शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

प्रत्येकवेळी भावनांचा उद्रेक कसा थांबवायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST

मराठा आरक्षण निकाल : पोलीस दलाच्या बैठकीत समाजातील मान्यवरांचा सवाल जळगाव : मराठा समाजाने प्रत्येक वेळी सामाजिक भान ठेवून ...

मराठा आरक्षण निकाल : पोलीस दलाच्या बैठकीत समाजातील मान्यवरांचा सवाल

जळगाव : मराठा समाजाने प्रत्येक वेळी सामाजिक भान ठेवून मोर्चे काढले, आंदोलने केली. प्रत्येक वेळी भावनांचा उद्रेक थांबवलेला आहे आहे. गायकवाड आयोगाला गावोगावी जाऊन वस्तुस्थिती दाखविली, असे असतानाही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाच्या काळात हा निकाल देऊन नेमके काय साधले, असाही सवाल मराठा समाजातील मान्यवरांनी पोलीस दलाच्या बैठकीत उपस्थित केला.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांची बैठक घेतली. त्या बैठकीत प्रत्येकाने आपले मत मांडले.

प्रा. डी. डी. बच्छाव यांनी सांगितले की, गायकवाड समिती जळगाव जिल्ह्यात आली तेव्हा आपण स्वतः चाळीसगाव चोपडा, पाचोरा या भागात फिरलो. कोरडवाहू व बागायती शेती व शेतकऱ्यांचे घर त्यांना दाखविले. वस्तुस्थिती समजल्यानंतर आयोगाने अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला, असे असताना असा निकाल येणे अत्यंत दुःख व वेदनादायी आहे.

डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले की, भारतातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ६० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे पोलिस व सरकारी यंत्रणेवर मोठा ताण आहे, असे असताना याच काळात मराठा आरक्षणाचा निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने नेमके काय साधले आहे याचे आश्चर्य वाटते. हा निकाल सहा महिने उशिरा नाही देता आला असता.

विनोद देशमुख यांनी प्रत्येक वेळी मराठा समाजच समजूतदाराची भूमिका घेतो. या निकालामुळे जगायचे की समजूतदारपणा दाखवायचा हेच कळत नाही. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे, त्यामुळे हे प्रकार आधी थांबवावे. त्यांनी राजकीय पोळी भाजून घेऊ नये.

कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवा : पोलीस अधीक्षक

या बैठकीत मराठा समाजातील मान्यवरांची मते जाणून घेतल्यानंतर पोलीस अध्यक्ष डॉ. प्रवीण मुंढे यांनी आपल्या प्रत्येकाच्या भावना राज्यशासनाकडे कळवल्या जातील. या निकालामुळे कुठेही कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लागू नये. तरुण पिढी भावनेच्या भरात काही चुकीचे पाऊल उचलू शकते, त्यासाठी आपणच पुढाकार घेऊन चांगले काय, वाईट काय, याची जाणीव करून द्यावी. शेवटी पोलीस दलाला कायदा राबवावा लागतो असे मत व्यक्त करून शांततेचे आवाहन केले.

या बैठकीला संजय पवार, रवी देशमुख, हेमंत साळुंके, सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, ॲड.सचिन पाटील, दीपक सूर्यवंशी, प्रमोद पाटील, किरण बच्छाव, हिरेश कदम यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा व सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

आज समाजाची बैठक

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर चर्चा व निर्णय घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी सात वाजता नूतन मराठा महाविद्यालयात समाजातील सर्वपक्षीय मान्यवरांची बैठक बोलावण्यात आली आहे. या निकालात राज्य शासनाने तोडगा काढावा व पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जावे, असे मत मांडण्यात आले.