शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
4
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
5
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
6
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
7
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
8
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
9
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
10
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
11
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
12
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
13
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
15
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
16
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
17
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
18
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
19
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
20
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 

स्व.गोपीनाथ मुंडे असते तर माझ्यासारख्या निष्ठावंतांवर अन्याय झाला नसता : एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 19:59 IST

बहुजन समाजात भारतीय जनता पक्ष पोहोचविण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे यांचे कार्य फार मोठे होते. आज ते नसल्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ते असते तर आमच्या सारख्या निष्ठावानांवर अन्याय झाला नसता अशी भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देगोपीनाथ गडावर रवाना होण्यापूर्वी साधला संवादस्व.गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलच्या आठवणींना दिला उजाळास्व.गोपीनाथ मुंडे लोकनेते असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना केले मोठे

मुक्ताईनगर, जि.जळगाव : बहुजन समाजात भारतीय जनता पक्ष पोहोचविण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे यांचे कार्य फार मोठे होते. आज ते नसल्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ते असते तर आमच्या सारख्या निष्ठावानांवर अन्याय झाला नसता अशी भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.माजी मंत्री एकनाथराव खडसे हे माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या निमंत्रणानुसार बुधवारी बीड येथील गोपीनाथ गडाकडे रवाना झाले. आपण दरवर्षी गोपीनाथ गडावर जात असून गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेला जिव्हाळा त्यांच्या निधनानंतरदेखील कायम असल्याचे सांगत मुंडे गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतरदेखील त्यांचे महत्त्व कमी झाले नाही. त्यांच्या कार्याबाबत नेहमी चर्चा समाजात व राजकारणात केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.तर युती कायम राहिली असतीस्व.मुंडे हे जिवंत असते तर महाराष्ट्रात शिवसेना व भाजपची युती कायम राहिली असती व भाजपची स्थिती कितीतरी पटीने चांगली राहिली असती. भाजप व शिवसेना यांच्यात समन्वयकाची भुमिका नेहमी त्यांनी घेतली होती. भाजप व शिवसेनेसोबतच त्यांचे अन्य पक्षातही चांगले संबध होते. त्यामुळे त्यांनी टाकलेला शब्द देखील विरोधक अडवित नसत. एखादी चुक झाल्यानंतर उदार मनाने ती मान्य करण्याचा मोठा गुण त्यांच्याकडे होता. एखादी चूक पक्षाच्या ठिकाणी झाल्यास ते खुल्या मनाने मान्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सेना-भाजप जे काही वाद असायचे ते तात्काळ सोडवण्याचे काम गोपीनाथ मुंडे हे करत असत. लोकनेते असल्याने त्यांनी नेहमी कार्यकर्त्यांना मोठे केल. दरवर्षी आपण गोपीनाथ गडाकडे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगर