शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

दुसऱ्यांकडून १५ ते २० हजार रुपये घेतो, तू १० हजार दे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:12 IST

सरकारी योजनेतून कर्ज प्रकरण मंजूर करण्यासह शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लाचखोरांची ...

सरकारी योजनेतून कर्ज प्रकरण मंजूर करण्यासह शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लाचखोरांची साखळीच असून, त्यांच्यातील संभाषणावरून हितसंबंध उघड झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या कार्यालयातील इतरांची चौकशी व पुरावे गोळा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या आनंद देवीदास विद्यागर (वय ५०, रा. अजय कॉलनी, रिंगरोड मूळ, रा.औरंगाबाद) या प्रकल्प अधिकाऱ्याला दोन दिवस पोलीस कोठडी मिळण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने विद्यासागर याला दोन दिवस कोठडी सुनावली.

भुसावळ येथील ३५ वर्षीय तक्रारदार तरुण सुशिक्षित बेरोजगार असून, त्यांनी पीएमईजीपी या शासनाच्या योजनेंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचा प्रकल्प अधिकारी विद्यासागर याच्याकडे प्रकरण सादर केले होते. हे प्रकरण अपलोड करून बँकेस पाठविण्याच्या मोबदल्यात विद्यासागर याने तक्रारदार याला मी दुसऱ्या लोकांकडून १५ ते २० हजार रुपये घेतो, असे सांगून दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान, अटकेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने संशयिताची घरझडती घेतली, मात्र त्यात काहीच आढळून आले नाही. मात्र आरोपी व फिर्यादी यांच्यातील संभाषणावरून याची साखळी कनिष्ठ ते वरिष्ठ असल्याचे निष्पन्न झाले आहे. बुधवारी विद्यागर याला न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील भारती खडसे यांनी युक्तिवाद केला. बँक खाते, लॉकर, पतपेढी ठेवी, शेअर्स व जंगम मालमत्तेची चौकशी करण्यासाठी त्याला दोन दिवस कोठडी सुनावण्यात आली.

ताई काम झाले, म्हणताच विद्यागर जाळ्यात

सुशिक्षित बेराेजगार तरुणाने लाचेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश भामरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, हवालदार अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ व महेश सोमवंशी यांनी मंगळवारी जिल्हा उद्योग केंद्राच्या बाहेर सापळा रचला. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताच तक्रारदाराने ‘ताई माझे काम झाले, मी येथून निघतो’, असा फोन करण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदाराने फोन केला अन‌् काही सेकंदातच विद्यागर जाळ्यात अडकला.