शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

बाबा मंत्री राहिले असते तर विकासकामे दुप्पट झाली असती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:38 IST

‘लोकमत’ भेटीत खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केली भावना

ठळक मुद्दे प्रशासकीय प्रक्रियेमुळे महामार्ग चौपदरीकरणास विलंब झाल्याची खंतसमवयस्क खासदारांसोबत सुसंवादभुसावळ-पुणे रेल्वे सुरू होणार

जळगाव : बाबा मंत्री राहिले असते तर जिल्ह्यात दुप्पट विकासकामे झाली असती, अशी भावना खासदार रक्षा खडसे यांनी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यासंदर्भात ‘लोकमत’ भेटीप्रसंगी व्यक्त केली. जिल्ह्यात आतापर्यंत जी विकासकामे केली ती त्यांच्या दोन वर्षांच्या मंत्रीपदाच्या काळातीलच असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.‘लोकमत’ कार्यालयाला त्यांनी सोमवारी सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी त्यांचे स्वागत केले. चार वर्षात मतदार संघातील अनेक विकासकामे मार्गी लावली. तसेच रखडलेली अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.अनुभवाचा फायदा झालाचार वर्षातील कारकीर्द कशी राहिली? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षात असल्याने जास्त कामे करण्याची संधी मिळाली. त्यामुळे चार वर्षे कसे गेले कळलेच नाही. लोकसभा मतदारसंघ खूप मोठा असतो. मात्र ग्रा.पं. व जि.प. सदस्य म्हणून काम केलेले असल्याने त्या अनुभवाचा निश्चित फायदा झाला. खासदारांना जेमतेम ५ कोटींचा निधी मिळतो. त्यातून संपूर्ण मतदार संघात कामे करणे शक्य नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमध्ये गावांची कामे बसवून ती मार्गी लावली.दत्तक गावांचा विकास कितपत झाला? याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या की हातेड हे गाव मी दत्तक घेतले. त्या संकल्पनेत लोकांचाही विकास कामात सहभाग तेवढाच अपेक्षित होता. मात्र लोकांना वाटले आता कोट्यवधींनी निधी येणार. तरीही आम्ही ४ कोटींची कामे केली. आता मलकापूर तालुक्यातील धरणगाव दत्तक घेतले आहे. तेथे विकासकामे सुरू आहेत.समवयस्क खासदारांसोबत सुसंवादतुमच्या समवस्क खासदारांशी कसे ट्युनींग आहे? याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, खासदार हिना गावीत, प्रीतम मुंडे, श्रीकांत शिंदे, हरियानातील चौटाला आदी आम्ही समवयस्क खासदार नेहमीच आपआपल्या मतदारसंघात काय नवीन काम केले? याबाबत चर्चा करीत असतो. दुसऱ्याने केलेले चांगले काम आपल्या मतदार संघातही करण्याचा प्रयत्न करतो.खासदारकीची पहिलीच टर्म असल्याने दिल्लीतील कामकाजाच्या अनुभवाबाबत त्या म्हणाल्या की दिल्लीत काम करायला मिळाली म्हणून स्वत:ला नशिबवान मानते. या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न आहे.भुसावळ-पुणे रेल्वे सुरू होणारखासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, केंद्रशासनाच्या अखत्यारितील रेल्वे तसेच रस्त्यांच्या कामाला गती आली आहे. ४ रेल्वे उड्डाणपुलांचे काम प्रलंबित होते. त्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. भुसावळ रेल्वे स्टेशनची अनेक कामे सुरू आहेत. सचखंड एक्सप्रेसला रावेर येथे थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न आहे. तसेच तिसºया व चौथ्या रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर भुसावळ-पुणे रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले आहे. महामार्गांचीही अनेक कामे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे मार्गी लागली.‘मेगा रिचार्ज’मुळे पाणीप्रश्न मिटणार... मेगा रिचार्ज प्रकल्पाचे सर्वेक्षण झाले असून ‘डीपीआर’ करण्यात आला आहे. त्याचे नितीन गडकरी यांच्याकडे होईल. त्यानंतर अंदाजपत्रक तयार होऊन त्याची अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. ही योजना पुढील ५० वर्षे निम्म्या जिल्ह्यासाठी लाभदायी ठरेल.जळगाव-मुंबई विमानसेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नजळगाव-पुणे विमानसेवेसाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी झुम एअरलाईन्सला प्रस्ताव दिला आहे. उडान योजनेंतर्गत आधीच्या विमान कंपन्यांशी झालेले करार संपत आले असून आता नव्याने निविदा प्रक्रिया केली जाणार असल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले. जळगाव-मुंबई विमानसेवा सुरळीत करण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. लवकरच यश मिळेल, असा आशावादही व्यक्त केला.