शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

अध्यक्ष असल्याची लाज वाटली

By admin | Updated: July 17, 2014 15:01 IST

चोपडा आगारातील बसची दयनीय अवस्था पाहून आपल्याला एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष असल्याची लाज वाटल्याचे हताश उद्गार जीवन गोरे यांनी काढले.

 

 
जळगाव : एस.टी. चा प्रवास हा सुरक्षित प्रवास, हा सर्वसामान्य नागरिकांचा असलेला विश्‍वास हेच आपले भांडवल आहे. प्रवाशांचा हा विश्‍वास तुम्ही तोडू नका. चोपडा आगारातील बसची दयनीय अवस्था पाहून आपल्याला एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष असल्याची लाज वाटल्याचे हताश उद्गार जीवन गोरे यांनी काढले. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
एस.टी.महामंडळाच्या कार्यशाळेत दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वागत समारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्र पाटील, एस.टी.चे प्रादेशिक परिवहन अधिकारी गुलाबराव पाटील, विभागनियंत्रक राजीव साळवे, यंत्र अभियंता प्रमोद पाटील यांची उपस्थिती होती. सुरुवातीला एस.टी.च्या विविध संघटनांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पदाधिकारी व महिला कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन अध्यक्षांना सादर केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गोरे यांनी एस.टी.कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या वेतन करारामुळे दोन हजार कोटी रुपयांचा भार पडला असल्याचे सांगितले. जो पर्यंत कामगार आणि प्रशासन समाधानी राहत नाही तो पर्यंत ते प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणार नाही अशी आपली त्या मागची भूमिका होती. महामंडळाने वेतन करार करून आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. मात्र आता अधिकारी व कर्मचार्‍यांनीदेखील प्रामाणिकपणे काम करून त्याची परतफेड करण्याची गरज आहे. प्रवाशांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून प्रवाशांना आकर्षित करण्यावर भर द्या असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. 
कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण राज्यभर दौरा काढला आहे. सकाळी चोपडा आगाराची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी उद्घोषणा कक्षच नसल्याचे लक्षात आले. आगारात उभ्या असलेल्या बहुतांश एस.टी.बसेची अवस्था ही खराब झाली होती. हे सारे चित्र पाहिल्यानंतर त्यावेळी 'आपण एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष असल्याची लाज वाटली.'
------------
काही महिला कर्मचार्‍यांनी पिण्याच्या पाण्याबाबत आणि शौचालयाबाबतची समस्या मांडली. गोरे यांनी विभाग नियंत्रक साळवे यांना त्याचा जाब विचारला. प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आधुनिक यंत्र, स्वच्छतागृह आणि चालक व वाहकांसाठी विश्रांतीगृह हे उपक्रम राज्यभरात चांगले राबविण्यात येत आहेत. तर मग जळगावात हे उपक्रम राबविण्यात काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी प्रत्येक बसस्थानकावर संपूर्ण स्टीलच्या खुच्र्या बसविण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले.