लाख रुपये वाटप झाल्याचे ते म्हणाले. मात्र हे अनुदान बँका कृषी कर्जात वर्ग करीत असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता बँका शेतकºयांचे अनुदान अथवा पिक विम्याची रक्कम वजा करू शकत नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगत तसे होत असल्यास व तशा तक्रारी आल्यास बँकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.जिल्हा बँकेचे चुकीचे धोरणशेतकºयांनी कर्जाची परतफेड केली तरी त्यांना जिल्हा बँक ५० टक्केच कर्ज देत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की, ज्यांनी कर्जफेड केली आहे, त्यांना पूर्ण कर्ज मिळालेच पाहिजे, असे सांगत बँक जर ५० टक्केच कर्ज देत असेल तर ते चुकीचे असल्याचेही पालकमंत्र्यांनी मान्य केले. इतकेच नव्हे कर्ज माफीची तारीख व परतफेड या दरम्यानचे व्याज सरकार भरणार असल्याचे परिपत्रक असले तरी बँका त्यास जुमानत नसल्याच्या मुद्यावर बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकराची नोंद घेण्यात येईल व बँकांना सूचना देऊ.‘बीएचआर’प्रकरणी एसपींकडून माहिती घेणारभाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतपेढीतील गैरव्यवहार प्रकरणी पतपेढीची ईडीमार्फत चौकशी करण्यासोबतच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फेही चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे का वर्ग झाला, याबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, या प्रकराची आपण पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव