शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वाघ वाचणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:29 IST

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील पूर्णा नदीपात्रात आढळून आलेल्या वाघाच्या मृतदेहाविषयी कारणाचा उलगडा झाला आहे. उसाच्या शेतात मुक्कामी असलेल्या वाघाला तारेच्या कुंपणात वीज प्रवाह सोडून ठार मारण्यात आले. वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नायलॉनच्या दोरीने बांधून बैलांकरवी हा मृतदेह फरफटत नदीपात्राजवळ नेण्यात आला. तेथे तो पाण्यात ढकलून देण्यात आला. पाणी ...

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील पूर्णा नदीपात्रात आढळून आलेल्या वाघाच्या मृतदेहाविषयी कारणाचा उलगडा झाला आहे. उसाच्या शेतात मुक्कामी असलेल्या वाघाला तारेच्या कुंपणात वीज प्रवाह सोडून ठार मारण्यात आले. वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नायलॉनच्या दोरीने बांधून बैलांकरवी हा मृतदेह फरफटत नदीपात्राजवळ नेण्यात आला. तेथे तो पाण्यात ढकलून देण्यात आला. पाणी पिण्यासाठी आलेला वाघ बुडून मेल्याची बतावणी करण्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा प्रयत्न फसला आहे. उसाच्या शेतात वाघाचे केस आढळले असून शेतापासून नदीपात्रापर्यंत फरफटल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत. वनविभागाने चौघा शेतकºयांना अटक केली आहे. पुढील कारवाई कायद्यानुसार होईल, पण वाघाच्या हत्येनंतर मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्रातील वाघांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोन महिन्यापूर्वीच एका वाघीणीचा मृत्यू झाला. ती वृध्द असल्याचे वनविभागाचे म्हणणे होते. त्यापूर्वीही सातत्याने वाघाचे मृत्यू, अपघाती मृत्यू घडत आहेत. दुर्देवाने स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधी, वनविभाग आणि वन्यजीवप्रेमी व्यक्ती आणि संस्था घटना घडल्यावर चर्चा करतात, मात्र नंतर पाठपुरावा होत नाही, हे वास्तव आहे. व्याघ्र संचार मार्ग, अधिवास क्षेत्र, सौर कुंपण, डोलारखेडा येथील शेतकºयांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. व्याघ्र संरक्षण रॅली काढली जाते. व्याघ्र परिषदा होतात. पण त्यात बाहेरगावाहून येणारे वक्ते भाषणे देतात; स्थानिक टाळ्या वाजवतात आणि सोहळा संपतो. पुन्हा पुढील वर्षी ‘ये रे माझ्या मागल्या’ असे होते. रोही, रानडुक्कर यांचा मोठा उपद्रव शेतकºयांना होतो. अन्नसाखळी असल्याने या प्राण्यांचा पाठलाग वाघ करतो आणि गारव्यामुळे केळी वा उसाच्या शेतात मुक्काम ठोकतो. तशा अर्थाने वाघ माणसाळलादेखील आहे. पण रोही, रानडुक्करांना मारण्याची परवानगी वनविभागाने दिली असली तरी ती प्रक्रिया सोपी नाही. वाघ गायब झाल्यावर विदर्भात रान पेटते. गहजब होतो. याठिकाणी तर लागोपाठ दोन वाघांचे मृत्यू झाले तरी प्रशासन गाढ झोपेत आहे. कागदे रंगवित आहे. शतकोटी वृक्ष लागवडीचा संकल्प चांगला असला तरी वन्यप्राणी नसतील, तर जंगल काय कामाचे?

टॅग्स :TigerवाघJalgaonजळगाव