शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सुरू होणा-या हवाईसेवेमुळे हॉटेल उद्योगाला मिळणार ‘बुस्टर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 13:59 IST

हॉटेलचे वाढणार ‘रेटिंग’

ठळक मुद्दे विदेशी पर्यटकांचा ओघ वाढल्यास आर्थिक उलाढालीला चालनातारांकीत हॉटेल साकारणार

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22-   विमानसेवेमुळे सुवर्णनगरीतील उद्योग, व्यापार, पर्यटन वाढीस चालना तर मिळणार असून या सोबतच पर्यटक, प्रवाशांच्या आगमनाने हॉटेल उद्योगास मोठी चालना मिळून हा उद्योग गगन भरारी घेऊ शकेल, असा विश्वास हॉटेल व्यावसायिकांमधून व्यक्त केला जात आहे. यामुळे येथील हॉटेलची गुणवत्ता (रेटिंग) वाढून तीन अथवा पंचतारांकीत हॉटेल जळगावात उभ्या राहण्यासही मदत होणार असल्याचा सूर उमटत आहे. पर्यटक, प्रवाशी यांची संख्या जेथे जास्त असते तेथे हॉटेल व्यवसायाला कायम सुगीचे दिवस असतात. तसेच विमानसेवा आहे तेथे येणा:या प्रवाशांची हॉटेलची मागणीही जास्त असते. त्यामुळे तेथे हा व्यवसाय भरभराटीस येतो. जळगावात मात्र विमानसेवेचा अभाव असल्याने येथील दज्रेदार हॉटेल असूनही पाहिजे त्या प्रमाणात पर्यटक, प्रवाशांचा ओघ या हॉटेल्सकडे आतार्पयत पाहिजे तसा नाही.

पर्यटक वाढीमुळे हॉटेल गजबजणारजळगावात विमानसेवा सुरू झाल्याने जवळच असलेल्या अजिंठा लेणी, लोणार सरोवर येथे जाणारे पर्यटक जळगावातून गेले व परत आले तर त्यांची हॉटेलसाठी मागणी वाढेल. जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीला भेट देणारे देशी-विदेशी पर्यटक सध्या औरंगाबाद येथे विमानाने येऊन तेथून ते वाहनाने अजिंठालेणीला येतात. मात्र जळगावातून लेणीचे अंतर औरंगाबादपेक्षा निम्मे असल्याने पर्यटकांचा ओघ आता जळगावात वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येथे येणा:या पर्यटकांना साहजिकच हॉटेलची गरज भासणार आहे. त्यामुळे येथील हॉटेल गजबजणार असल्याचा विश्वास हॉटेल व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे. 

उद्योजक, व्यापा:यांचाही ओघ वाढणारजळगावातील डाळ, प्लॅस्टीक उद्योग मोठे असल्याने तसेच येथील व्यापार क्षेत्रही मोठे असल्याने विमानसेवेमुळे  बाहेरचे उद्योजक, व्यापारी येथे येण्यास सुरुवात होणार असल्याने त्यांच्याही राहण्याची सोय होण्यासाठी हॉटेलकडे कल राहणार आहे. 

नवीन कंपन्या येणारविमानसेवेमुळे हॉटेलची मागणी वाढणार असल्याने येथे ठिकठिकाणचे हॉटेल व्यावसायीक तसेच काही नामांकीत कंपन्या जळगावात हॉटेलसाठी पुढाकार घेतील, असेही सांगितले जात आहे. यामुळे जळगावात ‘हॉटेल इंडस्ट्री’ नक्कीच वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

आर्थिक उलाढालीस चालनाजळगावात हॉटेल उद्योग वाढल्यास तसेच विदेशी पर्यटकांच्या आगमनामुळे येथील आर्थिक उलाढालीसही चालना मिळेल. व्यापा:याच्या माध्यमातून होणा:या कोटय़वधींच्या उलाढालीत या माध्यमातून आणखी भर पडल्याने जळगावाचा विकासही होऊ शकले, असेही सांगितले जात आहे. 

तारांकीत हॉटेल साकारणारजळगावातच नव्हे संपूर्ण खान्देशात जळगाव येथे एकमेव तीन तारांकीत (थ्री स्टार) हॉटेल होते, तेदेखील बंद पडले आहे. मात्र आता विमानसेवेमुळे येथील हॉटेल्सचे रेटींग वाढून ते कदाचित तीन तारांकीत (थ्री स्टार), पंचतारांकीत (फाईव्ह स्टार) होऊ शकतात, असे हॉटेल व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. यामध्ये बाहेरचे हॉटेल व्यावसायिक तारांकीत हॉटेल येथे सुरू करू शकतात, असेही सांगितले जात आहे. 

विमान प्रवाशांची मागणी जपावी लागतेविमानाने प्रवास करणा:या प्रवाशांची हॉटेलबाबतची मागणी इतरांपेक्षा वेगळी असते. ते हॉटेलच्या स्टॅण्डर्डला मोठे महत्त्व देतात. त्यामुळे तो दर्जा संभाळणे गरजेचे ठरणार असून त्यानुसार हॉटेलच्या गुणवत्ता वाढीसही चालना मिळेल.

जळगाव येथून अजिंठा लेणी, लोणार हे पर्यटन स्थळ असल्याने तेथे जाणा:या पर्यटकांचा ओघ जळगावातून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांची हॉटेलची मागणी वाढून हा उद्योग भरभराटीस येईल. - लेखराज उपाध्याय, अध्यक्ष, जळगाव हॉटेल अॅण्ड टुरीझम डेव्हलपमेंट असोसिएशन

विमानसेवेमुळे जळगावात येणा:या पर्यटक, उद्योजक, व्यापारी यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे साहजिकच त्यांची मागणी वाढल्याने हॉटेल व्यवसाय वाढणार आहे. - संजय जगताप, सचिव,  जळगाव हॉटेल अॅण्ड टुरीझम डेव्हलपमेंट असोसिएशन