शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

मालपूर येथे बागायती शेती सोडून गावाला पुरवतात स्वखर्चाने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:23 IST

ग्रामस्थ व गुरांसाठी स्वखर्चाने केली पाईप लाईन

ठळक मुद्दे२२ एकर शेतीतील उत्पन्नावर सोडले पाणीस्वखर्चाने पाईपलाईन करीत ग्रामस्थ व गुरांसाठी उपलब्ध करून दिले पाणीगेल्या अडीच महिन्यांपासून मालपूर येथे सुरु आहे टँकर

आॅनलाईन लोकमतअमळनेर,दि.३० : सततचा तीन वर्षांचा दुष्काळ, त्यात शेतीचे उत्पन्न नाही, अशा परिस्थितीत स्वत:ची बागायती शेती सोडून गावातील गुरे आणि ग्रामस्थांना स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याचे दातृत्व माजी सरपंच तथा प्रा.गणेश पवार गेल्या दीड महिन्यापासून करीत आहेत.अमळनेर तालुक्यात काही गावांना दीड वर्षापासून टँकर सुरू आहे. सध्या ४५ गावांना टँकर सुरू आहेत. पाण्याचे स्रोत कमी होत असल्याने जनतेचे पाण्यासाठी हाल होत आहेत. तालुक्यातील धार मालपूर येथे गेल्या अडीच महिन्यांपासून टँकर सुरू आहे. मात्र तत्पूर्वी गेल्या सहा महिन्यांपासून गुरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने गणेश पवार यांनी स्वत:च्या शेतातून पाईप लाईन करीत गावातील हाळात पाणी टाकले. त्यामुळे गुरांचे हाल थांबले आहेत. दीड महिन्यापासून टँकरचे पाणी अपूर्ण पडत होते. ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी गणेश पवार यांनी स्वखर्चाने पाईप लाईन टाकली. ग्रामपंचायतीच्या मोठ्या प्लॅस्टिकच्या टाकीत हे पाणी टाकून ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.२२ एकर शेतीतील उत्पन्नावर सोडले पाणीग्रामस्थांना पाणी मिळावे यासाठी त्यांनी स्वत:च्या २२ एकर बागायती शेतीमधील उत्पन्न घेणे बंद केले आहे. गावासाठी उत्पन्न न घेता फक्त गुरांना चारा मिळेल इतकेच पाणी स्वत:च्या शेताला देऊन ते गावासाठी पाणी देत आहेत. २२ एकर शेतीमध्ये उत्पादन घेऊन त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न घेता आले असते. मात्र त्यांनी ते टाळले. त्यांच्या या दातृत्वामुळे मालपूर ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेर