शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

अध्यक्ष असल्याची लाज वाटली

By admin | Updated: July 17, 2014 15:01 IST

चोपडा आगारातील बसची दयनीय अवस्था पाहून आपल्याला एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष असल्याची लाज वाटल्याचे हताश उद्गार जीवन गोरे यांनी काढले.

 

 
जळगाव : एस.टी. चा प्रवास हा सुरक्षित प्रवास, हा सर्वसामान्य नागरिकांचा असलेला विश्‍वास हेच आपले भांडवल आहे. प्रवाशांचा हा विश्‍वास तुम्ही तोडू नका. चोपडा आगारातील बसची दयनीय अवस्था पाहून आपल्याला एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष असल्याची लाज वाटल्याचे हताश उद्गार जीवन गोरे यांनी काढले. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
एस.टी.महामंडळाच्या कार्यशाळेत दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वागत समारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्र पाटील, एस.टी.चे प्रादेशिक परिवहन अधिकारी गुलाबराव पाटील, विभागनियंत्रक राजीव साळवे, यंत्र अभियंता प्रमोद पाटील यांची उपस्थिती होती. सुरुवातीला एस.टी.च्या विविध संघटनांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पदाधिकारी व महिला कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन अध्यक्षांना सादर केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गोरे यांनी एस.टी.कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या वेतन करारामुळे दोन हजार कोटी रुपयांचा भार पडला असल्याचे सांगितले. जो पर्यंत कामगार आणि प्रशासन समाधानी राहत नाही तो पर्यंत ते प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणार नाही अशी आपली त्या मागची भूमिका होती. महामंडळाने वेतन करार करून आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. मात्र आता अधिकारी व कर्मचार्‍यांनीदेखील प्रामाणिकपणे काम करून त्याची परतफेड करण्याची गरज आहे. प्रवाशांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून प्रवाशांना आकर्षित करण्यावर भर द्या असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. 
कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण राज्यभर दौरा काढला आहे. सकाळी चोपडा आगाराची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी उद्घोषणा कक्षच नसल्याचे लक्षात आले. आगारात उभ्या असलेल्या बहुतांश एस.टी.बसेची अवस्था ही खराब झाली होती. हे सारे चित्र पाहिल्यानंतर त्यावेळी 'आपण एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष असल्याची लाज वाटली.'
------------
काही महिला कर्मचार्‍यांनी पिण्याच्या पाण्याबाबत आणि शौचालयाबाबतची समस्या मांडली. गोरे यांनी विभाग नियंत्रक साळवे यांना त्याचा जाब विचारला. प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आधुनिक यंत्र, स्वच्छतागृह आणि चालक व वाहकांसाठी विश्रांतीगृह हे उपक्रम राज्यभरात चांगले राबविण्यात येत आहेत. तर मग जळगावात हे उपक्रम राबविण्यात काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी प्रत्येक बसस्थानकावर संपूर्ण स्टीलच्या खुच्र्या बसविण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले.