शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

वरातीपुढून घोडे

By admin | Updated: May 29, 2017 14:00 IST

वीकेण्ड स्पेशलमध्ये अनुभव या सदरात डॉ.मिलींद बागुल यांनी केलेले लिखाण.

 उन्हाळातल्या उन्हाबद्दल तीव्र प्रतिक्रिया बहुसंख्येने किंबहुना प्रत्येक व्यक्ती व्यक्त करीत असते. तेवढय़ाच अधिकाधिक प्रमाणातील विवाह उन्हाळ्यात केले जातात. विवाहाला जाणा:या प्रत्येकाला काही नाचणा:या मंडळीचा अपवाद वगळता विवाह वेळेवर लागेल का? असा प्रश्न असतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी काही समाजांनी मनोमन पुढाकार घेऊन प्रश्न सोडविला सुद्धा.  त्या समाजातल्या तरुण मुलांनी फारच चांगला आदर्श निर्माण केला. ब:याचशा समाजात लग्न वेळेवर लागत नाही. त्यामुळे ताटकळत बसण्याशिवाय अनेकांना पर्याय नसतो. यापुढची गंमत म्हणजे जेवणंसुद्धा लग्नविधी झाल्यावरच सुरू करतात आणि त्या गोडसं नाव सुद्धा देतात. कुँवारी पंगत देऊ नये. पण जरा वेगळाच अनुभव दोन विवाहांना उपस्थिती देताना येऊन गेला. फैजपूरला  लग्नानिमित्ताने गेलो. सोनवणे आणि तायडे परिवारातला हा विवाह सोहळा विवाह सोहळ्याच्या अर्धा तास अगोदर धरणगावहून फैजपूरला नवरदेव पोहोचला. मंडपात भोजनावळी सुरू होत्या. पारावरचा नवरदेव आणि विवाहस्थळ तसं बरचं लांब होते.  आता बॅण्ड सुरू होणार आणि लग्न चार वाजता लागणार असे वाटू लागले.  बॅण्ड सुरू झाला. लहान मुलांनी ताल धरला अन् हळूहळू तरुणांची गाण्यांची फर्माईश वाढू लागली. सारं कसं ङिांगाट होवू लागलं. हळूहळू वरात पुढे सरकू लागली. पंधरा-वीस मिनिटानंतर बॅण्ड आणि वरात अध्र्यावर येऊन पोहोचली. पाच मिनिटानंतर  वरात मंडपाच्या काही अंतरावर पोहचलीसुद्धा.  हे अंतर पार करण्याची किमया काही लक्षात येईना.. वर पित्याला  शोधत होतो. तरुण बेधुंद नाचत होते. वर-पित्यानं नवरदेवाचा घोडा वरातीच्या पुढे घेऊन थेट मंडपाजवळच थांबवला. समजुतदारपणा आणि तरुणांची समजूत यांचा सुरेख संगम साधत वरपित्याने विवाह वेळेवर लावून सा:यांनाच सुखद आनंद दिला. असाच दुसरा विवाह नेमाडे आणि पाटील परिवारातला. जळगावातील  रणरणत्या उन्हात सावली शोधणा:या मंडळींना वेळेवर विवाह लागल्याने सुखद गारवा देऊन जाताना आनंदाचा प्रत्यय देखील येत असतो.

जळगावच्या विवाहात सा:या नातेवाईक मंडळीत अर्थात महिलांनी देखील फेटे बांधून वरातीत आपल्या आनंदाला वाट करून देत बॅण्डच्या दोन-चार गाण्यातच नवरदेवाला लग्न मंडपात आणून विवाह वेळेवर लावला. या दोनही विवाह सोहळ्याची वैशिष्ठय़े ही होती की, वेळेवर विवाह लागल्यानंतर मंडपाच्या बाहेर पडताना येणारी मंडळी आवजरून विचारायची अजून लग्नाला किती उशीर आहे? लग्न लागल्याचे समजताच त्यांनाच उशिरा आल्याचा पश्चाताप होत होता. पालकांचा समजूतदारपणा आणि तरुणांची मानसिकता यांची सांगड घालत असताना विवाहामध्ये अनेक तर्क आणि विचार देखील ऐकायला मिळतात. ‘मगं का? लग्न पुन्हा पुन्हा होतं? नाचू द्या? आणि मगं सारं काही मूक संमतीनं सहन करावं लागतं. काही लग्नामध्ये तर सत्कार समारंभाचा भार सुद्धा सहन करावा लागतो. परवा  एका लग्नात कहरच झाला. मंगलाष्टके सुरू असतानाच एका महनीय व्यक्तीचा (कुटुंबासही) लग्न मंडपात प्रवेश झाला. मंगलाष्टके थांबविण्यात आली. त्या व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. त्यापुढचा कहर म्हणजे त्या व्यक्तीला भाषणाचा आग्रह झाला आणि त्यांनी तो आग्रह पूर्ण देखील केला. विवाह सोहळा मंगल आणि मांगल्याचा सोहळा असतो. वरातीमागून येणारा घोडा आता वरातीचा पुढे येऊ लागलाय. समज आणि समाज, बांधिलकी याचा समन्वय साधत असताना लहान मुले, स्त्रिया आणि आपण सा:या मंडळीचा आनंदमयी विचार आपण करू या! आणि लगA वेळेवर लावण्यासाठी आग्रही राहू या.. नाही का.?