शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

सावधान, बेशिस्त पार्कींग केली तर येईल घरपोच मेमो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:56 IST

ई-चलन : अडीच महिन्यात २ हजार ८३१ जणांना पाठविली दंडाची पावती जळगाव : रस्त्यावर कुठेही बेशिस्तपणे वाहन पार्कींग केले ...

ई-चलन : अडीच महिन्यात २ हजार ८३१ जणांना पाठविली दंडाची पावतीजळगाव : रस्त्यावर कुठेही बेशिस्तपणे वाहन पार्कींग केले तर यापुढे वाहतूक पोलीस बोलायला येणार नाही.आता अशा वाहनांचा मोबाईलमध्ये फोटो घेऊन तुमच्या घरीच दंडाची पावती धडकणार आहे. याची प्रत्यक्ष सुरुवात शहर वाहतूक शाखेने केली असून अडीच महिन्यात २ हजार ८३१ जणांना घरपोच मेमो पाठविण्यात आला आहे. त्यापैकी १ हजार २४१ जणांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात जाऊन दंड भरला आहे. ही रक्कम ३ लाख १९ हजार ६०० रुपये इतकी वसूल झाली आहे. अजून १ हजार ५९० जणांकडून दंडाची रक्कम वसूल होणार आहे. तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या संकल्पनेतून विकसीत झालेली ई-चलन प्रणाली ३ जानेवारी पासून कार्यान्वित झाली. ई-चलन प्रणालीसाठी खास अशा यंत्रणेसह एक मोठे मॉनेटर, प्रिंटर संगणक प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. मोठ्या मॉनेटरवर चौक व तेथील नियम तोडणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र स्पष्टपणे दिसते. यासाठी सहा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीसच घेताहेत फोटोकारवाईच्यावेळी पोलिसांशी वाद होतात. त्यामुळे आता शहरात बेशिस्त पार्कींग व वाहतूक कोंडी होत असेल तर पोलीस नियमभंग करणाºया वाहनाचे फोटो घेऊन ते ई-चलनसाठी वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाठविले जाते. तेथून मेमो तयार होऊन तो वाहनधारकाच्या पत्यावर जातो. शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांकडून फोटो काढायला सुरु झाली आहे. विशेष म्हणजे साामान्य नागरिकही अशा वाहनांचे फोटो काढून वाहतूक शाखेकडे पाठवू शकतात.५६ कॅमेऱ्यांची नजरशहरात पोलीस दलाच्यावतीने ५६ सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. त्यांद्वारे नियम मोडणाºया वाहनाचे चित्र वाहतूक शाखेतील नियंत्रण कक्षात दिसेल. तेथील आॅपरेटर त्या गाडीच्या चित्रावर क्लिक करताच त्या वाहनाचे स्नॅप शॉर्ट घेतले जातात. त्यानंतर वाहनाचे सॉफ्टवेअर असलेल्या एका संगणकावर त्या वाहनाचा क्रमांक टाकला जातो. या क्रमांकावरुन वाहनाबाबची इत्यंभूत माहिती येते. गुन्ह्याचा प्रकार टाकल्यानंतर त्यासाठी असलेले दंडाचे शुल्क, घटनास्थळ, तारीख, वेळ व फोटो असलेली प्रतच बाहेर येते. ही प्रत (मेमो) वाहनधारकाच्या मुळ पत्त्यावर पाठविले जात आहे. मेमोवर वाहनधारकाने नेमकी काय चुक केली याचे छायाचित्रही राहत असल्याने चूक नाकारताच येत नाही.गर्दी, अपघात, वाहतूक कोंडीवरही नियंत्रणया प्रणालीचा नुसते वाहतूक नियमाचे उल्लंघन इतकाच उपयोग होत नाही, तर रस्त्यावर कुठे अपघात झाला, कुणाची चूक आहे, रॅश ड्रायव्हींग, वाहतूक कोंडी कुठे झालेली आहे यावरही नियंत्रण ठेवले जात आहे. त्याशिवाय मोकळ्या रस्त्यावर मोबाईलवर बोलणे, तीन सीट याचेही चित्रिकरण होत आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक घटना या सीसीटीव्हीत कैद होत आहे. आकाशवाणी, जिल्हाधिकारी कार्यालय, स्वातंत्र चौक, जिल्हा रुग्णालय, कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा थांबा, नेहरु पुतळा, सरस्वती डेअरी, टॉवर चौक, भीलपुरा, असोदा रोड, रथ चौक, सुभाष चौक, बेंडाळे चौक आदी ठिकाणी हे ५६ कॅमेरे आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव