शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

भीमराज की बेटी मै तो जय भीमवाली हूँ । शाहीर प्रतापसिंग बोदडे यांची मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 00:16 IST

लहानपणापासून आपल्यावर प्रसिद्ध शाहीर व विचारवंत वामनदादा कर्डक यांचा प्रभाव आहे. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन काम करीत आहे. ‘उमर मे बाली, भोली भाली, शिल की झोली हू, भीमराज की बेटी मै तो जय भीम वाली हू’ या गीताने आपल्याला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले असल्याचे मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध शाहीर, गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे प्रतापसिंग बालचंद बोदडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

विनायक वाडेकर ।मुक्ताईनगर, जि.जळगाव : लहानपणापासून आपल्यावर प्रसिद्ध शाहीर व विचारवंत वामनदादा कर्डक यांचा प्रभाव आहे. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन काम करीत आहे. ‘उमर मे बाली, भोली भाली, शिल की झोली हू, भीमराज की बेटी मै तो जय भीम वाली हू’ या गीताने आपल्याला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले असल्याचे मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध शाहीर, गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे प्रतापसिंग बालचंद बोदडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूल्यांची जपणूक करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा असलेले, महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर व विचारवंत वामन कर्डक यांचे शिष्य म्हणून मुक्ताईनगर येथील शाहीर प्रतापसिंग बालचंद बोदडे म्हणजेच सिर्फ नामही काफी है या उक्तीनुसार प्रचलित असलेले सामाजिक प्रबोधन आणि गीतांच्या माध्यमातून युवकांना नैतिक आचरणाचे धडे देणारे व्यक्तिमत्व म्हणून नावाजलेले आहेत.प्रश्न : ख्यातनाम शाहीर वामन कर्डक यांचा तुमच्यावर प्रभाव कसा पडला व त्यांचे शिष्य म्हणून तुम्ही केव्हापासून कार्य सुरू केले?१९६८ ला पुणे विद्यापीठातील प्री युनिव्हर्सिटी कोर्स मी मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथे करत होतो. त्यावेळी शाहीर वामनदादा कर्डक हे औरंगाबाद येथे आले होते. लहानपणापासून वामनदादा यांचे नाव ऐकून होतो. त्यांच्या गीतांमध्ये सामाजिक समरसता, आंबेडकरी विचार आणि प्रबोधन यासारखे महत्वाचे विषय असायचे. त्यामुळे मला बालपणापासून त्यांचा व त्यांच्या गीतांचा लळा लागला होता. माझ्या सुदैवाने दादांची भेट औरंगाबाद येथे झाली व मी माझ्यातील बालपणापासूनची गायनाची असलेली आवड त्यांच्यासमोर व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी मला त्यांचे शिष्य म्हणून स्वीकारले.प्रश्न : प्रतापसिंग बोदडे ते बब्बू कवाल ह्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल?उत्तर : बालपणापासून मला शायरीची आणि गायनाची आवडही होतीच. त्यातच वामनदादांच्या विचारांचा व गीतांचा प्रभाव माझ्यावर पडलेला असल्याने मी जेव्हा मराठवाडा विद्यापीठात एम.ए. करत होतो त्यावेळी वामनदादांची भेट झाली आणि मी गायनाला सुरुवात केली. अर्थातच शिक्षण व गायन हे माझे दोन्ही वाढत गेले. कॉलेजला असताना ढोलकी व हार्मोनियम वादक जरी सोबत असले तरी मी गायन करायला लागलो. त्यावेळी नगर येथील आदिनाथ भुईंगळ आणि अमरावती येथील आत्माराम अभ्यंकर हे मला ढोलकी व हार्मोनियमसाठी अनुक्रमे मदत करत होते. माझ्या गायनाचा व आवाजाचा प्रभाव इतका आगळा वेगळा होता की मला गीत गाण्यासाठी विचारणा होऊ लागली व त्यावेळी माझे नाव बाबू कव्वाल म्हणून ओळखले जाऊ लागले. अशाप्रकारे शिक्षण घेत असतानाच बब्बू कवाल हा विकसित झाला.प्रश्न : गीतकार म्हणून गीते लिहायला केव्हापासून सुरुवात केली. गीतांचा आशय काय राहिला?१९६९ पासूनच मी गीते लिहायला सुरुवात केली. माझ्या गीतांचा आशय कायम सामाजिक आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा पगडा असलेले व्यसनाधीनता, युवक आर्थिकसंपन्न होत नाही तोपर्यंत राजकारणापासून दूर, शिक्षण हीच शेती तसेच बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा त्रिकोण हे राहिले आहेत. १९७१ला मी शिक्षण विभागात काम केले व त्यानंतर १९७८ ते २००९ पर्यंत मध्य रेल्वेतची पार्सल सुपरिटेंडेंट म्हणून काम केले. या काळात मला रेल्वेतील सहकार्यामुुळे मिळालेला वेळ खऱ्या अर्थाने लिखाणासाठी प्रवृत्त करून गेला.प्रश्न -आपल्या सामाजिक आशयातील गीतांचे काही ओव्या या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहेत त्या ओव्याबद्दल थोडे काही सांगा?‘भीमाच्या अंगचे पाणी, आहे का कुणाचंयाने बगीच्या फुलविला, उभ्या बाभूई बनात’या शब्दांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बाभुळ वनासारख्या सामाजिक दैना अवस्थेला बगिच्यासारख्यात वैचारिक रूपांतर करून बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व विशद केले आहे.‘थांबा हो थांबा गाडीवान दादा’या गीतात बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रसंग लेख रेखाटला आहे.‘दोनच राजे इथे गाजलेकोकण पुण्य भूमीवर,एक त्या रायगडावरएक चवदार तळ्यावर’या गीतांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे महत्त्व वर्णन केले आहे.‘गुलामी का टूट गया जाल है मेरे भीम का कमाल’यातून बाबासाहेबांनी तत्कालीन गुलामगिरीच्या परिस्थितीवर केलेले मात व्यक्त केली आहे.महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध प्रचलित आणि आवडते शायरी तसेच डीजे साँग म्हणून‘उमर मे बाली, भोली भालीशिल की झोली हुंभीमराज कि बेटी मै तोजय भीम वाली हु!’या गीताचा उल्लेख करता येतो.

टॅग्स :cultureसांस्कृतिकMuktainagarमुक्ताईनगर