शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

संचारबंदी असतानाही दंगली होतातच कशा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:16 IST

सुनील पाटील संचारबंदी असतानाही दंगली होतातच कशा? कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. ...

सुनील पाटील

संचारबंदी असतानाही दंगली होतातच कशा?

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशाचा अर्थ असा की, कोणतीही व्यक्ती विनाकारण बाहेर फिरू शकत नाही. तसेच पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आहे. आपापल्या हद्दीत पेट्रोलिंग, नाकाबंदीच्या माध्यमातून, अनावश्यकरित्या फिरणाऱ्या लोकांना प्रतिबंध केला जातो. असे असतानाही शहर व जिल्ह्यात दोन गट समोरासमोर येत आहेत. तुंबळ हाणामारी होऊन काहीजण जखमी होतात. या प्रकरणांमध्ये परस्पर विरोधी दंगलीचे गुन्हे दाखल होत आहेत.

मंगळवारी जळगाव शहर, निंभोरा, नशिराबाद व पहुर आदी पोलीस ठाण्यांमध्ये दंगलीचे गुन्हे दाखल झाले. संचारबंदी व जमावबंदी लागू असताना या घटना घडतातच कशा? नेमकी चूक कोठे व काय? होत आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. गेल्या आठवड्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हेगारी गट शस्त्रे हातात घेऊन एकमेकांच्या समोर आले होते. संचारबंदीच्या काळात गुन्हेगारीही उफाळून येत आहे. संचारबंदी व जमावबंदी आदेशाची खरोखर अंमलबजावणी होत आहे की नाही? की फक्त मुख्य चौकातच नाकाबंदी केली जाते? संवेदनशील भाग तसेच आपापल्या बीटमध्ये पोलिसिंग होताना दिसतच नाही. त्यामुळेच अशा घटनांना वाव मिळत आहे. या घटना टाळायच्या असतील, तर खासकरून संवेदनशील भागात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ज्या ज्या ठिकाणी दंगलीचे गुन्हे दाखल झालेले आहेत, अशा गुन्ह्यांमधील बहुतांश संशयित आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे उघड झाले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडून अशा घटना घडत असताना, गुन्हेगारी दत्तक योजनेचा नेमका फायदा काय? ही योजना कागदावरच राहिली आहे की काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दोन गटातील वाद, त्यातही रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून होत असलेली कृती भविष्यकाळात निश्चितच धोकादायक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर वेळीच प्रतिबंध घालणे गरजेचे असून त्यांच्यावर सतत कारवाईची टांगती तलवार असणे इतकेच गरजेचे आहे.