शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

संचारबंदी असतानाही दंगली होतातच कशा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:16 IST

सुनील पाटील संचारबंदी असतानाही दंगली होतातच कशा? कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. ...

सुनील पाटील

संचारबंदी असतानाही दंगली होतातच कशा?

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशाचा अर्थ असा की, कोणतीही व्यक्ती विनाकारण बाहेर फिरू शकत नाही. तसेच पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आहे. आपापल्या हद्दीत पेट्रोलिंग, नाकाबंदीच्या माध्यमातून, अनावश्यकरित्या फिरणाऱ्या लोकांना प्रतिबंध केला जातो. असे असतानाही शहर व जिल्ह्यात दोन गट समोरासमोर येत आहेत. तुंबळ हाणामारी होऊन काहीजण जखमी होतात. या प्रकरणांमध्ये परस्पर विरोधी दंगलीचे गुन्हे दाखल होत आहेत.

मंगळवारी जळगाव शहर, निंभोरा, नशिराबाद व पहुर आदी पोलीस ठाण्यांमध्ये दंगलीचे गुन्हे दाखल झाले. संचारबंदी व जमावबंदी लागू असताना या घटना घडतातच कशा? नेमकी चूक कोठे व काय? होत आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. गेल्या आठवड्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हेगारी गट शस्त्रे हातात घेऊन एकमेकांच्या समोर आले होते. संचारबंदीच्या काळात गुन्हेगारीही उफाळून येत आहे. संचारबंदी व जमावबंदी आदेशाची खरोखर अंमलबजावणी होत आहे की नाही? की फक्त मुख्य चौकातच नाकाबंदी केली जाते? संवेदनशील भाग तसेच आपापल्या बीटमध्ये पोलिसिंग होताना दिसतच नाही. त्यामुळेच अशा घटनांना वाव मिळत आहे. या घटना टाळायच्या असतील, तर खासकरून संवेदनशील भागात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ज्या ज्या ठिकाणी दंगलीचे गुन्हे दाखल झालेले आहेत, अशा गुन्ह्यांमधील बहुतांश संशयित आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे उघड झाले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडून अशा घटना घडत असताना, गुन्हेगारी दत्तक योजनेचा नेमका फायदा काय? ही योजना कागदावरच राहिली आहे की काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दोन गटातील वाद, त्यातही रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून होत असलेली कृती भविष्यकाळात निश्चितच धोकादायक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर वेळीच प्रतिबंध घालणे गरजेचे असून त्यांच्यावर सतत कारवाईची टांगती तलवार असणे इतकेच गरजेचे आहे.