शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाघ वाचणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:29 IST

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील पूर्णा नदीपात्रात आढळून आलेल्या वाघाच्या मृतदेहाविषयी कारणाचा उलगडा झाला आहे. उसाच्या शेतात मुक्कामी असलेल्या वाघाला तारेच्या कुंपणात वीज प्रवाह सोडून ठार मारण्यात आले. वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नायलॉनच्या दोरीने बांधून बैलांकरवी हा मृतदेह फरफटत नदीपात्राजवळ नेण्यात आला. तेथे तो पाण्यात ढकलून देण्यात आला. पाणी ...

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील पूर्णा नदीपात्रात आढळून आलेल्या वाघाच्या मृतदेहाविषयी कारणाचा उलगडा झाला आहे. उसाच्या शेतात मुक्कामी असलेल्या वाघाला तारेच्या कुंपणात वीज प्रवाह सोडून ठार मारण्यात आले. वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नायलॉनच्या दोरीने बांधून बैलांकरवी हा मृतदेह फरफटत नदीपात्राजवळ नेण्यात आला. तेथे तो पाण्यात ढकलून देण्यात आला. पाणी पिण्यासाठी आलेला वाघ बुडून मेल्याची बतावणी करण्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा प्रयत्न फसला आहे. उसाच्या शेतात वाघाचे केस आढळले असून शेतापासून नदीपात्रापर्यंत फरफटल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत. वनविभागाने चौघा शेतकºयांना अटक केली आहे. पुढील कारवाई कायद्यानुसार होईल, पण वाघाच्या हत्येनंतर मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्रातील वाघांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोन महिन्यापूर्वीच एका वाघीणीचा मृत्यू झाला. ती वृध्द असल्याचे वनविभागाचे म्हणणे होते. त्यापूर्वीही सातत्याने वाघाचे मृत्यू, अपघाती मृत्यू घडत आहेत. दुर्देवाने स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधी, वनविभाग आणि वन्यजीवप्रेमी व्यक्ती आणि संस्था घटना घडल्यावर चर्चा करतात, मात्र नंतर पाठपुरावा होत नाही, हे वास्तव आहे. व्याघ्र संचार मार्ग, अधिवास क्षेत्र, सौर कुंपण, डोलारखेडा येथील शेतकºयांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. व्याघ्र संरक्षण रॅली काढली जाते. व्याघ्र परिषदा होतात. पण त्यात बाहेरगावाहून येणारे वक्ते भाषणे देतात; स्थानिक टाळ्या वाजवतात आणि सोहळा संपतो. पुन्हा पुढील वर्षी ‘ये रे माझ्या मागल्या’ असे होते. रोही, रानडुक्कर यांचा मोठा उपद्रव शेतकºयांना होतो. अन्नसाखळी असल्याने या प्राण्यांचा पाठलाग वाघ करतो आणि गारव्यामुळे केळी वा उसाच्या शेतात मुक्काम ठोकतो. तशा अर्थाने वाघ माणसाळलादेखील आहे. पण रोही, रानडुक्करांना मारण्याची परवानगी वनविभागाने दिली असली तरी ती प्रक्रिया सोपी नाही. वाघ गायब झाल्यावर विदर्भात रान पेटते. गहजब होतो. याठिकाणी तर लागोपाठ दोन वाघांचे मृत्यू झाले तरी प्रशासन गाढ झोपेत आहे. कागदे रंगवित आहे. शतकोटी वृक्ष लागवडीचा संकल्प चांगला असला तरी वन्यप्राणी नसतील, तर जंगल काय कामाचे?

टॅग्स :TigerवाघJalgaonजळगाव