शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

प्रत्येकवेळी भावनांचा उद्रेक कसा थांबवायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST

मराठा आरक्षण निकाल : पोलीस दलाच्या बैठकीत समाजातील मान्यवरांचा सवाल जळगाव : मराठा समाजाने प्रत्येक वेळी सामाजिक भान ठेवून ...

मराठा आरक्षण निकाल : पोलीस दलाच्या बैठकीत समाजातील मान्यवरांचा सवाल

जळगाव : मराठा समाजाने प्रत्येक वेळी सामाजिक भान ठेवून मोर्चे काढले, आंदोलने केली. प्रत्येक वेळी भावनांचा उद्रेक थांबवलेला आहे आहे. गायकवाड आयोगाला गावोगावी जाऊन वस्तुस्थिती दाखविली, असे असतानाही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाच्या काळात हा निकाल देऊन नेमके काय साधले, असाही सवाल मराठा समाजातील मान्यवरांनी पोलीस दलाच्या बैठकीत उपस्थित केला.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांची बैठक घेतली. त्या बैठकीत प्रत्येकाने आपले मत मांडले.

प्रा. डी. डी. बच्छाव यांनी सांगितले की, गायकवाड समिती जळगाव जिल्ह्यात आली तेव्हा आपण स्वतः चाळीसगाव चोपडा, पाचोरा या भागात फिरलो. कोरडवाहू व बागायती शेती व शेतकऱ्यांचे घर त्यांना दाखविले. वस्तुस्थिती समजल्यानंतर आयोगाने अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला, असे असताना असा निकाल येणे अत्यंत दुःख व वेदनादायी आहे.

डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले की, भारतातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ६० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे पोलिस व सरकारी यंत्रणेवर मोठा ताण आहे, असे असताना याच काळात मराठा आरक्षणाचा निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने नेमके काय साधले आहे याचे आश्चर्य वाटते. हा निकाल सहा महिने उशिरा नाही देता आला असता.

विनोद देशमुख यांनी प्रत्येक वेळी मराठा समाजच समजूतदाराची भूमिका घेतो. या निकालामुळे जगायचे की समजूतदारपणा दाखवायचा हेच कळत नाही. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे, त्यामुळे हे प्रकार आधी थांबवावे. त्यांनी राजकीय पोळी भाजून घेऊ नये.

कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवा : पोलीस अधीक्षक

या बैठकीत मराठा समाजातील मान्यवरांची मते जाणून घेतल्यानंतर पोलीस अध्यक्ष डॉ. प्रवीण मुंढे यांनी आपल्या प्रत्येकाच्या भावना राज्यशासनाकडे कळवल्या जातील. या निकालामुळे कुठेही कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लागू नये. तरुण पिढी भावनेच्या भरात काही चुकीचे पाऊल उचलू शकते, त्यासाठी आपणच पुढाकार घेऊन चांगले काय, वाईट काय, याची जाणीव करून द्यावी. शेवटी पोलीस दलाला कायदा राबवावा लागतो असे मत व्यक्त करून शांततेचे आवाहन केले.

या बैठकीला संजय पवार, रवी देशमुख, हेमंत साळुंके, सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, ॲड.सचिन पाटील, दीपक सूर्यवंशी, प्रमोद पाटील, किरण बच्छाव, हिरेश कदम यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा व सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

आज समाजाची बैठक

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर चर्चा व निर्णय घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी सात वाजता नूतन मराठा महाविद्यालयात समाजातील सर्वपक्षीय मान्यवरांची बैठक बोलावण्यात आली आहे. या निकालात राज्य शासनाने तोडगा काढावा व पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जावे, असे मत मांडण्यात आले.