शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

आवक घटल्याने कोथिंबीरची शंभरी, कांद्याचा काहीसा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसामुळे भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होत असून त्यांचे भाव चांगलेच वाढत आहे. यामध्ये कोथिंबीरने तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसामुळे भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होत असून त्यांचे भाव चांगलेच वाढत आहे. यामध्ये कोथिंबीरने तर शंभरी गाठली असून मेथीदेखील ८० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. किराणा साहित्यामध्ये शेंगदाण्याचे भाव १० रुपये प्रति किलोने वाढून ते १२० ते १३० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. इतर किराणा साहित्य मात्र स्थिर आहे.

जून महिन्यात गायब असलेला पाऊस जुलै महिन्यात चांगला सक्रिय झाल्याने खरीप पिकांना त्याचा लाभ होत आहे. मात्र भाजीपाल्याच्या शेतात चांगलीच कसरत होत आहे. त्यामुळे मराठवाडा भागातून येणाऱ्या भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम झाला आहे. यात कोथिंबीर, मेथी यांच्यावर अधिक परिणाम आहे. पावसापूर्वी २० क्विंटल आवक असलेल्या कोथिंबीरची आवक आता १० ते १२ क्विंटलवर आली आहे. त्यामुळे सलग दोन आठवड्यापासून त्याचे भाव वाढत आहे. गेल्या आठवड्यात ८० रुपयांवर असलेले कोथिंबीरचे भाव सध्या १०० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे मेथीदेखील ८० रुपये प्रति किलो झाली आहे.

डाळींचा दिलासा, शेंगदाण्यात वाढ

या आठवड्यात डाळींचे भाव स्थिर असून शेंगदाण्याचे भाव मात्र वधारले आहेत. यामध्ये तूरडाळ ९० ते ९४ रुपये, मूगडाळ-८५ ते ९० रुपये, उडीदडाळ- ८५ ते ९० रुपये, हरभरा डाळ-६२ ते ६६ रुपये, मसूर डाळ - ६० ते ६५ रुपये प्रति किलोवर आहे. शेंगदाण्याचे भाव १२० ते १३० रुपये प्रति किलो झाले आहेत. इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत.

फुलकोबीचे भाव दुप्पट

पालेभाज्यांसह इतरही भाजीपाल्याचे भाव वाढत आहे. यामध्ये फुलकोबीचे तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत थेट दुप्पट भाव झाले आहेत. २० रुपयांवर असलेली फुलकोबी आता थेट ४० रुपये प्रति किलो झाली आहे.

हिरवी मिरचीचा दिलासा

इतर भाजीपाल्याच्या भावात वाढत होत असताना हिरव्या मिरचीचे भाव कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात ६० रुपये प्रति किलो असलेली मिरची ४० रुपये प्रति किलोवर आली आहेत. कांद्याचेही भाव ३० रुपयांवर २५ रुपये प्रति किलोवर आले आहेत.

दर आठवड्याला महागाई वाढतच आहे. कधी किराणा साहित्य तर कधी भाजीपाला वधारत आहे. त्यामुळे आर्थिक भार वाढतच आहे. महागाई कमी होणे गरजेचे आहे.

- योगेश भावसार, ग्राहक

या आठवड्यात शेंगदाण्याच्या भावात काहीसी वाढ झाली आहे. मात्र सध्या डाळींचे तसेच इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे. मागणी कमी असल्याने भाववाढ फारसी होत नाही.

- रमेश वाणी, व्यापारी.

सध्या भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम झाल्याने त्याचे भाव वाढत आहे. यामध्ये कोथिंबीर व मेथीच्या भावात अधिक वाढ झाली आहे. कांद्याचे भाव काहीसे कमी झाले आहेत.

- सूरज चौधरी, भाजीपाला विक्रेते