शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

शत्रुत्वाच्या जखमा भरुन कशा निघणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:22 IST

विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना हे काँग्रेस आघाडीपेक्षा परस्परांविरुध्द १४ ठिकाणी लढले, धुळे-नंदुरबारमधील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अंतर्गत वादाचे पडसाद उमटणार

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑातील विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना हे युती करुन लढले, परंतु ही युती मनापासून होती की नाईलाज म्हणून केली गेली असा प्रश्न उपस्थित व्हावा, असे दोन्ही पक्षांमधील वातावरण व वर्तन होते. मुंबईतील पंतप्रधानांच्या उपस्थितीतील शेवटची सभा सोडली तर युतीचे नेते एकत्रितपणे प्रचार करताना दिसले नाही. एकमेकांच्या मतदारसंघात घुसखोरी आणि बंडखोरी केल्याने दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण झाली. काहीचे वाद तर पोलीस स्टेशनपर्यंत गेले. आघाडीशी लढण्याऐवजी एकमेकांशी लढल्याने शक्तीपात झाला तो वेगळाच.भाजप-शिवसेनेचे संबंध २०१४ पेक्षाही अधिक ताणले गेले आहेत. मुंबईत हे पक्ष एकत्र आले तरीही गावपातळीवर या दोन्ही पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये वितुष्ट कायम राहील. शिवसेना कधी नव्हे ते आक्रमक झाली आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. खान्देशातील २० जागांपैकी सेनेने ६ तर भाजपने १४ जागा लढविल्या होत्या. या जागावाटपाविषयी कोणतीही खळखळ, नाराजी उघडपणे व्यक्त झाली नाही, याचा अर्थ परस्पर सामंजस्याने हे जागावाटप झाले. परंतु, सेनेच्या सर्व ६ जागांवर भाजपकडून बंडखोरी झाली. त्याचा फटका नंदुरबार-धुळे जिल्ह्यात बसला. सेनेला खाते उघडता आले नाही. पण भाजपचे संख्याबळदेखील वाढले नाही. जैसे थे राहिले. उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शिंदखेडा मतदारसंघात केलेली बंडखोरी भाजप व जयकुमार रावल यांच्या जिव्हारी लागली. ते निवडून आले, पण प्रयत्न करावे लागलेच.जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरात जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांची बंडखोरी राज्यभर खळबळ उडवून देणारी ठरली. अर्थात जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि राष्टÑवादी काँग्रेसने त्यांना समर्थन दिले.अतीशय चुरशीच्या लढतीत पाटील यांनी बाजी मारली. मात्र सेनेच्या चार अधिकृत उमेदवारांना भाजप बंडखोरांनी भंडावून सोडले . पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांना अमोल शिंदे यांनी अखेरपर्यंत झुंजवले. जळगाव ग्रामीणमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द शेवटच्या टप्प्यात बंडखोर गटाने आरोपांची राळ उठवली. चोपडा आणि एरंडोलमध्ये वेगळे चित्र नव्हते. परंतु, चौघे उमेदवार हे अनुभवी आणि निवडणूक तंत्र अवगत असल्याने तोडीस तोड ठरले. सेनेचा स्ट्राईक रेट १०० टक्के राहिला आणि मुक्ताईनगर हा बोनस ठरला. याउलट भाजपच्या जागा दोनने घटल्या आणि रोहिणी खडसे, हरिभाऊ जावळे, शिरीष चौधरी यांच्या पराभवामुळे भाजपच्या अंतर्गत असलेली बेदिली, मतभेद, संशयकल्लोळ ठळकपणे समोर आला.काँग्रेस आणि राष्टÑवादीला एकेक जागा मिळाली, तीही भाजपच्या अंतर्गत मतभेदाचा फायदा मिळाल्यामुळे हे तर उघड आहे. चाळीसगावात राजीव देशमुख-मंगेश चव्हाण, जामनेरात गिरीश महाजन-संजय गरुड, जळगावात सुरेश भोळे-अभिषेक पाटील, धुळे ग्रामीणमध्ये कुणाल पाटील-ज्ञानज्योती भदाणे, नंदुरबारमध्ये डॉ.विजयकुमार गावीत-उदेसिंग पाडवी, शहाद्यात पद्माकर वळवी-राजेश पाडवी अशा ६ ठिकाणी फक्त युती आणि आघाडी असा सामना रंगला. उर्वरित १४ मतदारसंघात युती अंतर्गत किंवा भाजप अंतर्गत लढाई झाली. त्याचे परिणाम आता दीर्घकाळ राहणार आहेत, हे उघड आहे.नंदुरबार-धुळे जिल्ह्यात सेनेला यंदाही खाते उघडता आले नाही. अक्कलकुव्याची जागा थोडक्यात गेली. धुळे आणि अक्कलकुवा या दोन्ही ठिकाणी भाजप कार्यकर्त्याकडून बंडखोरी झाली. शिवसेनेने शिंदखेड्यात जयकुमार रावल यांच्याविरोधात बंडखोरी केली. याचे पडसाद आगामी जि.प. व पं.स.निवडणुकीत उमटल्याशिवाय राहणार नाही. अमरीशभाई पटेल, शिवाजीराव दहिेते, चंद्रकांत रघुवंशी यांच्या पक्षांतरामुळे भाजप-सेना प्रबळपणे एकमेकांविरुध्द लढतील.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव