शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

घरे वाहून गेली, चूल विझली... होत्याचे नव्हते झाले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : काल - परवापर्यंत असणारा डोक्यावरच्या घराचा आधारच मंगळवारी आलेल्या पुरात वाहून गेल्याने आम्ही पुरते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : काल - परवापर्यंत असणारा डोक्यावरच्या घराचा आधारच मंगळवारी आलेल्या पुरात वाहून गेल्याने आम्ही पुरते उघड्यावर पडलो आहोत. काही तासात असे होत्याचे नव्हते झाले. खेर्डे गावातील रघुनाथ महारु पाटील, अशोक महारु पाटील या दोघा भावांनी आपल्यावर गुदरलेली आपबिती कथन केली. पूर ओसरल्यानंतरही त्यांच्या डोळ्यातून मात्र अश्रूंचा पूर वाहात होता.

‘लोकमत’ने पुराची मोठी झळ बसलेल्या खेर्डे गावातील स्थिती जाणून घेतली.

चाळीसगाव शहरापासून दक्षिणेला दहा किमी अंतरावर असणाऱ्या खेर्डे गावाला कन्नड तालुक्यातील भिलदरी केटीवेअरमधून आलेल्या पाण्याने मंगळवारी मध्यरात्री जणू वेढाच दिला. अतिवृष्टी सुरु असतानाच पुराच्या पाण्याचाही वेग प्रचंड असल्याने अडीचशे उंबऱ्यांचे हे गाव काही तासातच जलमय झाले. गाव आणि खेर्डे तांडा मिळून चार हजार लोकसंख्येचे हे गाव नैसर्गिक प्रकोपाने हादरून गेले आहे.

बुधवारी पूर ओसरल्यानंतर आपली वाहून गेलेली, पडझड झालेली घरे आणि उद्ध्वस्त झालेली शेती पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रूंच्या धारा वाहात आहेत. आभाळातून पडणारा पाऊस आता थांबला असला तरी, पुराने नागवे झालेल्या नागरिकांच्या डोळ्यातील पाऊस मात्र थांबायला तयार नाही. एवढे मोठे नुकसान झाल्यानंतरही प्रशासनाची कोणतीही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

आप्पा अहिरे, संजय पाटील, नाना सोनवणे, बापू महारु पाटील यांची घरे व संसारपयोगी सामानासह गुरेही पुरात वाहून गेली आहेत.

चौकट

शेतांमध्ये पाणी, काहींची शेतीच गेली वाहून

पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने येथे मका, सोयाबीन, कपाशी व कडधान्ये पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेकडो हेक्टरवरील पिके बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे.

१...कैलास सुदाम पाटील या शेतकऱ्याचे तीन एकर शेतच वाहून गेले असून, काल - परवापर्यंत शेतात डोलणारे कपाशीचे पीक मंगळवारी आलेल्या पुरात मातीसह वाहून गेले. शेतात आता फक्त दगड - धोंडे दिसत आहेत.

२...गावात पशुधनाचीही मोठी हानी झाली असून, दुभत्या जनावरांसह दीडशे गुरे पुराच्या पाण्यात मृत्युमुखी पडली आहेत.

चौकट

शाळेचे रेकॉर्डही पुरात स्वाहा

गावात माती व पत्र्याची घरे आहेत. यातील काही घरांच्या भिंती खचल्याने पत्रे खाली येऊन पडले, तर १२ ते १५ घरांची पडझड झाली आहे. शाळेची भिंत वाहून गेल्याने शालेय रेकॉर्डला जलसमाधी मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

२..गावालगत असणारी महिलांची शौचालयेही वाहून गेली असून, जागेवर फक्त माती आणि विटा उरल्या आहेत.

३...खेर्डे गाव व तांड्याला जोडणाऱ्या पुलालाही मोठे भगदाड पडल्याने संपर्क तुटला आहे.

चौकट

डॉ. सुनील राजपूत धावले मदतीला

चाळीसगाव येथील कळंत्री प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन डॉ. सुनील राजपूत यांनी पदरझळ सोसून गावातील ८० कुटुंबांना बुधवारी सकाळी ९ वाजता किराणा सामानाचे वाटप केले. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना डॉ. राजपूत मदतीला धावून आल्याने गावकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यावेळी सरपंच पोपट पाटील, माजी सरपंच दीपक पाटील, रांजणगावचे माजी सरपंच जिभाऊ आधार पाटील, आर. डी. चौधरी आदी उपस्थित होते.